शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून; मराठवाड्याच्या पदरी उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:29 IST

दिल्लीत केंद्र शासनाकडे एसपीएचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून पडून असतानाही मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत एसपीएला केंद्राची मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून टाकले.

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरात शिखर संस्था असलेल्य ‘आयआयएम’ला द्यावे यासाठी २०१४ साली नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादचे ‘आयआयएम’ नागपूरला पळवून नेण्यात आले. या मोबदल्यात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ देण्याची घोषणा करण्यात आली.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : पर्यटनाची, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शिखर संस्था असलेल्य ‘आयआयएम’ला द्यावे यासाठी २०१४ साली नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादचे ‘आयआयएम’ नागपूरला पळवून नेण्यात आले. या मोबदल्यात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ देण्याची घोषणा करण्यात आली. यावरही मराठवाड्याने समाधान मानले. मात्र, तीन वर्षे उलटली तरी ‘एसपीए’चे साधे भूमिपूजनही झाले नाही. दिल्लीत केंद्र शासनाकडे एसपीएचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून पडून असतानाही मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत एसपीएला केंद्राची मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून टाकले.

सूफी संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे. मराठवाड्याला जेव्हा काही देण्याची वेळ येते तेव्हा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते अक्षरश: प्रकल्प पळवून नेतात. हा अन्याय वर्षानुवर्षे मराठवाडा निमूटपणे सहनही करतोय. २०१४ मध्ये केंद्र शासनाने देशातील सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या आयआयएमची शाखा महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यात एकमेव औरंगाबाद शहरात व्यापारी, शैक्षणिक संस्था, राजकीय मंडळींनी एकत्रित येऊन आंदोलन केले. एवढे करूनही ही सर्वोच्च संस्था सत्ताधा-यांनी नागपूरला पळवून नेली. 

या बदल्यात औरंगाबादला ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ देण्यात येत असल्याची घोषणा डिसेंबर २०१४ मध्ये केली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था औरंगाबादेत यावी या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊल राज्य शासनाकडून उचलण्यात आले नाही. महाराष्ट्र शासनाने ‘एसपीए’च्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून देण्याची औपचारिकता पूर्ण केली. दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविणा-या नेत्यांनाही  सरकारच्या घोषणेचा विसर पडला आहे. औरंगाबादच्या एसपीएचा प्रस्ताव दिल्लीत पडून असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात औरंगाबादेतच केंद्र शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे घोषित केले. वास्तविक पाहता केंद्राने प्रस्तावच मंजूर केला नसल्याचा दावा स्थानिक आर्किटेक्ट संघटनेच्या पदाधिका-यांनी केला आहे.

आणखी दोन वर्षे लागतीलकेंद्र शासनाने अद्याप स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्टला मंजुरी दिलेली नाही. जागा निश्चित नाही. केंद्राकडे प्रस्ताव कोणाकडे सादर झाला यावरही अधिक तपशील मिळायला तयार नाही. मागील तीन वर्षांपासून आम्ही राज्य शासनाकडेच सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शासन यात गंभीर नाही. केंद्राची मंजुरी मिळाली तरी आणखी दोन वर्षे या उपक्रमाला लागतील.-अजय ठाकूर, आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष