शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

By admin | Updated: March 10, 2016 00:47 IST

हणमंत गायकवाड , लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत.

हणमंत गायकवाड , लातूरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत. शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून लातुरातील कार्यकर्त्यांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक व्हावे व सामाजिक ऐक्याचा संदेश महाराष्ट्राला द्यावा, असे बौद्ध धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.बुद्ध धम्म स्थळ दर्शनासाठी अमृतराव सूर्यवंशी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, लातुरातील आंबेडकरी चळवळीला मोठ्या उंचीची परंपरा आहे. सध्या आंबेडकरी समाजाची प्रतिमा विखुरलेला समाज अशी होत आहे. बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून ही प्रतिमा बदलण्याची संधी आहे. अशा सोहळ्यांतून सामूहिक नेतृत्व विकसीत होण्यासही वाव आहे. सद्य:स्थितीत सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ओळखून आंबेडकरी समुहाने पुरोगामी चळवळीसमोर नवा आदर्श निर्माण करावा. यापूर्वी उचित वेळी अन्यायाचा प्रतिकार करताना लातुरातील आंबेडकरी चळवळीने आपल्या संघटनशक्तीचा परिचय करून दिलेला आहे. लातूरच्या आंबेडकरी चळवळीला परंपरा आहे. टी.एम. कांबळे, व्ही.एल. सूर्यवंशी, पप्पू गायकवाड, बब्रुवान माने, महादेव चिकटे, एम.बी. कांबळे हे चळवळीतील मोठे शिलेदार होते. त्यांची स्मृती जपत आपणही आंबेडकरी चळवळीला सामाजिक ऐक्याचा नवा आयाम देणे गरजेचे आहे. भावी काळात आंबेडकरी समाजाकडून योग्य, प्रभावी, सामाजिक, राजकीय नेतृत्व अशा सामूहिक कार्यक्रमांतून विकसीत होऊ शकते. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरावी. लातुरातील कार्यकर्त्यांनी स्वनिधीवर जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद असून, आदर्शवत आहे. जयंती कार्यक्रमातून वैचारिक मंथन होऊन ज्ञानाच्या कक्षा अधिक वाढाव्यात. त्यासाठी तरुण, महिला, कर्मचारी व ज्येष्ठांनी या जयंती उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवावा. अन्य समाज घटकांनाही सहभागी करुन घ्यावे, असेही अमृतराव सूर्यवंशी म्हणाले.