शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रमजाननिम्मित औरंगाबादेत बनतो 'बम्बय्या' हलवा पराठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:25 IST

मुंबईचा ‘स्पेशल’ असणारा हा हलवा पराठा औरंगाबादकरांना खाऊ घालण्यासाठी शेफ कुर्शीद शेख खास मुंबईहून दरवर्षी रमजान महिन्यात औरंगाबादेत येतात.

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : पराठा म्हटल्यावर सहजपणे डोळ्यासमोर येतो त्या आकाराच्या कित्येकपट मोठा, अगदी परातही छोटी दिसेल एवढा मोठा पराठा कुर्शीद शेख आपल्या हातांची लयबद्ध हालचाल करीत बनवतात. मग भल्या मोठ्या कढईत तापलेल्या तेलात तो हळुवारपणे सोडतात. चर्र आवाज करीत पराठा तेलाशी सामना करतो आणि त्याच्या सुवासाने खवय्यांच्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटते.

मुंबईचा ‘स्पेशल’ असणारा हा हलवा पराठा औरंगाबादकरांना खाऊ घालण्यासाठी शेफ कुर्शीद शेख खास मुंबईहून दरवर्षी रमजान महिन्यात औरंगाबादेत येतात. मागील आठ वर्षांपासून ते येथील खवय्यांना हा पराठा खाऊ घालून संतुष्ट करीत आहेत.हलवा पराठा म्हणजे पाणी, तेल, मीठ आणि मैदा यापासून बनविलेला पराठा आणि साखर, रवा, तूप आणि खवा यापासून बनविलेला हलवा होय. रमजानमध्ये दररोज वीस किलो मैदा आणि तीन ते चार किलो रवा एवढे साहित्य वापरून बनविलेला हलवा पराठा चालता-बोलता संपून जातो, असे कुर्शीद यांनी सांगितले.

मीठ, मैदा आणि पाणी हे पदार्थ एकमेकांत मिसळून हा पदार्थ बनविण्यास सुरुवात होते. हे पदार्थ कसे मळले जातात आणि एकमेकांमध्ये किती पद्धतशीरपणे सामावले जातात, यावर पराठ्याचे ताणले जाणे अवलंबून असते. त्यामुळे कुर्शीद  पाऊण ते एक तास मेहनत घेऊन हे मिश्रण मळतात. यावेळी घामाने थपथपलेल्या कुर्शीद यांना पाहणे म्हणजेच हा पदार्थ किती लज्जतदार होणार याची झलक  ठरते. या मिश्रणापासून त्यांनी अंदाजे एक ते सव्वा किलो वजनाचे लोण्यासारखे मऊसूत गोळे बनविले.

हे गोळे बनविताना मातीचा घट उलटा पकडून हातात खेळवावा, तशा पद्धतीने कुर्शीद गोळा एका हातातून दुसºया हातात नाचवत होते. हालचालीतली ही सुसूत्रता पाहणेही रंजकदार ठरले. असे कित्येक गोळे बनवून त्यांनी त्यावर तेल शिंपडले आणि लहान बाळाला पावडर लावावी त्याप्रमाणे गोळ्यांवर हळुवार हात फिरवून ते पसरवले.

ओल्या कपड्याखाली सर्व गोळे झाकून ठेवले आणि तासाभराने गोळा या हातावरून त्या हातावर ताणत त्यांनी पराठा पसरविण्यास सुरुवात केली. हातांची ही नजाकतपूर्ण हालचाल पाहून नृत्य सुरू असल्याचा भास होतो. हा भलामोठा पराठा नंतर तळला जातो.पराठ्यांचा हा खेळ सुरू असेपर्यंत त्यांचे साथीदार अस्सल तूप, खवा, रवा यापासून हलवा तयार करतात. त्यात टाकलेला केशरी रंग आणि तुपामुळे आलेली चमक यामुळे हा हलवा अधिकच खुलून दिसतो. सुकामेवा, खोबरे, खजूर आणि चेरी यांचा वापर करून सुशोभित केलेला हा हलवा खवय्ये पराठ्यासोबत चाखतात आणि डोळे मिटून तोंडभर पसरलेल्या या सुखद चवीचा अनुभव घेतात.

 

टॅग्स :Ramzanरमजानfoodअन्नAurangabadऔरंगाबाद