शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

तीन वर्षांनंतर ओलांडली सरासरी

By admin | Updated: September 30, 2016 01:16 IST

जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली.

 

जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्हाभरातील रान आबादाणी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्यात २०१२ साली भीषण दुष्काळ पडला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ६८८. ३ मि. मी. आहे. मात्र २०१२ साली संपूर्ण पावसाळ्यात केवळ ३२४ मि. मी. म्हणजे पन्नास टक्क्यांच्याही आत पाऊस पडला होता. त्यानंतर २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडून पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यावेळी संपूर्ण पावसाळ्यात ७८८.६ म्हणजे ११० टक्के पाऊस पडला होता. त्यावेळी काही तालुक्यात ओला दुष्काळ पडला होता. पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. २०१४ मध्ये मात्र पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली होती. वार्षिक सरासरीच्या ५० टक्केच म्हणजे ३७७.४ टक्के पाऊस पडला होता. २०१५ मध्येही जिल्ह्यात ५० टक्यांच्याआत पाऊस पडला होता. त्यामुळे सलग तीन वर्ष दुष्काळ दुष्टचक्र जिल्ह्याच्या मागे होते. २०१६ या वर्षी मध्ये मात्र जिल्ह्यावर वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडला. यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. मध्यंतरी काही ठिकाणी १० तर काही ठिकाणी १५ दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुनरागमन झाले. परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी त्यामुळे जिल्ह्यात पावसाने सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७२४.४४ मि. मी. म्हणजे ११५. १७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)