शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

औरंगाबादचा सार्वजनिक गणेशोत्सव शंभरीकडे; १९२४ ला झाला होता स्थापन गणेश महासंघ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 31, 2022 15:42 IST

औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत 

औरंगाबाद : औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शहरात पहिल्या गणपती मंडळाला स्थापन होऊन १२३ वर्षे पूर्ण झाली असली तरी गणेश महासंघाची स्थापना १९२४ साली झाली. आता येथील सार्वजनिक गणेश महासंघाची वाटचाल शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे येथील गणेश महासंघ होय.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन औरंगाबादेत १८९९ मध्ये राजाबाजार येथे पहिले सार्वजनिक ‘गणेशभक्त भजन मंडळ’ स्थापन झाले. मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता १९२४ मध्ये औरंगाबाद गणेश संघ स्थापना करण्यात आला. पहिले अध्यक्ष डॉ. संग्रामसिंह चौहान ठरले. कार्यकारिणीत डॉ. पुरवार, नाथप्रसाद दीक्षित, दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब पवार, विनायक पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, मुरलीधर गोलटगावकर, द्वारकादास पटेल, विजयेंद्र काबरा, बाबूराव काळे, अलफखान, प्रेमचंद मुगदिया, बाबूलाल पराती, जयसिंग महाराज, राजाराम बसैये, आदी मातब्बर असत.

अध्यक्षपदासाठी निवडणूक होईत्या काळात अध्यक्षपदासाठी ४ ते ५ उमेदवार उभे राहत. १९६६ मध्ये प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते. वसंत भवन, बालाजी धर्मशाळा व बन्सीलालनगर येथे प्रत्येकी २ वेळा म्हणजे एकूण ६ वेळा निवडणुका झाल्या. १९६९ या वर्षी छायाचित्रकार नाथप्रसाद दीक्षित अध्यक्ष झाले होते. १९७३ मध्ये सनसिंग ग्रंथी हे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रकाश मुगदिया दोनदा अध्यक्ष झाले होते. शिवनाथ राठी, अशोक शहा यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली होती.

सर्व राजकीय पक्ष समभाव८० च्या दशकात गणेश महासंघाचे नाव ‘श्री औरंगाबाद गणेश महासंघ’ असे करण्यात आले. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आहेत. निवडणुका न घेता अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी प्रत्येक राजकीय पक्षास दिली जाते. सर्व राजकीय पक्ष समभाव तेव्हापासून जपला जातो.

गणेशोत्सवातून घडले राजकीय नेतृत्वगणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करणारे नेते घडवले. यात किंगमेकर दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बजरंगलाल शर्मा, अशोक पाटील डोणगावकर, मुरलीभाऊ गवळी, लखन पहिलवान, हरिभाऊ जगताप, शालिग्राम बसैये, संतसिंग ग्रंथी, माणिक गंगवाल, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. किशनचंद तनवाणी, गंगाधर गाडे, रशीद मामू, नंदकुमार घोडेले, रतन घोंगते, किशोर तुलसीबागवाले, आदींचा समावेश होतो.

५० व्या वर्षी स्मरणिका प्रसिद्धश्री गणेश संघाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा १९७३-१९७४ या वर्षी स्मरणिका प्रकाशित केली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव