शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

तीन वर्षांनंतर ओलांडली सरासरी

By admin | Updated: September 30, 2016 01:16 IST

जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली.

 

जालना : सलग तीन वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेला जालना जिल्हा यावर्षी दुष्काळातून सुकाळात आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे जिल्हाभरातील रान आबादाणी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. जालना जिल्ह्यात २०१२ साली भीषण दुष्काळ पडला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही ६८८. ३ मि. मी. आहे. मात्र २०१२ साली संपूर्ण पावसाळ्यात केवळ ३२४ मि. मी. म्हणजे पन्नास टक्क्यांच्याही आत पाऊस पडला होता. त्यानंतर २०१३ साली जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडून पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यावेळी संपूर्ण पावसाळ्यात ७८८.६ म्हणजे ११० टक्के पाऊस पडला होता. त्यावेळी काही तालुक्यात ओला दुष्काळ पडला होता. पाऊस व गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. २०१४ मध्ये मात्र पावसाने जिल्ह्याला हुलकावणी दिली होती. वार्षिक सरासरीच्या ५० टक्केच म्हणजे ३७७.४ टक्के पाऊस पडला होता. २०१५ मध्येही जिल्ह्यात ५० टक्यांच्याआत पाऊस पडला होता. त्यामुळे सलग तीन वर्ष दुष्काळ दुष्टचक्र जिल्ह्याच्या मागे होते. २०१६ या वर्षी मध्ये मात्र जिल्ह्यावर वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने जिल्हा दुष्काळाच्या दृष्टचक्रातून बाहेर पडला. यावर्षी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला. मध्यंतरी काही ठिकाणी १० तर काही ठिकाणी १५ दिवसांची विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुनरागमन झाले. परतीच्या पावसानेही जोरदार हजेरी त्यामुळे जिल्ह्यात पावसाने सप्टेंबरमध्येच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. २९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७२४.४४ मि. मी. म्हणजे ११५. १७ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)