शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये गोदाम देता का, गोदाम..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:22 IST

जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

ठळक मुद्दे५० हजार क्विंटल तुरीला हवे संरक्षण : गोदामात माल न गेल्याने शेतकऱ्यांचे पेमेंट रखडणार

अनिल भंडारी 

बीड : जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

बीड जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४० दिवसात ७० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वास्तविक पाहता या कालावधीत खरेदीचे प्रमाण किमान दुप्पट अपेक्षित होते. परंतु, वखार महामंडळाकडून गोदाम उपलब्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया संथपणे होत आहे. आतापर्यंत केवळ २३ हजार क्विंटल तूर शासकीय गोदामात पाठविण्यात आलेली आहे. तर ५० हजार क्विंटल तूर सांभाळण्याची वेळ मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर ती रितसर गोदामात पाठविली जाते. त्यानंतर मिळणा-या पावत्यांनुसार संबंधित तूर विकलेल्या शेतकºयांच्या पेमेंटची प्रक्रिया होते. परंतु, ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात न गेल्यामुळे ही तूर विकलेल्या शेतक-यांच्या पेमेंटलाही विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील नाफेडच्या १४ पैकी ५ केंद्रांवर खरेदी केलेल्या तुरीचे शेतकºयांना पेमेंट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजलगाव तालुक्यातील ३६१, आष्टीतील १८६, गेवराईत १६१, कड्यात २०१ तसेच शिरुर कासार येथील १७५ अशा एकूण ११०४ शेतकºयांना आतापर्यंत तुरीचे पेमेंट मिळाले आहे. खरेदी केंद्रावरील तूर वखारच्या गोदामात डिपॉझिट झाल्याशिवाय पेमेंट मिळत नसल्याने गोदाम उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यादृष्टीने यंत्रणेने गती घेण्याची गरज आहे.

नवीन समस्या उद्भवण्याआधीच उपाययोजना गरजेचीखरेदी केलेली तूर गोदामात सुरक्षित झाल्यानंतर पावत्या मिळतात. त्यानंतर शेतकºयांचे पेमेंट वाटप करण्यात येते. मात्र तोपर्यंत तूर सांभाळण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनवर असते.सध्या ताडपत्री टाकून खरेदी केलेली तूर सुरक्षित असली तरी वातावरणातील बदलामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे नाफेडकडून निकषांवर बोट ठेवून तूर अपात्र ठरविली जाऊ शकते. नवीन समस्या निर्माण होण्याआधी ही बाब शासन यंत्रणेने लक्षात घेणे महत्वाचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र