शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

सावधान ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 12:42 IST

Corona Virus in Aurangabad : तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देऑगस्ट अखेरपासून रुग्ण वाढण्याची शक्यता

औरंगाबाद : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अखेर येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कोरोना आणि लसीकरणामुळे ८ लाख नागरिकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार झाल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत ४ लाख नागरिक बाधित होण्याचा धोका आहे. ऑगस्ट अखेरपासून रुग्ण वाढतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. ( 4 lakh citizens in danger of being affected in the third wave of Corona in Aurangabad ) 

देशातील २१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांत चौथा राष्ट्रीय सेरो सर्व्हे करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार देशातील सुमारे ४० कोटी नागरिकांना तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी महिनाभरापूर्वीच याबाबत धोक्याचा इशारा दिला होता. शहरात किमान ५ लाख नागरिक बाधित होतील, असा त्यांचा अंदाज होता. आता सेरो सर्वेक्षणातून हा आकडा ४ लाखांपर्यंत आला आहे. पाण्डेय यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. या लाटेत सुमारे १ लाख ४ हजार नागरिक बाधित झाले होते. तिसरी लाट भयंकर असेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

शहराची २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या साधारणपणे १२ लाख इतकी आहे. त्यामध्ये दहा वर्षात अंदाजे ३ ते ५ लाख वाढ झालेली असून १७ लाख इतकी लोकसंख्या गृहीत धरली जाते. आतापर्यंत ५ लाख २७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कोरोना होऊन गेल्यामुळे अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेले नागरिक सुमारे अडीच लाख आहेत. त्यामुळे सुमारे ८ लाख नागरिकांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज तयार झालेल्यांना कोरोना संसर्गाची शक्यता कमी आहे. शहरात राहत असले तरी ग्रामीण भागात लसीकरण करणारे साधारण एक ते दीड लाख नागरिक आहेत. त्यामुळे उर्वरित ४ लाख नागरिकांना तिसऱ्या लाटेत संसर्ग होण्याचा धोका आहे. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCorona vaccineकोरोनाची लस