शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

वांग्याच्या भाजीतून केला विषप्रयोग

By admin | Updated: June 5, 2016 00:45 IST

औरंगाबाद : वांग्याच्या भाजीतून धोत्र्याच्या बिया खाऊ घालून पत्नी संगीता आव्हाड हिने मुलाच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद : वांग्याच्या भाजीतून धोत्र्याच्या बिया खाऊ घालून पत्नी संगीता आव्हाड हिने मुलाच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. फरार झालेली मृताची पत्नी आणि मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक जालना येथे गेले आहे.मुकुं दवाडीतील राजनगर येथील रहिवासी विलास दादाराव आव्हाड (४०) या मजुराचा दहा ते बारा दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि मुलाने खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीशेजारील एका भूखंडावरील पत्र्याच्या घरात पुरून टाकण्यात आला होता. विलास यांच्या सुनेने याबाबतची माहिती त्यांच्या आईला दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी या खुनाचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मृताची पत्नी संगीता आणि मुलगा किशोर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सायंकाळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आला. शनिवारी सकाळी या मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले. तहसीलदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी पंचनामा केला. खुनाचे बिंग फोडणारी मृताची सून सुरेखा ही शुक्रवारी रात्रीच पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिला ही घटना समजल्यामुळे ती सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) येथे माहेरी निघून गेली होती. पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. तिने दिलेल्या माहितीनुसार विलास आव्हाड हे घटनेच्या दिवशी कामावरून आले. त्यादिवशी त्यांनी ८०० रुपये मजुरी आरोपी संगीताकडे दिली. विलास यांना कोणतेही व्यसन नव्हते. असे असताना संगीता ही त्यांना सतत त्रास देत असे. घटनेच्या दिवशी संगीताने विलास यांच्यासाठी स्वतंत्र वांग्याची भाजी बनविली. या भाजीसाठी तिने पाट्यावर मसाला वाटला. त्यावेळी तिने धोत्र्याच्या बियाही त्या मसाल्यासोबत रगडल्या. त्या मसाल्याची भाजी तयार करून ती केवळ विलास यांना खाण्यास दिली. नेहमी घरात झोपणारी संगीता ही त्या रात्री पतीसोबत घराच्या अंगणात झोपली. रात्री दहा वाजेच्या सुमारास विलास यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर किशोरने शेजारील महेश मोहाडकर याची रिक्षा आणली. त्या रिक्षातून संगीता विलासला घेऊन घटनास्थळी गेली. रात्रभर खोदला खड्डाआरोपी संगीता आणि किशोर यांनी रात्रभर खड्डा खोदून विलासला त्यात पुरले. सकाळी पाच वाजता ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे जाऊन विलासच्या प्रेतावर मुरूम टाकला.