शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:42 IST

Corona Virus in Aurangabad : तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देऑगस्ट अखेरपासून रुग्ण वाढण्याची शक्यता

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेर येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोना आणि लसीकरणामुळे ८ लाख नागरिकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार झाल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका आहे. ऑगस्ट अखेरपासून रुग्ण वाढतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ( 4 lakh citizens in danger of being affected in the third wave of Corona in Aurangabad ) 

देशातील २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांत चौथा राष्ट्रीय सेरो सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार देशातील सुमारे ४० कोटी नागरिकांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी महिनाभरापूर्वीच याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. शहरात किमान ५ लाख नागरिक बाधित होतील, असा त्यांचा अंदाज होता. आता सेरो सर्वेक्षणातून हा आकडा ४ लाखांपर्यंत आला आहे. पाण्डेय यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेत सुमारे १ लाख ४ हजार नागरिक बाधित झाले होते. तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

शहराची २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साधारणपणे १२ लाख इतकी आहे. त्यामध्ये दहा वर्षात अंदाजे ३ ते ५ लाख वाढ झालेली असून १७ लाख इतकी लोकसंख्या गृहीत धरली जाते. आतापर्यंत ५ लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना होऊन गेल्यामुळे अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेले नागरिक सुमारे अडीच लाख आहेत. त्यामुळे सुमारे ८ लाख नागरिकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेल्यांना कोरोना संसर्गाची शक्यता कमी आहे. शहरात राहत असले तरी ग्रामीण भागात लसीकरण करणारे साधारण एक ते दीड लाख नागरिक आहेत. त्यामुळे उर्वरित ४ लाख नागरिकांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याचा धोका आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस