शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

देशासाठी महत्त्वाकांक्षी बना

By admin | Updated: June 23, 2016 01:40 IST

औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे

औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे, असा सल्ला सेवानिवृत्त विदेश सचिव तथा अमेरिका, चीन येथे भारताच्या राजदूत राहिलेल्या निरुपमा राव यांनी शहरातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने ताज हॉटेलजवळील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात निरुपमा राव यांचे ‘निरुपम संवाद : वेध व्यक्तिमत्त्वाचा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. केवळ महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस यांच्यासाठी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर्णा अमितेशकुमार, नाथ व्हॅली हायस्कूलचे प्रायार्य रणजित दास आणि मोनिका दास यांची उपस्थिती होती. याप्रसंगी निरुपमा राव म्हणाल्या की, ४० वर्षांपूर्वी मी या शहरात राहत होते. येथील विद्यापीठात एम. ए. इंग्रजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. या शहराशी आपले जुने नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. इंटरनेट, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमुळे आता विविध देशांच्या सीमा धूसर झाल्याचे त्यांनी नमूद केले. विदेश सेवेसाठी होती लग्न न करण्याची अटया कार्यक्रमास पोलिसांच्या गणवेशात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, मी जेव्हा विदेश सेवेसाठी अर्ज दाखल केला तेव्हा लग्न न करण्याची अट होती. आपल्याला ही अट मान्य असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यावेळी आपल्यासोबत कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. पुढे दोन वर्षांनंतर ही अट रद्द झाली.प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी के ले. सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मानले. (पान २ वर)कोणत्या देशात महिलांना सर्वाधिक स्वातंत्र्य आहे, असा प्रश्न एका महिला पोलिसाने विचारला असता त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याची तुमची व्याख्या काय आहे? महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षणाचे तसेच आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आणि सुरक्षितता म्हणजे स्वातंत्र्य आहे, असे आपले मत आहे. त्यानुसार पाश्चिमात्य देशातील महिलांची सरासरी परिस्थिती चांगली आहे. ४चीनेही महिलांवरील बंधने हटविलेली आहेत आणि भारतातही महिलांना स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आशियातील आपल्या शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका इ. देशांतील महिलांवर विविध बंधने असल्याचे त्यांनी नमूद केले. औरंगाबादशी ऋणानुबंधनिरुपमा राव यांचे औरंगाबादशी जुने संबंध आहेत. त्यांचे वडील लष्करात कार्यरत होते. त्यावेळी त्या छावणीतील मिलिटरी एरियात राहत होत्या. ४० वर्षांपूर्वी औरंगाबादेत राहत असताना त्यांनी येथील विद्यापीठातून एम. ए. इंग्रजी ही पदवी प्राप्त केली. येथे राहूनच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय लोकप्रशासन सेवेच्या १९७३ सालच्या बॅचच्या त्या अधिकारी झाल्या. त्यांनी पसंतीने विदेश सेवा निवडली.