शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
3
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
4
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
5
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
6
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
7
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
8
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
9
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
10
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
11
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
12
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
13
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
14
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
15
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
16
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
17
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

औरंगाबादची जिगरबाज गिर्यारोहक मनीषा एव्हरेस्ट मोहीमेसाठी पुन्हा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 00:20 IST

गतवर्षी खराब हवामानामुळे जगातील सर्वोच्च शिखर गाठण्यापासून अवघ्या १७0 मीटरने वंचित राहिली तरी औरंगाबादची जिगरबाज महिला गिर्यारोहक मनीषा हिने कच खाल्ली नाही. आता ती नव्या जोमाने तयारीला लागली असून, यंदा पुन्हा नव्या उमेदीने ती जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट फत्ते करण्यासाठी १ एप्रिलला रवाना होणार आहे.

औरंगाबाद : गतवर्षी खराब हवामानामुळे जगातील सर्वोच्च शिखर गाठण्यापासून अवघ्या १७0 मीटरने वंचित राहिली तरी औरंगाबादची जिगरबाज महिला गिर्यारोहक मनीषा हिने कच खाल्ली नाही. आता ती नव्या जोमाने तयारीला लागली असून, यंदा पुन्हा नव्या उमेदीने ती जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट फत्ते करण्यासाठी १ एप्रिलला रवाना होणार आहे. तथापि, त्यासाठी आवश्यक असणाºया आर्थिक संकटावर मात करण्याचे तिच्यासमोर आव्हान असणार आहे.गतवर्षी एप्रिल महिन्यातच मनीषा वाघमारे हिने जवळपास एव्हरेस्ट मोहीम फत्तेच केली होती; परंतु हवामानाच्या रौद्ररूपामुळे तिला तिचे लक्ष्य गाठता आले नव्हते. या मोहिमेदरम्यान सोबतच असलेल्या आॅक्सिजन सिलिंडरच्या साथीने तिने आपल्या संघातील एकाचा प्राण वाचवण्यात योगदान दिले आहे. १ एप्रिलपासून ती पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार असून, यंदा आॅक्सिजन सिलिंडरचा दुप्पट साठा घेऊन ती या मोहिमेसाठी जाणारआहे.विशेष म्हणजे ‘डेथ झोन’ म्हणून परिचित असलेल्या कॅम्प फोरपुढील भागात १२ तास थांबणे मोठेच आव्हान असते. या ठिकाणी मनीषाने प्रतिकूल हवामान आणि उणे ७५ अंश तापमानात ४८ तासांचा काळ काढला होता.यावर्षी चढाईसाठी पोषक हवामान असतानाच सुरुवातीलाच शिखरमाथा सर करण्यासाठी पुढे जाणार आहोत, असे मनीषा वाघमारे हिने पत्रकार परिषदेत सांगितले.यंदाच्या मोहिमेसाठी प्रशिक्षक शशी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गतवर्षी १ जुलैपासूनच सरावाला प्रारंभ केला आहे. यात व्यायामासह हृदय आणि फुप्फुसाशी संबंधित व्यायामाचा समावेश आहे, असे मनीषाने सांगितले. याप्रसंगी इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे यांनीही मनीषाला शहरातील उद्योजक, कंपन्या आणि विद्यापीठाकडून मदत मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या वसुधा पुरोहित यांनीदेखील मनीषाला आर्थिक मदत व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस मनीषा वाघमारे व विनोद नरवडे यांच्यासह जगदीश खैरनार, प्राचार्या वसुधा पुरोहित, राहुल दुधमांडे, प्रशिक्षक शशी सिंग, गौतम पातारे, नंदू पटेल आदींची उपस्थिती होती.