जालना : सर्व केंद्रिय कामगार संघटना व फेडरेशन कृती समितीने विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.कामगार संघटनांनी बुधवारी बंदची हाक दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील कृती समितीने केलेल्या आवाहनास अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे विविध शासकीय कार्यालयातून दिसून आले. दरम्यान कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कामगार कायद्यातील विरोध बदल रद्द करा, किमान वेतन १५ हजार रुपये निश्चित करा, महागाई भत्ता लागू करावा, कंत्राटी कामगारांना कायम करा, समान कामाला समान न्याय द्या, रेशनचे स्वस्त धान्य व स्वस्त गॅस ग्रामीण व शहरी भागातील गरिबांना द्यावे, माफक दरात घरे उपलब्ध करुन द्यावीत तसेच जालना शहरातील उद्योगात स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. निवेदनावर अण्णा सावंत, पी.एम.कुलकर्णी, देवीदास जिगे, विश्वेश्वर स्वामी, राधेश्याम जैस्वाल, डॉ. सुनंदा तिडके, मधुकर मोकळे, के. एस. पडोळ, जगन डोळसे, तुकारा मंडल, जी. जे. पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.शासकीय तंत्रनिकेतनमधील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होऊन शंभर टक्के प्रतिसाद दिला. संप यशस्वी करण्यासाठी चं.बा. उदावंत, एस.टी.भालेराव, भ.ना. फोलाणे, एस.पी.दाभाडकर, रा.र.शाह यांनी प्रयत्न केले.राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेने संपात सहभाग नोंदविला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनावर अध्यक्ष व्ही.जी.पाटील, एस.एम.जोशी, याह्या पठाण, एन.एन. चिलकरवार, गणेश कुलकर्णी, टी. आर. तम्हणे,
बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Updated: September 3, 2015 00:27 IST