शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

‘बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती; शिक्षणव्रती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:59 IST

बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस :‘नीतिधुरंधर’चे थाटात प्रकाशन ; तुकाराम नाट्यगृह खचाखच भरले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बाळासाहेब पवार आध्यात्मिक, धार्मिक वृत्तीचे होते. मात्र, सनातनी नव्हते. त्यांनी संस्कृती-परंपरा जोपासली होती. अनेक साधू-संतांची पूजा केली; पण ते खरे ‘सेक्युलर’ होते. त्यांच्यात ढोंगीपणा नव्हता. ते जाती व धर्मभेद करणारे नव्हते. सहकारमहर्षी वा शिक्षणमहर्षी असणे वाईट नाही; परंतु बाळासाहेब पवार हे खरे सहकारव्रती होते व खरे शिक्षणव्रती होते. मराठवाड्याच्या न्याय्य हक्कांसाठी ते सतत निर्भीडपणे लढत राहिले. मराठवाड्याच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा राहिला. नव्या पिढीला अशा या बाळासाहेब पवारांपासून सतत प्रेरणा मिळत राहील, असे उद्गार आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.जगद्गुरू तुकाराम महाराज नाट्यगृहात ते ‘ नीतिधुरंधर: बाळासाहेब पवार’ या महावीर जोंधळे लिखित चरित्रगं्रथाचे प्रकाशन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे होते. केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री जयंतराव पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, खा. चंद्रकांत खैरे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांची यावेळी भाषणे झाली. लेखक जोंधळे यांनी प्रास्ताविक केले.ते व्रतस्थ जीवन जगले....देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा माझा वैयक्तिक परिचय नव्हता; परंतु औरंगाबाद-जालना जिल्ह्यांत त्यांचा वारंवार उल्लेख ऐकायला मिळतो. हरिभाऊ बागडे यांच्या तोंडून तर बाळासाहेबांचे नाव मी सतत ऐकत असतो.पुस्तक वाचल्यानंतर या माणसाची उंची काय होती, याची कल्पना येते. अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती न सोडता, स्वत:साठी न जगता, बाळासाहेबांनी नेतृत्वाची एक फळी तयार केली. ते व्रतस्थ जीवन जगले. ते मुख्यमंत्री हटवण्याचे काम करीत होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते मुख्यमंत्री कसा असावा, नवा मुख्यमंत्री कोण असावा हे ठरवीत होते व त्यासाठी संघर्ष करीत होते.संघर्षातही बाळासाहेब पवार यांचा संयम ढळत नव्हता, हा पैलूही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केला. बाळासाहेब पवार हे विलक्षण व अलौकिक लोकनेते होते. मराठवाड्यावर सातत्याने अन्याय झाला, ही खंत उराशी बाळगून ते त्याविरुद्ध लढत राहिले. अनेक सहकारी साखर कारखाने उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला, हे सुरेश प्रभू यांनी नमूद केले. रावसाहेब दानवे यांनी बाळासाहेबांचे माझ्यावर कसे प्रेम होते, हे सांगितले व मी काँग्रेसमध्ये यावा यासाठी कसे कसे प्रयत्न केले, यावरही प्रकाश टाकला. विश्वनाथ दाशरथे यांनी गायलेल्या वैष्णव जन तो तेणे कहिए या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली व शेवटी जे का रंजले गांजले या भजनाने शेवट झाला. मानसिंग पवार, अजय शहा, किशोर शितोळे, प्रफुल्ल मालानी, जगन्नाथ काळे, आदेशपालसिंह छाबडा, दयाराम बसैय्ये, सुरेश वाकडे, प्रमोद खैरनार व विवेक जैस्वाल आदींनी तुकोबाची पगडी देऊन पाहुण्यांचे स्वागत केले. रूपेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.जयंतराव पाटील हे मुख्यमंत्र्यांकडे बघत म्हणाले, बाळासाहेब पवार यांचा मुख्यमंत्री हटवण्यात हातखंडा होता. आज ते हयात नाहीत. ( हंशा)रावसाहेब दानवे यावर कोटी न करतील तर नवल! व्यासपीठावर बसलेले जयंत पाटील व विखे पाटील यांच्याकडे बघत ते म्हणाले, बाळासाहेब पवार यांच्यासारखे तुम्ही दोन दोन जण असून काहीही उपयोग नाही. फडणवीस उत्तम काम करीत आहेत.मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र यावर एवढे म्हटले की, बाळासाहेब पवार हे मुख्यमंत्री हटवणारे म्हणणे चुकीचे आहे, तर ते नवा मुख्यमंत्री कसा असावा, असा आग्रह धरणारे होते.