शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

बीडमध्ये गोदाम देता का, गोदाम..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 11:22 IST

जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

ठळक मुद्दे५० हजार क्विंटल तुरीला हवे संरक्षण : गोदामात माल न गेल्याने शेतकऱ्यांचे पेमेंट रखडणार

अनिल भंडारी 

बीड : जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर तूर खरेदीची गती मंदावलेली असताना आतापर्यंत खरेदी केलेल्या तुरीपैकी ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात गेलेली नाही. परिणामी आतापर्यंत केवळ २ हजार ५०० शेतक-यांनाच तुरीचे पेमेंट झाले आहेत. खरेदी केलेल्या तूरीसाठी गोदाम शोधण्याची वेळ यंत्रणेवर आली आहे.

बीड जिल्ह्यातील १४ केंद्रांवर ४० दिवसात ७० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. वास्तविक पाहता या कालावधीत खरेदीचे प्रमाण किमान दुप्पट अपेक्षित होते. परंतु, वखार महामंडळाकडून गोदाम उपलब्ध न झाल्याने खरेदी प्रक्रिया संथपणे होत आहे. आतापर्यंत केवळ २३ हजार क्विंटल तूर शासकीय गोदामात पाठविण्यात आलेली आहे. तर ५० हजार क्विंटल तूर सांभाळण्याची वेळ मार्केटिंग फेडरेशनवर आली आहे. नाफेडच्या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर ती रितसर गोदामात पाठविली जाते. त्यानंतर मिळणा-या पावत्यांनुसार संबंधित तूर विकलेल्या शेतकºयांच्या पेमेंटची प्रक्रिया होते. परंतु, ५० हजार क्विंटल तूर अद्याप गोदामात न गेल्यामुळे ही तूर विकलेल्या शेतक-यांच्या पेमेंटलाही विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील नाफेडच्या १४ पैकी ५ केंद्रांवर खरेदी केलेल्या तुरीचे शेतकºयांना पेमेंट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. माजलगाव तालुक्यातील ३६१, आष्टीतील १८६, गेवराईत १६१, कड्यात २०१ तसेच शिरुर कासार येथील १७५ अशा एकूण ११०४ शेतकºयांना आतापर्यंत तुरीचे पेमेंट मिळाले आहे. खरेदी केंद्रावरील तूर वखारच्या गोदामात डिपॉझिट झाल्याशिवाय पेमेंट मिळत नसल्याने गोदाम उपलब्ध होणे गरजेचे असून, त्यादृष्टीने यंत्रणेने गती घेण्याची गरज आहे.

नवीन समस्या उद्भवण्याआधीच उपाययोजना गरजेचीखरेदी केलेली तूर गोदामात सुरक्षित झाल्यानंतर पावत्या मिळतात. त्यानंतर शेतकºयांचे पेमेंट वाटप करण्यात येते. मात्र तोपर्यंत तूर सांभाळण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनवर असते.सध्या ताडपत्री टाकून खरेदी केलेली तूर सुरक्षित असली तरी वातावरणातील बदलामुळे आर्द्रतेचे प्रमाण वाढू शकते.त्यामुळे नाफेडकडून निकषांवर बोट ठेवून तूर अपात्र ठरविली जाऊ शकते. नवीन समस्या निर्माण होण्याआधी ही बाब शासन यंत्रणेने लक्षात घेणे महत्वाचे आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडMarket Yardमार्केट यार्डagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र