शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

बँक निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:05 IST

राजकारणाच्या वाटांवर चकवे असतात आणि कसलेल्या राजकारण्यांना चकवा गाठतोच. चित्तेपिंपळगावच्या वाटेने निघालेली औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्तासुंदरी अशा काही ...

राजकारणाच्या वाटांवर चकवे असतात आणि कसलेल्या राजकारण्यांना चकवा गाठतोच. चित्तेपिंपळगावच्या वाटेने निघालेली औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची सत्तासुंदरी अशा काही चकव्यात अडकली आणि तिला दिशाभूल पडली. यातच दक्षिणेकडे जाणारी सत्तासुंदरी थेट उत्तरेला सिल्लोडमध्ये येऊन पोहोचली आणि सोयगावमार्गे नागदमध्ये पुन्हा स्थिरावली. या सत्तासुंदरीचा अनेक वर्षांपासूनचा गड हा नागद असला तरी, प्रत्येकवेळी वेगळी दिशा घेत ती नागदमध्ये विसावते. दोन वर्षांपूर्वी तिने तिरंगा सोडून भगवे वस्त्र धारण केले आणि आता तर वाघावर स्वार झाली. वाघाची स्वारी करणे सोपे; पण उतरणे अवघड, अशी जुनी-जाणती माणसे म्हणतात. म्हणून वाघावर स्वार झालेले नितीन पाटील आपली मांड कशी पक्की ठेवतात, याकडेच लक्ष राहील.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसला आणि नितीन पाटलांनी परवा ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधले आणि आता बँकेवर शिवसेनेची सत्ता आली, अशी घोषणा सेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी केली. त्यांच्या घोषणेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बँकेची निवडणूक पक्षीय पातळीवर लढली गेली नाही. भाजपचे आमदार आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकारणी हरिभाऊ बागडे यांनी आज सत्तेवर आलेल्या पॅनलचे पितृत्व स्वीकारले होते; परंतु तेच पराभूत झाले. त्यांच्या पराभवाभोवती संशयाचा भोवरा फिरतो आहे. नानांना चकवा केला, अशी चर्चा सध्या भाजपच्या वर्तुळात रंगली आहे. नानांच्या शेतकरी विकास पॅनेलचा चेहरा नसलेले उमेदवार निवडून येतात; पण नानांचा पराभव होतो, म्हणजे कुठे तरी पाणी मुरले, असे म्हणायला वाव आहे. कारण जिल्हा बँकेच्या राजकारणात इतकी वर्षे राहूनही त्यांचा पराभव कसा होऊ शकतो? म्हणजे नानांचा कोणीतरी चकवा केला असण्याची दाट शक्यता आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर बहुमत मिळालेल्या पॅनलच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर, आज ना उद्या नितीन पाटील मातोश्रीच्या वाटेवर दिसतील, याचा अंदाज आला होता; पण हे इतक्या झटपट घडेल याची खात्री नव्हती. याचा अर्थ असा की, निवडणुकीपूर्वीच अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून त्यांचे नाव जाहीर केले होते; पण निवडून आल्यानंतर तुम्ही शिवसेनेत आलात तरच अध्यक्षपद मिळेल, अशी अट घातली होती, हे नक्की आणि तातडीने शिवबंधनाचा कार्यक्रम उरकून घेतला. हरिभाऊ बागडे निवडून आले असते, तर नितीन पाटील शिवसेनेत गेले असते का, हा आजचा नवा प्रश्न आहे.

बँकेचा कारभार निर्वेध करता यावा यासाठी दोन वर्षांपूर्वी नितीन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, कारण त्यावेळी फडणवीसांचे सरकार सत्तेवर होते. आता त्यांनी हाच सोयीचा मार्ग स्वीकारलेला दिसतो.

जिल्ह्याचे राजकारण बँकेभोवती फिरते. आता या निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणाची नवी मांडणी आकार घेईल. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे मंत्रीद्वय आणि आ. अंबादास दानवे यांच्या हाती ही सूत्रे आली. जिल्ह्यात सेनेचे आठ आमदार आहेत. शिवाय बँकेच्या राजकारणात बागडेंची अनुपस्थिती. त्यातही या तिघांपैकी भुमरेंचा विचार केला, तर आज सेनेचे सर्वांत ज्येष्ठ आमदार तेच आहेत; पण ३० वर्षांच्या राजकारणात ते पैठणच्या बाहेर आले नाहीत. अंबादास दानवे हे १७ वर्षांपासून जिल्हाप्रमुख असून सेनेचे जिल्हा राजकारण त्यांनी आपल्या कह्यात ठेवले आहे. एवढा प्रदीर्घ काळ जिल्हाप्रमुख राहिलेली व्यक्ती सेनेत नाही आणि त्यांना बदलण्याचा विचार असला तरी, सेनेसमोर पर्याय सध्या तरी दिसत नाही.

या दोघांसोबत विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत आलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा लेखाजोखा तपासला, तर राजकारणात ते ३० वर्षांपासून आहेत. आपले स्वत:चे स्थान निर्माण करण्याइतके ते धोरणी असल्याने केवळ दीड वर्षात त्यांनी सेनेत स्थान निर्माण केले. शिवाय ‘मातोश्री’वरील उठबस वाढली आहे. थेट पक्षप्रमुखांशी संपर्क महत्त्वाचा ठरतो. आपला मतदारसंघ मजबूत ठेवत त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणात प्रभाव टिकवून ठेवत, आता जिल्हा बँकेचे राजकारण हाती घेतले. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणाचा वेगळा पट लवकरच दिसेल. नवा गडी नवे राज्य या न्यायाने आता राजकारणाच्या पटावर नवी प्यादी खेळताना दिसतील. ही नवी मांडणी करण्यासाठी कोरोनाची आपत्ती इष्टापत्ती ठरली आहे. फुरसतीने ही मांडणी होईल. बँकेची सत्तासुंदरी नागद गडावर दीर्घकाळ विसावण्याची ही चिन्हे आहेत.

-सुधीर महाजन