शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बाभळीच्या निर्णयाचा फटका जायकवाडीला बसण्याची शक्यता; गोदावरीपात्रातील प्रकल्पांची तहान वाढणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 13:45 IST

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले.

ठळक मुद्देबंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ०़५६ टीएमसी जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला.

- विकास राऊत 

औरंगाबाद : सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालावरून नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे रविवारी उघडण्यात आले. बंधाऱ्यातील १५़८१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ०़५६ टीएमसी जलसाठा तेलंगणात सोडण्यात आला. त्यामुळे ऐन पावसाळ्यात हा बंधारा कोरडाठाक झाला. याचा परिणाम जायकवाडी आणि गोदावरीपात्रावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होऊन २४ दिवसांचा कालावधी संपला आहे. जून महिन्यात मराठवाड्यात समाधानकारक असा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच बाभळीतील पाणी तेलंगणात गेले आहे. 

बाभळीप्रमाणेच जायकवाडी धरणावरील जलसाठ्यांतून पाणी सोडण्याच्या तारखा निश्चित होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. १ जुलै रोजी बाभळीत पाणी सोडण्यात आले. त्याचप्रमाणे जायकवाडीतही वर्षनिहाय तारखा निश्चित होणे गरजेचे आहे. समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा या निमित्ताने स्पष्टपणे समोर येईल, असे मत जलतज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. गोदावरी नदीपात्रात जायकवाडीच्या खाली मोठे ११ प्रकल्प आहेत.

सध्या जायकवाडीत २१ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यातील जून महिना कोरडाच गेल्यासारखा आहे. पुढील तीन महिन्यांतील पावसाने बाभळी बंधाऱ्यासह गोदावरीपात्रात समाधानकारक पाऊस झाला नाही, आणि जायकवाडी भरले तर खालच्या पट्ट्यात पाणी सोडावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

बाभळीप्रमाणे जायकवाडीसाठी निर्णय व्हावाबाभळी बंधाऱ्यासाठी ज्याप्रमाणे पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. त्याच धर्तीवरच जायकवाडीसाठी निर्णय व्हावा, अशी प्रतिक्रिया जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी नोंदविली. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदरच आहे; परंतु राज्य शासनाने जायकवाडी धरणात वरील धरणांतून या निर्णयाप्रमाणे पाणी यावे. यासाठी न्यायालयात गेले पाहिजे. जायकवाडीच्या हक्काचे पाणी सोडण्यात यावे, त्या पाण्याचे आम्ही काहीही नियोजन करू; परंतु निर्णय बाभळीप्रमाणे व्हावा, असेही पुरंदरे म्हणाले. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणMarathwadaमराठवाडाWaterपाणी