शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आमची प्रेरणा : विद्यार्थ्यांवर मुलाप्रमाणे माया करायचे बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 19:06 IST

तू त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय कर. जेवण कसे आहे, ते मी बघायला येईन.

'मिलिंद’च्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी तथा विक्रीकर विभागाचे निवृत्त उपायुक्त वसंत धावरे यांनी बाबासाहेबांच्या काही आठवणी जाग्या केल्या. 

बाबासाहेबांना मराठवाड्याच्या मागासलेपणाची कल्पना होती. या भागात विकोपाला गेलेली अस्पृशता, उच्चशिक्षणाचा मोठा अभाव असल्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी औरंगाबादेत त्यांनी महाविद्यालय सुरू केले. छावणीजवळ जवळपास १६९ एकर जागा घेतली. इमारत बांधण्यासाठी थोडा अवधी असल्यामुळे बाबासाहेबांनी छावणीतील मिलिटरीच्या रिकाम्या बॅरेक्समध्ये ‘पीईएस कॉलेज आॅफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’चे वर्ग सुरू केले. बाजूलाच प्राचार्य आणि प्राध्यापकांसाठीदेखील काही बराकी घेतल्या होत्या. माझे मावस मामा हे महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीमध्ये सदस्य होते. उस्मानाबाद येथील सरकारी हायस्कूलमधून १९५० साली मॅट्रिक पास झालो. ही बाब त्यांना समजली. त्यांनी मला पुढील शिक्षणासाठी ‘मिलिंद’मध्ये प्रवेश घेण्याचे सांगितले. त्यांनी प्राचार्य म.भि. चिटणीस सरांकडे शिफारस करणारे पत्र माझ्याजवळ दिले. ते पत्र घेऊन मी औरंगाबादला आलो. 

माझी कौटुंबिक परिस्थिती तेव्हा चांगली होती. माझे वडील मगनराव धावरे हे सरकारी कंत्राटदार होते. घरी रेशन दुकानही होते. मी औरंगाबादला आल्यावर पीडब्ल्यूडी आॅफिसमध्ये गेलो. अगोदर याच कार्यालयात कार्यरत असलेले व नंतर ‘मिलिंद’मध्ये कार्यरत रुंजाजी भारसाखळे (पहिलवान) यांना भेटलो. तेथून आम्ही दोघे छावणीत आलो. महाविद्यालय सुरू होण्याअगोदर मराठवाड्यातील तीन- चार गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी आले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था जवळच्याच बराकीमध्ये करण्यात आली. त्यादिवशी त्या मुलांनी आणलेल्या भाकरी खाल्ल्या. मेसमध्ये जेवणासाठी मी दिसलो नाही, म्हणून चिटणीस सर माझ्या रूममध्ये आले.

मी त्यांना म्हणालो, अतिशय गरीब कुटुंबातील चार मुले कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आले आहेत. उद्यापासून आमची जेवणाची काय व्यवस्था आहे. तेव्हा चिटणीस सर म्हणाले, मला फक्त शैक्षणिक बाबतीत अधिकार आहेत. थोड्या वेळानंतर त्यांनी कॉलेजचे रजिस्ट्रार जी.टी. मेश्राम यांना भेटण्यासाठी आम्हाला नेले. तेव्हा तेथे ते चिटणीस सरांवरच ओरडले. हा त्यांचा व्यवहार मला जिव्हारी लागला. माझी ही अवस्था पाहून चिटणीस सर म्हणाले, बाबासाहेब येथेच आहेत. त्यांची भेट घालून देतो. ठरलेल्या वेळेनुसार आम्ही बाबासाहेबांना भेटण्यासाठी गेलो. बाबासाहेबांचे दर्शन घेऊन मी माझी ओळख करून दिली. मी म्हणालो, आम्हा विद्यार्थ्यांसाठी मेसची सोय करावी. शिष्यवृत्तीचे मिळणारे पैसे मेससाठी वजा करावेत. त्यांनी माझा पेन मागून घेतला व चिटणीस सरांकडून एक कागद. त्यावर मेससाठी अ‍ॅडव्हान्स पैसे मंजूर केल्याचे लिहिले.

पत्र माझ्याकडे दिल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, पैसे मंजूर केले. तू त्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय कर. जेवण कसे आहे, ते मी बघायला येईन. बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपविली. १९५० ते १९५४ पर्यंत वसतिगृहाची सर्व व्यवस्था माझ्याकडेच देण्यात आली. माझ्या शैक्षणिक प्रगतीकडे बाबासाहेबांचे बारीक लक्ष असायचे. मी इंटर पास झाल्यावर बाबासाहेबांनी माझ्याबाबत चौकशी केली. माझ्या कुटुंबात कोणीच शाळेत गेलेले नसल्यामुळे विषयाची फारशी माहिती नव्हती. त्यामुळे मी बी.ए.साठी सोपे विषय घेतले होते. चिटणीस सरांनी माझा प्रवेश अर्ज मागवून घेतला व तो फाडून टाकला. दुसरा फॉर्म घेऊन त्यात अर्थशास्त्र हा विषय नमूद केला.  मी अर्थशास्त्राची अडचण सांगितल्यावर प्रा. देशपांडे सरांकडून माझी तयारी करून घेतली. मी एलएल.बी. करावे, अशी बाबासाहेबांची इच्छा होती; पण मी हैदराबाद येथे एम.ए. करण्यासाठी गेलो.

बाबासाहेबांचा मधुमेह अधिकच बळावला होता. त्यांना चालण्याची गरज होती. एका बाजूला माईसाहेब आणि मी बाबासाहेबांच्या हाताला धरून चालत असे. आमच्या मागे रुंजाजी पहिलवान हे खुर्ची घेऊन चालायचे. चालण्याने दम लागला की, बाबासाहेब काही वेळ खुर्चीत बसायचे. 

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन