शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांनी भरल्या खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहरात दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ डेंग्यूने आरोग्य यंत्रणेला अक्षरश: जेरीस आणले होते. डेंग्यूच्या उद्रेकाने अनेकांचा बळी घेतला ...

औरंगाबाद : शहरात दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ डेंग्यूने आरोग्य यंत्रणेला अक्षरश: जेरीस आणले होते. डेंग्यूच्या उद्रेकाने अनेकांचा बळी घेतला होता. हीच परिस्थिती आता पुन्हा एकदा उद्भवण्याची चिंता व्यक्त होत आहे. कारण, शहरात सध्या कोरोनापेक्षा डेंग्यू, चिकुनगुनिया आणि तापाचे रुग्णच झपाट्याने वाढत आहेत. सप्टेंबरच्या अवघ्या २० दिवसांत ७८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. ही फक्त शासकीय यंत्रणेत नोंद झालेली आकडेवारी आहेत. प्रत्यक्षात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयातील खाटा भरून गेलेल्या आहेत.

एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्याची झपाट्याने पैदास होते. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लागण होते. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि त्यातून डेंग्यू, डेंग्यूसदृश, चिकुनगुनिया आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेता रुग्णांचा आकडा वाढू शकतो; परंतु आरोग्य यंत्रणा परिस्थिती चिंताजनक नसल्याचाच दावा करीत आहे.

आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतनात व्यस्त आहे. या सगळ्यात डेंग्यूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. पडेगाव, सिडको, एन-६, मिसारवाडी, बेगमपुरा, बुढीलेन, हर्सूल, चिकलठाणा, टीव्ही सेंटर, आरेप काॅलनी, आसेफिया काॅलनी, रोहिलागल्ली, टाऊन हाॅल, एस.टी. काॅलनी, राहुलनगर, पैठण गेट, छावणी या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे.

---

रुग्णसंख्येत वाढ

डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण भरती होण्यासाठीच येतात.

- डाॅ. राजश्री रत्नपारखी, डाॅ. हेडगेवार रुग्णालय

----

सात दिवसांत १५ रुग्ण

गेल्या ७ दिवसांत डेंग्यूच्या १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या ४ रुग्ण दाखल आहे. यात दोघांची प्रकृती चांगली आहे. ओपीडीत चिकुनगुनियाचे रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक आहे.

- डाॅ. हिमांशू गुप्ता, सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटल

------

किमान ६ ते १० दिवस उपचार

डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जवळपास ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एका रुग्णाला किमान ६ ते १० दिवस रुग्णालयात रहावे लागते. रुग्णालयातून गेल्यानंतरही काही दिवस त्रास होत असतो.

- डाॅ. अजय रोटे, युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल

-----

१० पैकी ५ डेंग्यूचे रुग्ण

सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया आणि तापेच्या रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. राऊंड घेण्यासाठी वेळही अपुरा पडतो. तापेच्या १० रुग्णांपैकी ४ ते ५ जण डेंग्यूचे रुग्ण आहेत. प्रत्येक वार्डात कमी-अधिक प्रमाणात रुग्ण भरती आहेत. कोरोना रुग्णांसह याही रुग्णांवर उपचार केले जात आहे.

- डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी

-----

ताप अंगावर काढू नये

डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनीही घर, परिसरात जास्त दिवस पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही ताप अंगावर काढता कामा नये.

- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी

-------