शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:12 IST

उत्पादनावर परिणाम, धान्यापाठोपाठ, भाज्यांची परपेठेवर मदार 

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील बरेलीची हिरवी मिरची, मध्यप्रदेशातील खांडव्याहून कोथिंबीर, हैदराबादची भेंडी व नाशिकमधून पालेभाज्या जाधववाडीतील अडत बाजारात आणण्यात येत आहेत. दुष्काळाने जिल्ह्यातील भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी धान्यापाठोपाठ भाज्याही परपेठेतून आणल्या जात आहेत. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याआधीही जिल्ह्यात दुष्काळ पडला होता; पण पालेभाज्या उगविण्यासाठी विहिरीत पाणी असत; पण आता विहिरींनी तळ गाठला आहे. गावागावांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. साहजिकच फळभाज्या व पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.  जाधववाडीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व पालेभाज्यांच्या अडत बाजारात परराज्यातून, परजिल्ह्यातून भाज्या आणल्या जात आहेत. येथील अडत व्यापारी राज्य, परराज्यातील अडत व्यापाऱ्यांच्या सतत मोबाईलवर संपर्कात आहेत.

जेथून भाज्या मिळतील तेथून आणून शहरवासीयांची गरज पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते की, येथून दिल्लीपर्यंत मिरच्या विक्रीसाठी पाठविल्या जात. मात्र, दुष्काळाने परराज्यातून हिरवी मिरची आणण्यास भाग पडत आहे. बरेली, रायपूर व नागपूर या भागांतून दररोज ५० ते ६० टन हिरव्या मिरच्या येत आहेत. होलसेलमध्ये ३० मार्चला १५ ते २० रुपये किलोने विक्री झालेली मिरची आज ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात होती. किरकोळ विक्रीत तर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची मिळत आहे, तर ढोबळी मिरची मालेगावहून आणली जात आहे. 

पहिल्यांदाच हैदराबादहून भेंडीची आवक होत आहे. शहरात भेंडीचा खप मोठ्या प्रमाणात आहे. दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी लागते. शहराच्या आसपासच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर येत असे. आता खांडवा येथून ती येत आहे. भाजीमंडईत कोथिंबिरीची गड्डी १५ ते २० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागत आहे.  काकडी, पत्ताकोबी, सिमला मिरची, मेथी, पालक आदी भाज्या नाशिक, नगर जिल्ह्यांतून पुरवल्या जात आहेत. फक्त सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात आहे, तसेच उन्हाळी कांदाही बाजारात येणार आहे. यामुळे कांदा २५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. शहराच्या चोहोबाजूंच्या ५० कि.मी. परिसरातून लिंबाची आवक होत असते. आता ते अकोल्याहून आणले जात आहे. मागील महिन्यात ३० ते ४० रुपये किलो विक्री होणारा लिंबाचा भाव आता ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

वडापावमध्ये गुजरातचा बटाटा इंदूर व आग्रा हे बटाट्याचे गढ मानले जातात. शहरातही येथील बटाटा विक्रीसाठी येत असतो. मात्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशाला मागे टाकून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन झाले आहे. पहिल्यांदा शहरात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश व गुजरात मिळून दररोज २० ट्रक (४०० टन) बटाटा येत आहे. गुजरातचा बटाटा ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल, तर उत्तर प्रदेशातील बटाटा ९०० ते १,१०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. वडापावमध्ये गुजरातचा बटाटा वापरला जात आहे, तसेच वेफर्ससाठीही बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीतून नाशिकपर्यंत बटाट्याचा ट्रक पाठविले जात आहे. -मुजीबशेठ, बटाट्याचे अडत व्यापारी

परपेठेतून आवक; महागाई आटोक्यात औरंगाबाद जिल्ह्यात फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जर परपेठेतून भाज्या शहरात आणल्या नसत्या, तर पालेभाज्यांचे भाव २५ रुपयांपेक्षा अधिक, तर फळभाज्यांचा भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत गेला असता. मात्र, परपेठेतून माल आणला जात असल्याने महागाई आटोक्यात आहे. -इलियास बागवान, फळभाज्यांचे अडत व्यापारी

टॅग्स :vegetableभाज्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार