शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

औरंगाबादचा सार्वजनिक गणेशोत्सव शंभरीकडे; १९२४ ला झाला होता स्थापन गणेश महासंघ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 31, 2022 15:42 IST

औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत 

औरंगाबाद : औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शहरात पहिल्या गणपती मंडळाला स्थापन होऊन १२३ वर्षे पूर्ण झाली असली तरी गणेश महासंघाची स्थापना १९२४ साली झाली. आता येथील सार्वजनिक गणेश महासंघाची वाटचाल शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे येथील गणेश महासंघ होय.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन औरंगाबादेत १८९९ मध्ये राजाबाजार येथे पहिले सार्वजनिक ‘गणेशभक्त भजन मंडळ’ स्थापन झाले. मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता १९२४ मध्ये औरंगाबाद गणेश संघ स्थापना करण्यात आला. पहिले अध्यक्ष डॉ. संग्रामसिंह चौहान ठरले. कार्यकारिणीत डॉ. पुरवार, नाथप्रसाद दीक्षित, दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब पवार, विनायक पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, मुरलीधर गोलटगावकर, द्वारकादास पटेल, विजयेंद्र काबरा, बाबूराव काळे, अलफखान, प्रेमचंद मुगदिया, बाबूलाल पराती, जयसिंग महाराज, राजाराम बसैये, आदी मातब्बर असत.

अध्यक्षपदासाठी निवडणूक होईत्या काळात अध्यक्षपदासाठी ४ ते ५ उमेदवार उभे राहत. १९६६ मध्ये प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते. वसंत भवन, बालाजी धर्मशाळा व बन्सीलालनगर येथे प्रत्येकी २ वेळा म्हणजे एकूण ६ वेळा निवडणुका झाल्या. १९६९ या वर्षी छायाचित्रकार नाथप्रसाद दीक्षित अध्यक्ष झाले होते. १९७३ मध्ये सनसिंग ग्रंथी हे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रकाश मुगदिया दोनदा अध्यक्ष झाले होते. शिवनाथ राठी, अशोक शहा यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली होती.

सर्व राजकीय पक्ष समभाव८० च्या दशकात गणेश महासंघाचे नाव ‘श्री औरंगाबाद गणेश महासंघ’ असे करण्यात आले. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आहेत. निवडणुका न घेता अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी प्रत्येक राजकीय पक्षास दिली जाते. सर्व राजकीय पक्ष समभाव तेव्हापासून जपला जातो.

गणेशोत्सवातून घडले राजकीय नेतृत्वगणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करणारे नेते घडवले. यात किंगमेकर दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बजरंगलाल शर्मा, अशोक पाटील डोणगावकर, मुरलीभाऊ गवळी, लखन पहिलवान, हरिभाऊ जगताप, शालिग्राम बसैये, संतसिंग ग्रंथी, माणिक गंगवाल, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. किशनचंद तनवाणी, गंगाधर गाडे, रशीद मामू, नंदकुमार घोडेले, रतन घोंगते, किशोर तुलसीबागवाले, आदींचा समावेश होतो.

५० व्या वर्षी स्मरणिका प्रसिद्धश्री गणेश संघाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा १९७३-१९७४ या वर्षी स्मरणिका प्रकाशित केली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव