शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अनुकंपाच्या सरकारी नोकरीसाठी बीई, एमटेक पदवीधर खाजगी नोकरीवर सोडणार पाणी

By विकास राऊत | Updated: July 28, 2023 16:09 IST

११ वर्षांपासून हे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यांना आता संधी मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : अनुकंपाच्या नोकरीसाठी एम.टेक, बी.ई पदवीधारकांसह उच्चशिक्षित उमेदवारांनी खाजगी नोकरीवर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ७ ऑगस्टला २७ उमेदवारांना तलाठी व इतर पदांवर संधी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. मागील ११ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेले परंतु जिल्हा प्रशासनाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या मृत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात येणार आहे.

११ वर्षांपासून हे उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यांना आता संधी मिळणार आहे. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी अनुकंपा उमेदवारांची कागदपत्रे तपासली असता बरेच उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसले. अभियंता व इतर खाजगी सेवेत काम करणाऱ्या या उमेदवारांनी तिकडील नोकरी अनुकंपाच्या संधीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत बुधवारी बैठक घेतली.

अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षा यादी मोठी आहे. जिल्हा प्रशासनातील बहुतांश अनुकंपाधारकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे. परंतु इतर विभागांत जागा नसल्यामुळे २७ उमेदवारांना जिल्हा प्रशासनात सामावून घेण्यात येणार आहे. खाजगी नोकरीत चांगले वेतन असले तरी सुरक्षितता नसल्यामुळे अनेक उमेदवारांनी अनुकंपावरील नोकरीला प्राधान्य दिल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विधाते यांनी सांगितले.

सगळ्या विभागांत प्रतीक्षा यादीजिल्ह्यातील पाटबंधारे, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदासह इतर विभागांत अनुकंपा भरतीची मोठी प्रतीक्षा यादी आहे. उपलब्ध जागांपैकी २० टक्केच जागा अनुकंपासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे अनेकांना वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते आहे. दरम्यान, उमेदवारांना वयोमर्यादा संपण्याची भीती असून त्यांना कधी संधी मिळणार, असा प्रश्न आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद