शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बाभळीच्या निर्णयाचा फटका जायकवाडीला बसण्याची शक्यता; गोदावरीपात्रातील प्रकल्पांची तहान वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:45 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले.

ठळक मुद्देबंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ०़५६ टीएमसी जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला.

- विकास राऊत 

औरंगाबाद : सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले. बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ०़५६ टीएमसी जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा बंधारा कोरडाठाक झाला. याचा परिणाम जायकवाडी आणि गोदावरीपात्रावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन २४ दिवसांचा कालावधी संपला आहे. जून महिन्यात मराठवाड्यात समाधानकारक असा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच बाभळीतील पाणी तेलंगणात गेले आहे. 

बाभळीप्रमाणेच जायकवाडी धरणावरील जलसाठ्यांतून पाणी सोडण्याच्या तारखा निश्चित होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. १ जुलै रोजी बाभळीत पाणी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे जायकवाडीतही वर्षनिहाय तारखा निश्चित होणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा या निमित्ताने स्पष्टपणे समोर येईल, असे मत जलतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. गोदावरी नदीपात्रात जायकवाडीच्या खाली मोठे ११ प्रकल्प आहेत.

सध्या जायकवाडीत २१ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना कोरडाच गेल्यासारखा आहे. पुढील तीन महिन्यांतील पावसाने बाभळी बंधाऱ्यासह गोदावरीपात्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, आणि जायकवाडी भरले तर खालच्या पट्ट्यात पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बाभळीप्रमाणे जायकवाडीसाठी निर्णय व्हावाबाभळी बंधाऱ्यासाठी ज्याप्रमाणे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्याच धर्तीवरच जायकवाडीसाठी निर्णय व्हावा, अशी प्रतिक्रिया जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी नोंदविली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे; परंतु राज्य शासनाने जायकवाडी धरणात वरील धरणांतून या निर्णयाप्रमाणे पाणी यावे. यासाठी न्यायालयात गेले पाहिजे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी सोडण्यात यावे, त्या पाण्याचे आम्ही काहीही नियोजन करू; परंतु निर्णय बाभळीप्रमाणे व्हावा, असेही पुरंदरे म्हणाले. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी