शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

जेवढ्या गाई नाहीत, तेवढं तूप विकतात बाबा रामदेव, वडेट्टीवारांचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 18:03 IST

ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं आहे

ठळक मुद्देओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं आहे.

औरंगाबाद - सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज संस्थांमधील ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्दबातल केलं आहे. त्यामुळे, ओबीसी समाजासह ओबीसी समाजाचे नेतेही आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत ओबीसी समाजाचं आरक्षण पूर्ववत होत नाही, तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, अशी भूमिकाही अनेकांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने आज औरंगाबाद येथे ओसीबी समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला आपत्ती व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार हेही उपस्थित होते. यावेळी, त्यांनी तुफान फटकेबाजी करत बाबा रामदेव यांच्यावरही टीका केली.

ओबीसींच्या हक्काच्या 40 हजार राजकीय जागा आहेत. त्या जागा आम्ही कुणालाही देऊ देणार नाही. ओबीसी राजकीय आरक्षणासाठी सर्व समाजानं एकत्र यावं, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं आहे. तसेच, केंद्र सरकार आणि भाजपावरही त्यांनी टीका केली. केंद्र सरकारकडून इंपेरियल डेटा देण्यात येत नाही, असे म्हणत त्यांनी केंद्रावर टीका केली. तसेच, बाबा रामदेव यांच्या व्यावसायीकतेवरही त्यांनी चांगलाच प्रहार केला. 

रामदेव बाबांना टोला

'रामदेव बाबा जेवढ्या गाई नाहीत, त्यापेक्षा अधिक तूप विकत आहेत. तर जेवढ्या मधमाशा नाहीत, त्याहून अधिक मध विकत आहे. पण आपलं तसं नाही, जेवढ्या गाई आहेत, तेवढंच तूप निघतं आणि तेवढंच तूप विकतो' अशा शब्दात रामदेव बाबाला वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBaba Ramdevरामदेव बाबाOBC Reservationओबीसी आरक्षण