शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:12 IST

उत्पादनावर परिणाम, धान्यापाठोपाठ, भाज्यांची परपेठेवर मदार 

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील बरेलीची हिरवी मिरची, मध्यप्रदेशातील खांडव्याहून कोथिंबीर, हैदराबादची भेंडी व नाशिकमधून पालेभाज्या जाधववाडीतील अडत बाजारात आणण्यात येत आहेत. दुष्काळाने जिल्ह्यातील भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी धान्यापाठोपाठ भाज्याही परपेठेतून आणल्या जात आहेत. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याआधीही जिल्ह्यात दुष्काळ पडला होता; पण पालेभाज्या उगविण्यासाठी विहिरीत पाणी असत; पण आता विहिरींनी तळ गाठला आहे. गावागावांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. साहजिकच फळभाज्या व पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.  जाधववाडीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व पालेभाज्यांच्या अडत बाजारात परराज्यातून, परजिल्ह्यातून भाज्या आणल्या जात आहेत. येथील अडत व्यापारी राज्य, परराज्यातील अडत व्यापाऱ्यांच्या सतत मोबाईलवर संपर्कात आहेत.

जेथून भाज्या मिळतील तेथून आणून शहरवासीयांची गरज पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते की, येथून दिल्लीपर्यंत मिरच्या विक्रीसाठी पाठविल्या जात. मात्र, दुष्काळाने परराज्यातून हिरवी मिरची आणण्यास भाग पडत आहे. बरेली, रायपूर व नागपूर या भागांतून दररोज ५० ते ६० टन हिरव्या मिरच्या येत आहेत. होलसेलमध्ये ३० मार्चला १५ ते २० रुपये किलोने विक्री झालेली मिरची आज ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात होती. किरकोळ विक्रीत तर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची मिळत आहे, तर ढोबळी मिरची मालेगावहून आणली जात आहे. 

पहिल्यांदाच हैदराबादहून भेंडीची आवक होत आहे. शहरात भेंडीचा खप मोठ्या प्रमाणात आहे. दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी लागते. शहराच्या आसपासच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर येत असे. आता खांडवा येथून ती येत आहे. भाजीमंडईत कोथिंबिरीची गड्डी १५ ते २० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागत आहे.  काकडी, पत्ताकोबी, सिमला मिरची, मेथी, पालक आदी भाज्या नाशिक, नगर जिल्ह्यांतून पुरवल्या जात आहेत. फक्त सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात आहे, तसेच उन्हाळी कांदाही बाजारात येणार आहे. यामुळे कांदा २५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. शहराच्या चोहोबाजूंच्या ५० कि.मी. परिसरातून लिंबाची आवक होत असते. आता ते अकोल्याहून आणले जात आहे. मागील महिन्यात ३० ते ४० रुपये किलो विक्री होणारा लिंबाचा भाव आता ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

वडापावमध्ये गुजरातचा बटाटा इंदूर व आग्रा हे बटाट्याचे गढ मानले जातात. शहरातही येथील बटाटा विक्रीसाठी येत असतो. मात्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशाला मागे टाकून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन झाले आहे. पहिल्यांदा शहरात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश व गुजरात मिळून दररोज २० ट्रक (४०० टन) बटाटा येत आहे. गुजरातचा बटाटा ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल, तर उत्तर प्रदेशातील बटाटा ९०० ते १,१०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. वडापावमध्ये गुजरातचा बटाटा वापरला जात आहे, तसेच वेफर्ससाठीही बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीतून नाशिकपर्यंत बटाट्याचा ट्रक पाठविले जात आहे. -मुजीबशेठ, बटाट्याचे अडत व्यापारी

परपेठेतून आवक; महागाई आटोक्यात औरंगाबाद जिल्ह्यात फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जर परपेठेतून भाज्या शहरात आणल्या नसत्या, तर पालेभाज्यांचे भाव २५ रुपयांपेक्षा अधिक, तर फळभाज्यांचा भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत गेला असता. मात्र, परपेठेतून माल आणला जात असल्याने महागाई आटोक्यात आहे. -इलियास बागवान, फळभाज्यांचे अडत व्यापारी

टॅग्स :vegetableभाज्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार