शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांनी भरल्या खाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : शहरात दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ डेंग्यूने आरोग्य यंत्रणेला अक्षरश: जेरीस आणले होते. डेंग्यूच्या उद्रेकाने अनेकांचा बळी घेतला ...

औरंगाबाद : शहरात दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ डेंग्यूने आरोग्य यंत्रणेला अक्षरश: जेरीस आणले होते. डेंग्यूच्या उद्रेकाने अनेकांचा बळी घेतला होता. हीच परिस्थिती आता पुन्हा एकदा उद्भवण्याची चिंता व्यक्त होत आहे. कारण, शहरात सध्या कोरोनापेक्षा डेंग्यू, चिकुनगुनिया आणि तापाचे रुग्णच झपाट्याने वाढत आहेत. सप्टेंबरच्या अवघ्या २० दिवसांत ७८ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे. ही फक्त शासकीय यंत्रणेत नोंद झालेली आकडेवारी आहेत. प्रत्यक्षात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांनी शासकीय आणि खासगी रुग्णालयातील खाटा भरून गेलेल्या आहेत.

एडिस इजिप्त हा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यावर अंडी घालतो. त्याची झपाट्याने पैदास होते. याच डासामुळे डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लागण होते. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि त्यातून डेंग्यू, डेंग्यूसदृश, चिकुनगुनिया आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या लक्षात घेता रुग्णांचा आकडा वाढू शकतो; परंतु आरोग्य यंत्रणा परिस्थिती चिंताजनक नसल्याचाच दावा करीत आहे.

आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतनात व्यस्त आहे. या सगळ्यात डेंग्यूच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे. पडेगाव, सिडको, एन-६, मिसारवाडी, बेगमपुरा, बुढीलेन, हर्सूल, चिकलठाणा, टीव्ही सेंटर, आरेप काॅलनी, आसेफिया काॅलनी, रोहिलागल्ली, टाऊन हाॅल, एस.टी. काॅलनी, राहुलनगर, पैठण गेट, छावणी या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे.

---

रुग्णसंख्येत वाढ

डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. बाह्यरुग्ण विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. आमच्याकडे येणारे बहुतांश रुग्ण भरती होण्यासाठीच येतात.

- डाॅ. राजश्री रत्नपारखी, डाॅ. हेडगेवार रुग्णालय

----

सात दिवसांत १५ रुग्ण

गेल्या ७ दिवसांत डेंग्यूच्या १५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सध्या ४ रुग्ण दाखल आहे. यात दोघांची प्रकृती चांगली आहे. ओपीडीत चिकुनगुनियाचे रुग्ण येण्याचे प्रमाण अधिक आहे.

- डाॅ. हिमांशू गुप्ता, सेठ नंदलाल धूत हाॅस्पिटल

------

किमान ६ ते १० दिवस उपचार

डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या जवळपास ३५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एका रुग्णाला किमान ६ ते १० दिवस रुग्णालयात रहावे लागते. रुग्णालयातून गेल्यानंतरही काही दिवस त्रास होत असतो.

- डाॅ. अजय रोटे, युनायटेड सिग्मा हाॅस्पिटल

-----

१० पैकी ५ डेंग्यूचे रुग्ण

सध्या डेंग्यू, चिकुनगुनिया आणि तापेच्या रुग्णांच्या संख्येत खूप वाढ झाली आहे. राऊंड घेण्यासाठी वेळही अपुरा पडतो. तापेच्या १० रुग्णांपैकी ४ ते ५ जण डेंग्यूचे रुग्ण आहेत. प्रत्येक वार्डात कमी-अधिक प्रमाणात रुग्ण भरती आहेत. कोरोना रुग्णांसह याही रुग्णांवर उपचार केले जात आहे.

- डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य, मेडिसीन विभागप्रमुख, घाटी

-----

ताप अंगावर काढू नये

डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनीही घर, परिसरात जास्त दिवस पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही ताप अंगावर काढता कामा नये.

- रवींद्र ढोले, जिल्हा हिवताप अधिकारी

-------