शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून; मराठवाड्याच्या पदरी उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:29 IST

दिल्लीत केंद्र शासनाकडे एसपीएचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून पडून असतानाही मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत एसपीएला केंद्राची मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून टाकले.

ठळक मुद्देऔरंगाबाद शहरात शिखर संस्था असलेल्य ‘आयआयएम’ला द्यावे यासाठी २०१४ साली नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादचे ‘आयआयएम’ नागपूरला पळवून नेण्यात आले. या मोबदल्यात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ देण्याची घोषणा करण्यात आली.

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : पर्यटनाची, मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शिखर संस्था असलेल्य ‘आयआयएम’ला द्यावे यासाठी २०१४ साली नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर औरंगाबादचे ‘आयआयएम’ नागपूरला पळवून नेण्यात आले. या मोबदल्यात ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ देण्याची घोषणा करण्यात आली. यावरही मराठवाड्याने समाधान मानले. मात्र, तीन वर्षे उलटली तरी ‘एसपीए’चे साधे भूमिपूजनही झाले नाही. दिल्लीत केंद्र शासनाकडे एसपीएचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून पडून असतानाही मागील आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादेत एसपीएला केंद्राची मंजुरी मिळाल्याचे जाहीर करून टाकले.

सूफी संतांची भूमी असलेल्या मराठवाड्यावर नेहमीच अन्याय होत आला आहे. मराठवाड्याला जेव्हा काही देण्याची वेळ येते तेव्हा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते अक्षरश: प्रकल्प पळवून नेतात. हा अन्याय वर्षानुवर्षे मराठवाडा निमूटपणे सहनही करतोय. २०१४ मध्ये केंद्र शासनाने देशातील सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या आयआयएमची शाखा महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला. राज्यात एकमेव औरंगाबाद शहरात व्यापारी, शैक्षणिक संस्था, राजकीय मंडळींनी एकत्रित येऊन आंदोलन केले. एवढे करूनही ही सर्वोच्च संस्था सत्ताधा-यांनी नागपूरला पळवून नेली. 

या बदल्यात औरंगाबादला ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ देण्यात येत असल्याची घोषणा डिसेंबर २०१४ मध्ये केली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था औरंगाबादेत यावी या दृष्टीने कोणतेही ठोस पाऊल राज्य शासनाकडून उचलण्यात आले नाही. महाराष्ट्र शासनाने ‘एसपीए’च्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून देण्याची औपचारिकता पूर्ण केली. दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविणा-या नेत्यांनाही  सरकारच्या घोषणेचा विसर पडला आहे. औरंगाबादच्या एसपीएचा प्रस्ताव दिल्लीत पडून असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात औरंगाबादेतच केंद्र शासनाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे घोषित केले. वास्तविक पाहता केंद्राने प्रस्तावच मंजूर केला नसल्याचा दावा स्थानिक आर्किटेक्ट संघटनेच्या पदाधिका-यांनी केला आहे.

आणखी दोन वर्षे लागतीलकेंद्र शासनाने अद्याप स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्टला मंजुरी दिलेली नाही. जागा निश्चित नाही. केंद्राकडे प्रस्ताव कोणाकडे सादर झाला यावरही अधिक तपशील मिळायला तयार नाही. मागील तीन वर्षांपासून आम्ही राज्य शासनाकडेच सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. शासन यात गंभीर नाही. केंद्राची मंजुरी मिळाली तरी आणखी दोन वर्षे या उपक्रमाला लागतील.-अजय ठाकूर, आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष