शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीसाठी एक व्हा...

By admin | Updated: March 10, 2016 00:47 IST

हणमंत गायकवाड , लातूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत.

हणमंत गायकवाड , लातूरभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १२५ वी जयंती आहे. देश आणि जगात जयंती साजरी करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी सरसावले आहेत. शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून लातुरातील कार्यकर्त्यांनी आपापसातील राजकीय मतभेद बाजूला सारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक व्हावे व सामाजिक ऐक्याचा संदेश महाराष्ट्राला द्यावा, असे बौद्ध धम्म चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अमृतराव सूर्यवंशी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.बुद्ध धम्म स्थळ दर्शनासाठी अमृतराव सूर्यवंशी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहेत. भ्रमणध्वनीवरून ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, लातुरातील आंबेडकरी चळवळीला मोठ्या उंचीची परंपरा आहे. सध्या आंबेडकरी समाजाची प्रतिमा विखुरलेला समाज अशी होत आहे. बाबासाहेबांच्या शतकोत्तर जयंतीचे औचित्य साधून ही प्रतिमा बदलण्याची संधी आहे. अशा सोहळ्यांतून सामूहिक नेतृत्व विकसीत होण्यासही वाव आहे. सद्य:स्थितीत सामूहिक नेतृत्वाची गरज आहे. ही गरज ओळखून आंबेडकरी समुहाने पुरोगामी चळवळीसमोर नवा आदर्श निर्माण करावा. यापूर्वी उचित वेळी अन्यायाचा प्रतिकार करताना लातुरातील आंबेडकरी चळवळीने आपल्या संघटनशक्तीचा परिचय करून दिलेला आहे. लातूरच्या आंबेडकरी चळवळीला परंपरा आहे. टी.एम. कांबळे, व्ही.एल. सूर्यवंशी, पप्पू गायकवाड, बब्रुवान माने, महादेव चिकटे, एम.बी. कांबळे हे चळवळीतील मोठे शिलेदार होते. त्यांची स्मृती जपत आपणही आंबेडकरी चळवळीला सामाजिक ऐक्याचा नवा आयाम देणे गरजेचे आहे. भावी काळात आंबेडकरी समाजाकडून योग्य, प्रभावी, सामाजिक, राजकीय नेतृत्व अशा सामूहिक कार्यक्रमांतून विकसीत होऊ शकते. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर जयंती सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी ठरावी. लातुरातील कार्यकर्त्यांनी स्वनिधीवर जयंती साजरी करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद असून, आदर्शवत आहे. जयंती कार्यक्रमातून वैचारिक मंथन होऊन ज्ञानाच्या कक्षा अधिक वाढाव्यात. त्यासाठी तरुण, महिला, कर्मचारी व ज्येष्ठांनी या जयंती उत्सवात हिरीरीने सहभाग नोंदवावा. अन्य समाज घटकांनाही सहभागी करुन घ्यावे, असेही अमृतराव सूर्यवंशी म्हणाले.