शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबल्याने बियाणे विक्री व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:30 IST

हवामान खात्याने दिशाभूल करू नये

ठळक मुद्देनिम्म्याहून कमी उलाढाल धूळपेरणी वाया जाण्याची भीती 

औरंगाबाद : खरीप हंगामाला सुरुवात होऊन १३ दिवस झाले, पण मान्सून अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडील तालुक्यात २० ते ३० टक्के शेतकऱ्यांनी धूळपेरणी करून ठेवली आहे. ती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी २०० कोटींचे बियाणे खरीप हंगामात विकले जाते. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक बियाणे अजूनही विक्रेत्यांकडेच पडून आहे. मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर बियाणे उद्योगालाही बसणार आहे. 

खरीप हंगामाला ७ जूनपासून सुरुवात झाली, पण मान्सून लांबल्याने शेतकरी व बियाणे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. औरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दरवर्षी कपाशी ११० कोटी, मका ६० कोटी व इतर बियाणे ३० कोटी, असे एकूण २०० कोटींचे बियाणे विकले जाते. फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, कन्नड तालुक्यांत एकूण बियाणे विक्रीपैकी ६० टक्के बियाणे विक्री झाले आहे. पूर्व मोसमी पावसामुळे या भागातील २० टक्के शेतामध्ये धूळपेरणी करण्यात आली आहे. या भागात कपाशी व मका बियाणे जास्त विक्री झाले तर औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांमध्ये आजपर्यंत २० टक्केच बियाणे विक्री झाले आहे. 

येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही तर धूळपेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, जर जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही तर मूग व उडीद ऐवजी तूर व बाजरीचा पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. जिल्ह्यात सुमारे १५०० बियाणे, खत विक्रेते आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे अजूनही उधार दिलेल्या बियाणांची रक्कम मिळाली नाही. यंदाही विक्रेत्यांनी अनेक  शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे दिले आहे. पाऊस आला नाही तर शेतकरी हतबल होईल व बियाणे विक्रेतेही आर्थिक अडचणीत येतील. यातील अनेकांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

हवामान खात्याने दिशाभूल करू नयेऔरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हवामान खात्याकडून मान्सूनसंदर्भात सतत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. चॅनलवरही त्याचे विश्लेषण दाखविले जात आहे. कधी २४ जुलै नंतर मान्सून सक्रिय होणार, असा अंदाज वर्तविला जात आहे तर कधी दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होणार असे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. इंग्लंडमध्ये विश्वकप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. तेथील हवामान विभाग पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करीत आहे. तसाच अचूक अंदाज हवामान विभागाने वर्तवावा, दिशाभूल करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस