शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

By admin | Updated: March 10, 2016 00:47 IST

हणमंत गायकवाड , लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत.

हणमंत गायकवाड , लातूरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत. शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून लातुरातील कार्यकर्त्यांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक व्हावे व सामाजिक ऐक्याचा संदेश महाराष्ट्राला द्यावा, असे बौद्ध धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.बुद्ध धम्म स्थळ दर्शनासाठी अमृतराव सूर्यवंशी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, लातुरातील आंबेडकरी चळवळीला मोठ्या उंचीची परंपरा आहे. सध्या आंबेडकरी समाजाची प्रतिमा विखुरलेला समाज अशी होत आहे. बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून ही प्रतिमा बदलण्याची संधी आहे. अशा सोहळ्यांतून सामूहिक नेतृत्व विकसीत होण्यासही वाव आहे. सद्य:स्थितीत सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ओळखून आंबेडकरी समुहाने पुरोगामी चळवळीसमोर नवा आदर्श निर्माण करावा. यापूर्वी उचित वेळी अन्यायाचा प्रतिकार करताना लातुरातील आंबेडकरी चळवळीने आपल्या संघटनशक्तीचा परिचय करून दिलेला आहे. लातूरच्या आंबेडकरी चळवळीला परंपरा आहे. टी.एम. कांबळे, व्ही.एल. सूर्यवंशी, पप्पू गायकवाड, बब्रुवान माने, महादेव चिकटे, एम.बी. कांबळे हे चळवळीतील मोठे शिलेदार होते. त्यांची स्मृती जपत आपणही आंबेडकरी चळवळीला सामाजिक ऐक्याचा नवा आयाम देणे गरजेचे आहे. भावी काळात आंबेडकरी समाजाकडून योग्य, प्रभावी, सामाजिक, राजकीय नेतृत्व अशा सामूहिक कार्यक्रमांतून विकसीत होऊ शकते. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरावी. लातुरातील कार्यकर्त्यांनी स्वनिधीवर जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद असून, आदर्शवत आहे. जयंती कार्यक्रमातून वैचारिक मंथन होऊन ज्ञानाच्या कक्षा अधिक वाढाव्यात. त्यासाठी तरुण, महिला, कर्मचारी व ज्येष्ठांनी या जयंती उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवावा. अन्य समाज घटकांनाही सहभागी करुन घ्यावे, असेही अमृतराव सूर्यवंशी म्हणाले.