शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

औरंगाबादचा सार्वजनिक गणेशोत्सव शंभरीकडे; १९२४ ला झाला होता स्थापन गणेश महासंघ

By प्रशांत तेलवाडकर | Updated: August 31, 2022 15:42 IST

औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत 

औरंगाबाद : औरंगाबादकर यंदा ९८ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. शहरात पहिल्या गणपती मंडळाला स्थापन होऊन १२३ वर्षे पूर्ण झाली असली तरी गणेश महासंघाची स्थापना १९२४ साली झाली. आता येथील सार्वजनिक गणेश महासंघाची वाटचाल शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक म्हणजे येथील गणेश महासंघ होय.

लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची प्रेरणा घेऊन औरंगाबादेत १८९९ मध्ये राजाबाजार येथे पहिले सार्वजनिक ‘गणेशभक्त भजन मंडळ’ स्थापन झाले. मंडळांची वाढती संख्या लक्षात घेता १९२४ मध्ये औरंगाबाद गणेश संघ स्थापना करण्यात आला. पहिले अध्यक्ष डॉ. संग्रामसिंह चौहान ठरले. कार्यकारिणीत डॉ. पुरवार, नाथप्रसाद दीक्षित, दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बाळासाहेब पवार, विनायक पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, मुरलीधर गोलटगावकर, द्वारकादास पटेल, विजयेंद्र काबरा, बाबूराव काळे, अलफखान, प्रेमचंद मुगदिया, बाबूलाल पराती, जयसिंग महाराज, राजाराम बसैये, आदी मातब्बर असत.

अध्यक्षपदासाठी निवडणूक होईत्या काळात अध्यक्षपदासाठी ४ ते ५ उमेदवार उभे राहत. १९६६ मध्ये प्रथमच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली. मनमोहन अग्रवाल यांची अध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अरुणभाई कापडिया यांनी काम पाहिले होते. वसंत भवन, बालाजी धर्मशाळा व बन्सीलालनगर येथे प्रत्येकी २ वेळा म्हणजे एकूण ६ वेळा निवडणुका झाल्या. १९६९ या वर्षी छायाचित्रकार नाथप्रसाद दीक्षित अध्यक्ष झाले होते. १९७३ मध्ये सनसिंग ग्रंथी हे अध्यक्ष झाले. त्यानंतर प्रकाश मुगदिया दोनदा अध्यक्ष झाले होते. शिवनाथ राठी, अशोक शहा यांनी अनेक पदांची जबाबदारी सांभाळली होती.

सर्व राजकीय पक्ष समभाव८० च्या दशकात गणेश महासंघाचे नाव ‘श्री औरंगाबाद गणेश महासंघ’ असे करण्यात आले. या महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार आहेत. निवडणुका न घेता अध्यक्षपदाची जबाबदारी दरवर्षी प्रत्येक राजकीय पक्षास दिली जाते. सर्व राजकीय पक्ष समभाव तेव्हापासून जपला जातो.

गणेशोत्सवातून घडले राजकीय नेतृत्वगणेशोत्सवाने राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नेतृत्व करणारे नेते घडवले. यात किंगमेकर दादासाहेब गणोरकर, गोविंदभाई श्रॉफ, बजरंगलाल शर्मा, अशोक पाटील डोणगावकर, मुरलीभाऊ गवळी, लखन पहिलवान, हरिभाऊ जगताप, शालिग्राम बसैये, संतसिंग ग्रंथी, माणिक गंगवाल, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. किशनचंद तनवाणी, गंगाधर गाडे, रशीद मामू, नंदकुमार घोडेले, रतन घोंगते, किशोर तुलसीबागवाले, आदींचा समावेश होतो.

५० व्या वर्षी स्मरणिका प्रसिद्धश्री गणेश संघाला ५० वर्षे पूर्ण झाली, तेव्हा १९७३-१९७४ या वर्षी स्मरणिका प्रकाशित केली होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादGanesh Mahotsavगणेशोत्सव