शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

देशासाठी महत्त्वाकांक्षी बना

By admin | Updated: June 23, 2016 01:40 IST

औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे

औरंगाबाद : इंग्रजी ही जगाची भाषा आहे. ही भाषा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे. देशासाठी प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी होऊन न थकता रात्रंदिवस काम करावे, असा सल्ला सेवानिवृत्त विदेश सचिव तथा अमेरिका, चीन येथे भारताच्या राजदूत राहिलेल्या निरुपमा राव यांनी शहरातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिला.पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने ताज हॉटेलजवळील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंटच्या सभागृहात निरुपमा राव यांचे ‘निरुपम संवाद : वेध व्यक्तिमत्त्वाचा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. केवळ महिला पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस यांच्यासाठी हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अपर्णा अमितेशकुमार, नाथ व्हॅली हायस्कूलचे प्रायार्य रणजित दास आणि मोनिका दास यांची उपस्थिती होती. याप्रसंगी निरुपमा राव म्हणाल्या की, ४० वर्षांपूर्वी मी या शहरात राहत होते. येथील विद्यापीठात एम. ए. इंग्रजीमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. या शहराशी आपले जुने नाते असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. इंटरनेट, सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमुळे आता विविध देशांच्या सीमा धूसर झाल्याचे त्यांनी नमूद केले. विदेश सेवेसाठी होती लग्न न करण्याची अटया कार्यक्रमास पोलिसांच्या गणवेशात मोठ्या प्रमाणात महिला अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, मी जेव्हा विदेश सेवेसाठी अर्ज दाखल केला तेव्हा लग्न न करण्याची अट होती. आपल्याला ही अट मान्य असल्याचे त्यात नमूद केले होते. त्यावेळी आपल्यासोबत कार्यरत असलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांना लग्नामुळे आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागले होते. पुढे दोन वर्षांनंतर ही अट रद्द झाली.प्रास्ताविक पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी के ले. सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले. आभार वाहतूक शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी मानले. (पान २ वर)कोणत्या देशात महिलांना सर्वाधिक स्वातंत्र्य आहे, असा प्रश्न एका महिला पोलिसाने विचारला असता त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याची तुमची व्याख्या काय आहे? महिलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षणाचे तसेच आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी आणि सुरक्षितता म्हणजे स्वातंत्र्य आहे, असे आपले मत आहे. त्यानुसार पाश्चिमात्य देशातील महिलांची सरासरी परिस्थिती चांगली आहे. ४चीनेही महिलांवरील बंधने हटविलेली आहेत आणि भारतातही महिलांना स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण आशियातील आपल्या शेजारील पाकिस्तान, नेपाळ, बांगला देश, श्रीलंका इ. देशांतील महिलांवर विविध बंधने असल्याचे त्यांनी नमूद केले. औरंगाबादशी ऋणानुबंधनिरुपमा राव यांचे औरंगाबादशी जुने संबंध आहेत. त्यांचे वडील लष्करात कार्यरत होते. त्यावेळी त्या छावणीतील मिलिटरी एरियात राहत होत्या. ४० वर्षांपूर्वी औरंगाबादेत राहत असताना त्यांनी येथील विद्यापीठातून एम. ए. इंग्रजी ही पदवी प्राप्त केली. येथे राहूनच त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय लोकप्रशासन सेवेच्या १९७३ सालच्या बॅचच्या त्या अधिकारी झाल्या. त्यांनी पसंतीने विदेश सेवा निवडली.