शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पुण्याचे नाव संभाजीनगर करणे हे तर्काला धरून: जोगेंद्र कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:06 IST

औरंगाबाद: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. परंतु, त्याची अंमलबजावणी पेशव्यांनी मनुस्मृतीप्रमाणे केली. त्यांना हाल हाल करून मारले. हे ...

औरंगाबाद: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. परंतु, त्याची अंमलबजावणी पेशव्यांनी मनुस्मृतीप्रमाणे केली. त्यांना हाल हाल करून मारले. हे पुणे जिल्ह्यात घडले. म्हणून पुणे जिल्ह्यालाच संभाजीनगर हे नाव देणे हे तर्काला धरून होईल, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले.

कॉंग्रेस आमचा मित्रपक्ष असला तरी आगामी सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. औरंगाबाद महापालिकेच्या किमान २१ जागा आम्ही स्वबळावर लढू,असे ते म्हणाले.

नामविस्तार दिनानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारल्याने कवाडे यांचीही सभा रद्द झाली. मात्र, त्यांनी दुपारी भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते विद्यापीठ गेटवर आले. तेथे त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास, नामांतर शहीद स्मारकास व विद्यापीठ गेटला अभिवादन केले.

नामांतराच्या संघर्षमय लढ्यांतून दलित समाज तेजस्वी व स्वाभिमानी बनला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

येत्या २६ जानेवारीपासून पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे देशभर आत्मनिर्भर अत्याचार प्रतिकार अभियान राबविण्यात येत आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्राणपणाने प्रतिकार करा, असा संदेश यातून आम्ही देऊ इच्छितो. तसेच संविधानाला मानणाऱ्या सर्व मंडळींना सोबत घेऊन संविधान बचाव आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कवाडे यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडी ही संधीसाधू व स्वार्थी लोकांची ठिसूळ संघटना आहे. तेथे कामापुरतं मामा असे लोक एकत्रित आले आहेत. आमची रिपब्लिकन चळवळ आहे. ही चळवळ प्रकाश आंबेडकर यांना का सोबत घ्यायची नाही, अशी टीका एका प्रश्नाच्या उत्तरात कवाडे यांनी केली.

जनगणनेच्या कॉलममध्ये धर्म बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलममध्ये आपापली जात लिहा, हे भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी केलेले आवाहन बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला व जातीअंताच्या संकल्पनेला छेद देणारे आहे, अशी टीका प्रा. कवाडे यांनी केली.

कृषी कायदे कसे शेतकरीविरोधी आहेत,याचे विवेचनही त्यांनी केले.

जयदीप कवाडे, गोपाळराव आटोटे, पडघन गुरुजी, अशोक जाधव, लक्ष्मण कांबळे, चरणदास इंगोले, सुमेध गायकवाड, शेषराव सातपुते, कढूबा जाधव, रामदास लोखंडे, माधव सूर्यवंशी, सदाभाऊ वेळुंजकर आदींची यावेळी उपस्थिती होती.