शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

मान्सून लांबल्याने बियाणे विक्री व्यापार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 19:30 IST

हवामान खात्याने दिशाभूल करू नये

ठळक मुद्देनिम्म्याहून कमी उलाढाल धूळपेरणी वाया जाण्याची भीती 

औरंगाबाद : खरीप हंगामाला सुरुवात होऊन १३ दिवस झाले, पण मान्सून अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. मान्सूनपूर्व पावसाच्या जोरावर जिल्ह्याच्या उत्तर दिशेकडील तालुक्यात २० ते ३० टक्के शेतकऱ्यांनी धूळपेरणी करून ठेवली आहे. ती वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरवर्षी २०० कोटींचे बियाणे खरीप हंगामात विकले जाते. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक बियाणे अजूनही विक्रेत्यांकडेच पडून आहे. मान्सून लांबल्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर बियाणे उद्योगालाही बसणार आहे. 

खरीप हंगामाला ७ जूनपासून सुरुवात झाली, पण मान्सून लांबल्याने शेतकरी व बियाणे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. औरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दरवर्षी कपाशी ११० कोटी, मका ६० कोटी व इतर बियाणे ३० कोटी, असे एकूण २०० कोटींचे बियाणे विकले जाते. फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, कन्नड तालुक्यांत एकूण बियाणे विक्रीपैकी ६० टक्के बियाणे विक्री झाले आहे. पूर्व मोसमी पावसामुळे या भागातील २० टक्के शेतामध्ये धूळपेरणी करण्यात आली आहे. या भागात कपाशी व मका बियाणे जास्त विक्री झाले तर औरंगाबाद, पैठण, वैजापूर, गंगापूर या तालुक्यांमध्ये आजपर्यंत २० टक्केच बियाणे विक्री झाले आहे. 

येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही तर धूळपेरणी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, जर जूनअखेरपर्यंत पाऊस पडला नाही तर मूग व उडीद ऐवजी तूर व बाजरीचा पेरा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढेल. जिल्ह्यात सुमारे १५०० बियाणे, खत विक्रेते आहेत. मागील वर्षी दुष्काळामुळे अजूनही उधार दिलेल्या बियाणांची रक्कम मिळाली नाही. यंदाही विक्रेत्यांनी अनेक  शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे दिले आहे. पाऊस आला नाही तर शेतकरी हतबल होईल व बियाणे विक्रेतेही आर्थिक अडचणीत येतील. यातील अनेकांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

हवामान खात्याने दिशाभूल करू नयेऔरंगाबाद जिल्हा कृषी साहित्य विक्रेते संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हवामान खात्याकडून मान्सूनसंदर्भात सतत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. चॅनलवरही त्याचे विश्लेषण दाखविले जात आहे. कधी २४ जुलै नंतर मान्सून सक्रिय होणार, असा अंदाज वर्तविला जात आहे तर कधी दोन ते तीन दिवसांत मान्सून दाखल होणार असे सांगितले जात आहे. यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला आहे. इंग्लंडमध्ये विश्वकप क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. तेथील हवामान विभाग पावसाचा अचूक अंदाज व्यक्त करीत आहे. तसाच अचूक अंदाज हवामान विभागाने वर्तवावा, दिशाभूल करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस