शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:12 IST

उत्पादनावर परिणाम, धान्यापाठोपाठ, भाज्यांची परपेठेवर मदार 

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील बरेलीची हिरवी मिरची, मध्यप्रदेशातील खांडव्याहून कोथिंबीर, हैदराबादची भेंडी व नाशिकमधून पालेभाज्या जाधववाडीतील अडत बाजारात आणण्यात येत आहेत. दुष्काळाने जिल्ह्यातील भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी धान्यापाठोपाठ भाज्याही परपेठेतून आणल्या जात आहेत. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याआधीही जिल्ह्यात दुष्काळ पडला होता; पण पालेभाज्या उगविण्यासाठी विहिरीत पाणी असत; पण आता विहिरींनी तळ गाठला आहे. गावागावांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. साहजिकच फळभाज्या व पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.  जाधववाडीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व पालेभाज्यांच्या अडत बाजारात परराज्यातून, परजिल्ह्यातून भाज्या आणल्या जात आहेत. येथील अडत व्यापारी राज्य, परराज्यातील अडत व्यापाऱ्यांच्या सतत मोबाईलवर संपर्कात आहेत.

जेथून भाज्या मिळतील तेथून आणून शहरवासीयांची गरज पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते की, येथून दिल्लीपर्यंत मिरच्या विक्रीसाठी पाठविल्या जात. मात्र, दुष्काळाने परराज्यातून हिरवी मिरची आणण्यास भाग पडत आहे. बरेली, रायपूर व नागपूर या भागांतून दररोज ५० ते ६० टन हिरव्या मिरच्या येत आहेत. होलसेलमध्ये ३० मार्चला १५ ते २० रुपये किलोने विक्री झालेली मिरची आज ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात होती. किरकोळ विक्रीत तर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची मिळत आहे, तर ढोबळी मिरची मालेगावहून आणली जात आहे. 

पहिल्यांदाच हैदराबादहून भेंडीची आवक होत आहे. शहरात भेंडीचा खप मोठ्या प्रमाणात आहे. दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी लागते. शहराच्या आसपासच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर येत असे. आता खांडवा येथून ती येत आहे. भाजीमंडईत कोथिंबिरीची गड्डी १५ ते २० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागत आहे.  काकडी, पत्ताकोबी, सिमला मिरची, मेथी, पालक आदी भाज्या नाशिक, नगर जिल्ह्यांतून पुरवल्या जात आहेत. फक्त सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात आहे, तसेच उन्हाळी कांदाही बाजारात येणार आहे. यामुळे कांदा २५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. शहराच्या चोहोबाजूंच्या ५० कि.मी. परिसरातून लिंबाची आवक होत असते. आता ते अकोल्याहून आणले जात आहे. मागील महिन्यात ३० ते ४० रुपये किलो विक्री होणारा लिंबाचा भाव आता ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

वडापावमध्ये गुजरातचा बटाटा इंदूर व आग्रा हे बटाट्याचे गढ मानले जातात. शहरातही येथील बटाटा विक्रीसाठी येत असतो. मात्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशाला मागे टाकून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन झाले आहे. पहिल्यांदा शहरात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश व गुजरात मिळून दररोज २० ट्रक (४०० टन) बटाटा येत आहे. गुजरातचा बटाटा ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल, तर उत्तर प्रदेशातील बटाटा ९०० ते १,१०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. वडापावमध्ये गुजरातचा बटाटा वापरला जात आहे, तसेच वेफर्ससाठीही बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीतून नाशिकपर्यंत बटाट्याचा ट्रक पाठविले जात आहे. -मुजीबशेठ, बटाट्याचे अडत व्यापारी

परपेठेतून आवक; महागाई आटोक्यात औरंगाबाद जिल्ह्यात फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जर परपेठेतून भाज्या शहरात आणल्या नसत्या, तर पालेभाज्यांचे भाव २५ रुपयांपेक्षा अधिक, तर फळभाज्यांचा भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत गेला असता. मात्र, परपेठेतून माल आणला जात असल्याने महागाई आटोक्यात आहे. -इलियास बागवान, फळभाज्यांचे अडत व्यापारी

टॅग्स :vegetableभाज्याAurangabadऔरंगाबादMarketबाजार