शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पीककर्जासाठी बँकांचा हात आखडता; शेतकरी खाजगी सावकारांच्या जाळ्यात अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 19:19 IST

राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज वाटले याचा आकडासुध्दा सहकार खात्याला या बँकांनी दिलेला नाही.

पैठण : खरीप हंगामासाठी दिलेल्या टार्गेट पैकी केवळ २०% कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी आता रब्बी हंगामासाठी मात्र आखडता हात घेतल्याने परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे दार ठोठावण्याची दुर्देवी वेळ आली आहे. राष्ट्रीयकृत बँका प्रशासनास जुमानत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात कर्ज पडत नसल्याचे वास्तव सहकार खात्याचे अधिकारी खाजगीत व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांना कारवाईचा अधिकार असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

पैठण तालुक्यात खरिपाच्या सुरवातीला कडक दुष्काळ तर शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी होऊन शेतकरी मोडून पडला. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५१ कोटी कर्ज वाटपाचे उद्देश तालुक्यातील बँकांना देण्यात आले होते.पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ शाखा असून या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीची संख्या ९० ईतकी आहे. सोसायटी अंतर्गत ४५९७५ सभासद शेतकरी आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २१ आहे. खाजगी व व्यापारी बँका ५ असून ग्रामीण बँका ४ आहेत. या बँकांनी व्यवस्थित कर्जवाटप केलेतर शासनाचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट सहज साध्य होते.  या बँका पैकी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोडली तर ईतर बँका मात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करत नसल्याचे दिसून आले आहे. खरीपाच्या ५१ कोटी पैकी पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने १२ कोटी ३१ लाख ६६ हजार रूपयाचे कर्ज ३४६६ शेतकऱ्यांना वाटले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज वाटले याचा आकडासुध्दा सहकार खात्याला या बँकांनी दिलेला नाही.

रब्बीसाठी तर नकारचरब्बी हंगामासाठी १० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.परंतू आजपर्यंत केवळ १ कोटी ३१ लाख रूपयाचे कर्ज वाटप ३३० शेतकऱ्यांना झाले आहे. परिस्थितीने शेतकऱ्यांच्या शेतात व पदरातही आता काहीच शिल्लक उरलेले नाही. रब्बीचे कर्ज पदरात पडले तरच पेरणी होईल अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीतून सावरून न्यायचे असेल तर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आतातरी शिल्लक राहिलेला दिसून येत नाही. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी अप्रत्यक्षपणे नकार देत असून बँकेत  चकरा माराव्या लागत असल्याचे दत्ता फासाटे,  सुभाष म्हस्के, सुदाम बोबडे, आकाश सरोदे, पिराजी गायकवाड, विलास निर्मळ, बालकिसन गोर्डे, बापू कदम अशा अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.

बँकांचा प्रतिसाद नाही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक व ईतर सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना व्यवस्थित कर्ज वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका या कर्जवाटपास प्रतिसाद देत नाही असे दिसून आले आहे. बँकनिहाय कर्ज वाटपा बाबत राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. - दिलीप गौंडर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पैठण

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीagricultureशेतीbankबँक