शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

बीडमध्ये गोदाम देता का, गोदाम..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:22 IST

जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

ठळक मुद्दे५० हजार क्विंटल तुरीला हवे संरक्षण : गोदामात माल न गेल्याने शेतकऱ्यांचे पेमेंट रखडणार

अनिल भंडारी 

बीड : जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

बीड जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४० दिवसात ७० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वास्तविक पाहता या कालावधीत खरेदीचे प्रमाण किमान दुप्पट अपेक्षित होते. परंतु, वखार महामंडळाकडून गोदाम उपलब्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया संथपणे होत आहे. आतापर्यंत केवळ २३ हजार क्विंटल तूर शासकीय गोदामात पाठविण्यात आलेली आहे. तर ५० हजार क्विंटल तूर सांभाळण्याची वेळ मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर ती रितसर गोदामात पाठविली जाते. त्यानंतर मिळणा-या पावत्यांनुसार संबंधित तूर विकलेल्या शेतकºयांच्या पेमेंटची प्रक्रिया होते. परंतु, ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात न गेल्यामुळे ही तूर विकलेल्या शेतक-यांच्या पेमेंटलाही विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील नाफेडच्या १४ पैकी ५ केंद्रांवर खरेदी केलेल्या तुरीचे शेतकºयांना पेमेंट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजलगाव तालुक्यातील ३६१, आष्टीतील १८६, गेवराईत १६१, कड्यात २०१ तसेच शिरुर कासार येथील १७५ अशा एकूण ११०४ शेतकºयांना आतापर्यंत तुरीचे पेमेंट मिळाले आहे. खरेदी केंद्रावरील तूर वखारच्या गोदामात डिपॉझिट झाल्याशिवाय पेमेंट मिळत नसल्याने गोदाम उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यादृष्टीने यंत्रणेने गती घेण्याची गरज आहे.

नवीन समस्या उद्भवण्याआधीच उपाययोजना गरजेचीखरेदी केलेली तूर गोदामात सुरक्षित झाल्यानंतर पावत्या मिळतात. त्यानंतर शेतकºयांचे पेमेंट वाटप करण्यात येते. मात्र तोपर्यंत तूर सांभाळण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनवर असते.सध्या ताडपत्री टाकून खरेदी केलेली तूर सुरक्षित असली तरी वातावरणातील बदलामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे नाफेडकडून निकषांवर बोट ठेवून तूर अपात्र ठरविली जाऊ शकते. नवीन समस्या निर्माण होण्याआधी ही बाब शासन यंत्रणेने लक्षात घेणे महत्वाचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र