शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा चिंताग्रस्त

By admin | Updated: June 21, 2014 00:57 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड मृग नक्षत्राला जवळपास पंधरा दिवस उलटले तरी पावसाने हजेरी लावली नाही़ पेरणी कशा करायची, पाऊस कधी पडणार, या चिंतेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे़

श्रीनिवास भोसले, नांदेडमृग नक्षत्राला जवळपास पंधरा दिवस उलटले तरी पावसाने हजेरी लावली नाही़ पेरणी कशा करायची, पाऊस कधी पडणार, या चिंतेने आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाची धाकधूक वाढली आहे़जिल्ह्यात २०११ मध्ये १ जून ते १९ जून या कालावधीत एकूण २०६ तर सरासरी १२़ ८८ मि़ मी़ पर्जन्यमान झाले होते़ यावेळी जूनमध्ये देगलूर तालुक्यात सर्वाधिक ५१ मि़ मी तर भोकर तालुक्यात पावसाने हजेरी देखीललावली नव्हती़ २०१२ मध्ये निसर्गाने साथ दिली नव्हती त्यावेळी २० जूनपर्यंत पावसाचे दर्शनही झाले नव्हते़ मागील वर्षी २०१३ मध्ये निसर्गाने बऱ्यापैकी साथ दिल्याने आजघडीला जवळपास पेरण्या आटोपल्या होत्या़ तर बहुतांश शेतामध्ये पिके डोलायला लागली होती़ १ ते १९ जून २०१३ या कालावधीत जिल्ह्यात एकूण २२९०़६३ मि़ मी तर १४३़१६ एवढे सरासरी पर्जन्यमान झाले होते़ यावर्षी पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे़ आजपर्यंत नांदेड जिल्ह्यात एकूण २५़३४ मी़ मी़ पाऊस झाला आहे़ यामध्ये नांदेड- १०़ ३२ मि़ मी़, कंधार- ४५़ ६६, भोकर- ३५़ ९५, लोहा- २७़ १७, मुदखेड- ८़ ६६, उमरी- १३़ ३७, अर्धापूर- ४ मि़ मी़, देगलूर- २६़१८, बिलोली- २५, मुखेड- ५०़ ७२, धर्माबाद- ६६, नायगाव- १९़ ८, किनवट- २७़ ८६, हदगाव- ८़ ४९, माहूर- २५़ ५ तर हिमायतनगर तालुक्यात १०़ ३४ मि़ मी़ पाऊस झाला आहे़ आजपर्यंत सर्वाधिक पाऊस धर्माबाद तालुक्यात ६६ मि़ मी़ झाला तर अर्धापूर तालुक्यात सर्वात कमी ४ मि़ मी़ झाला आहे़ जिल्ह्यात २०१० मध्ये १०९ टक्के, २०११ मध्ये ७२़९२ टक्के तर २०१२ मध्ये ६९़१९ टक्के पाऊस झाला होता़ गतवर्षी २०१३ मध्ये ११४़ १७ टक्के पाऊस झाला होता़ या कालावधीत ९० टक्के पेरण्या आटोपल्या होत्या़गतवर्षी ९५ टक्के पेरणीगतवर्षी २८ जूनअखेर जिल्ह्यात ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली होती़ यामध्ये ज्वारी ७१ हजार ८०० हेक्टर, तुर ५० हजार ३०० हजार हे., मूग २५ हजार हे., उडीद २८ हजार १०० हेक्टर, सोयाबीन २ लाख ३३ हजार ९०० हे., गळीत धान्य १९०० हे., कापूस २ लाख ५९ हजार २०० हे.प्रमाणे पिकांची ६ लाख ७६ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली होती़ यावर्षी तुरळक ठिकाणी झाल्याचे चित्र आहे़ ही पेरणी काळ्या पाण्यावर केली़ पावसाला उशीर झाल्यास पदरमोड करुन बियाणे खरेदी केलेल्या शेतकऱ्यांवर संकटच कोसळेल़शेतकऱ्यांची झोप उडाली पावसाअभावी शेतकऱ्यांची झोप उडाली असून रात्रीच्या वेळी उशिरा गावात गेले तर गाव सामसूम झाल्याचे दिसते़ मात्र, आज मध्यरात्रीपर्यंत गावात गेले तरी चावडीवर लोक पहायला मिळत आहेत़ दिवस - रात्र शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागलेले आहेत़ शिक्षणाची निराशा निसर्गाच्या आशेवर स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षीचे आर्थिक नियोजन लावता येत नाही़ या स्थितीला पेरणी नाही तर पीक काय येईल, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे़ मुलांना गावातील इंग्रजी शाळेत अथवा शहरात शिक्षणासाठी ठेवण्याची हिम्मत केवळ शेतीच्या जोरावर शेतकरी करतो़ सध्या सर्वत्र प्रवेशाची धांदल सुरू असली तरी शाळा, महाविद्यालयांत नेहमीसारखी गर्दी दिसत नाही़ उन्हाळी कापूस़़़ बहुतांश शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच काळ्या पाण्यावर कापसाची लागवड केली़ दीड महिन्यांपासून कापूस जोपासता जोपासता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहेत़ येत्या आठवडाभरात मोठा पाऊस नाही झाला तर हे पीक जोपासणेही कठीण होणार आहे़ चाऱ्याचा प्रश्न गंभीऱ़़ ज्या भागात आजघडीला पावसाने हजेरीदेखील लावली नाही़ अशा भागात जनावरांच्या चाऱ्यांचा आणि पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे़ जूनच्या शेवटी माळरान, पडीक जमिनीमध्ये गवत वाढलेले असते, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न मिटत असतो़ परंतु आज स्थिती वेगळी असून एकही मोठा पाऊस झाला नसल्याने चाऱ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़