शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

रमजाननिम्मित औरंगाबादेत बनतो 'बम्बय्या' हलवा पराठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 14:25 IST

मुंबईचा ‘स्पेशल’ असणारा हा हलवा पराठा औरंगाबादकरांना खाऊ घालण्यासाठी शेफ कुर्शीद शेख खास मुंबईहून दरवर्षी रमजान महिन्यात औरंगाबादेत येतात.

- ऋचिका पालोदकर

औरंगाबाद : पराठा म्हटल्यावर सहजपणे डोळ्यासमोर येतो त्या आकाराच्या कित्येकपट मोठा, अगदी परातही छोटी दिसेल एवढा मोठा पराठा कुर्शीद शेख आपल्या हातांची लयबद्ध हालचाल करीत बनवतात. मग भल्या मोठ्या कढईत तापलेल्या तेलात तो हळुवारपणे सोडतात. चर्र आवाज करीत पराठा तेलाशी सामना करतो आणि त्याच्या सुवासाने खवय्यांच्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटते.

मुंबईचा ‘स्पेशल’ असणारा हा हलवा पराठा औरंगाबादकरांना खाऊ घालण्यासाठी शेफ कुर्शीद शेख खास मुंबईहून दरवर्षी रमजान महिन्यात औरंगाबादेत येतात. मागील आठ वर्षांपासून ते येथील खवय्यांना हा पराठा खाऊ घालून संतुष्ट करीत आहेत.हलवा पराठा म्हणजे पाणी, तेल, मीठ आणि मैदा यापासून बनविलेला पराठा आणि साखर, रवा, तूप आणि खवा यापासून बनविलेला हलवा होय. रमजानमध्ये दररोज वीस किलो मैदा आणि तीन ते चार किलो रवा एवढे साहित्य वापरून बनविलेला हलवा पराठा चालता-बोलता संपून जातो, असे कुर्शीद यांनी सांगितले.

मीठ, मैदा आणि पाणी हे पदार्थ एकमेकांत मिसळून हा पदार्थ बनविण्यास सुरुवात होते. हे पदार्थ कसे मळले जातात आणि एकमेकांमध्ये किती पद्धतशीरपणे सामावले जातात, यावर पराठ्याचे ताणले जाणे अवलंबून असते. त्यामुळे कुर्शीद  पाऊण ते एक तास मेहनत घेऊन हे मिश्रण मळतात. यावेळी घामाने थपथपलेल्या कुर्शीद यांना पाहणे म्हणजेच हा पदार्थ किती लज्जतदार होणार याची झलक  ठरते. या मिश्रणापासून त्यांनी अंदाजे एक ते सव्वा किलो वजनाचे लोण्यासारखे मऊसूत गोळे बनविले.

हे गोळे बनविताना मातीचा घट उलटा पकडून हातात खेळवावा, तशा पद्धतीने कुर्शीद गोळा एका हातातून दुसºया हातात नाचवत होते. हालचालीतली ही सुसूत्रता पाहणेही रंजकदार ठरले. असे कित्येक गोळे बनवून त्यांनी त्यावर तेल शिंपडले आणि लहान बाळाला पावडर लावावी त्याप्रमाणे गोळ्यांवर हळुवार हात फिरवून ते पसरवले.

ओल्या कपड्याखाली सर्व गोळे झाकून ठेवले आणि तासाभराने गोळा या हातावरून त्या हातावर ताणत त्यांनी पराठा पसरविण्यास सुरुवात केली. हातांची ही नजाकतपूर्ण हालचाल पाहून नृत्य सुरू असल्याचा भास होतो. हा भलामोठा पराठा नंतर तळला जातो.पराठ्यांचा हा खेळ सुरू असेपर्यंत त्यांचे साथीदार अस्सल तूप, खवा, रवा यापासून हलवा तयार करतात. त्यात टाकलेला केशरी रंग आणि तुपामुळे आलेली चमक यामुळे हा हलवा अधिकच खुलून दिसतो. सुकामेवा, खोबरे, खजूर आणि चेरी यांचा वापर करून सुशोभित केलेला हा हलवा खवय्ये पराठ्यासोबत चाखतात आणि डोळे मिटून तोंडभर पसरलेल्या या सुखद चवीचा अनुभव घेतात.

 

टॅग्स :Ramzanरमजानfoodअन्नAurangabadऔरंगाबाद