शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भगर खाताना काळजी घ्या; मराठवाड्यात ६०२ जणांना भगरीतून विषबाधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:30 IST

मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती संभाजीनगर : विजया भागवत एकादशीच्या निमित्ताने मराठवाड्यात अनेक ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने बनविलेली भगर खाल्ल्याने मराठवाड्यात जवळपास ६०२ भाविकांना विषबाधा झाली. त्यांच्यावर तातडीने उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला. हा आकडा यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. कारण अनेक रुग्णांनी परस्पर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यामुळे रुग्णांची माहिती मिळाली नाही.

लातूर जिल्ह्यात महाप्रसादातील भगर खाल्ल्याने देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथील ४४३ जणांना गुरुवारी रात्री मळमळ, चक्कर येऊन विषबाधा झाली. त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. देवणी तालुक्यातील वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्ताने गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसादाचे आयोजित करण्यात आला. तो खाल्ल्याने गावातील जवळपास ३१५ जणांना रात्री मळमळ, उलटी, चक्कर येण्यास सुरुवात झाली. गावातच ३०६ जणांवर उपचार केले तर सहा जणांना देवणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही भगरीतून १२८ जणांना उलटी, मळमळ, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. गावात ९३ जणांवर प्रथमोपचार केले.

परभणी जिल्ह्यात गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवस उपवासाला भगर खाल्ल्याने जिल्ह्यातील ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील ५० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी शुक्रवारी दिली. शुक्रवारी परभणी तालुक्यातील झरी येथे ४, इठलापूर येथे ६, ब्रह्मपुरी ३, अवलगाव १, बोरवंड १, बडवली १, खडका १ व परभणी शहरातील विविध भागांतील १६, तसेच पेडगाव येथील १९, गंगाखेड येथील १० अशा एकूण ८० जणांना भगर सेवन केल्यानंतर मळमळ, उलटी आदी त्रास जाणवू लागला. दरम्यान, गंगाखेडला १०, झरीत १०, जिंतूरला सात जणांना विषबाधा झाली. तर पेडगाव प्रा. आ. केंद्रात १९ जणांवर उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात अंबाजोगाई व गेवराई तालुक्यातील तब्बल ५५ जणांना विषबाधा झाली. उपवासाची भगर खाल्ल्याने ही बाधा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात सर्वांत जास्त निरपणा येथील १४ रुग्ण आहेत, तर मगरवाडी ५, जवळगाव ५, अंबाजोगाई ११, धानोरा, पट्टीवडगाव, वाघाळा, वाघाळवाडी, चनई प्रत्येकी २, गित्ता, करेवाडी प्रत्येकी १, असे रूग्ण आहेत. गेवराई शहरातील दाभाडे गल्लीतील चार महिलांनाही गुरुवारी अचानक त्रास सुरू झाल्याने त्यांना गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हिंगोली जिल्ह्यात भगर खाल्ल्याने सेनगाव तालुक्यातील खुडज येथील २४ भाविकांना विषबाधा झाली. यातील २० भाविकांना सेनगाव येथील शासकीय रुग्णालयात, तर एका भाविकास हिंगोली येथील खासगी रुग्णालयात ७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दाखल करण्यात आले. या भाविकांची प्रकृती स्थिर आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाAurangabadऔरंगाबादHingoliहिंगोलीBeedबीडparabhaniपरभणी