शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

औरंगाबादमध्ये कोजागरीच्या ‘सेलिब्रेशन’ची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 19:47 IST

दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.

औरंगाबाद : दसरा झाल्यानंतर वातावरणात आल्हाददायक गारवा निर्माण झाला असून, कोजागरीनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. गाण्यांच्या मैफली आयोजित करून आपल्या आप्तस्वकीयांसह रात्री जागरण करून सुकामेवा घालून आटविण्यात आलेले दूध प्राशन करण्याचीही अनेक ठिकाणी जय्यत तयारी सुरू झाली आहे. दसरा-दिवाळीप्रमाणेच आता कोजागरीनिमित्त घरोघरी ‘सेलिबे्रशन’ होत असून, हा आनंद द्विगुणित करण्यासाठी दूध आणि सुकामेव्याची बाजारपेठही सरसावली आहे.

दूध महासंघ आणि परराज्यातून  येणारे दूध मिळून शहरात दररोज दोन ते सव्वादोन लाख लिटर दुधाची विक्री होते, कोजागरीनिमित्त तीन लाख लिटर दूध येणार असल्याचे सांगण्यात आले. दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक पी. बी. पाटील म्हणाले की, दररोज दूध महासंघातर्फे  शहरात पन्नास हजार लिटर दूध पुरविले  जाते. मागच्या वर्षी कोजागरीच्या दिवशी तीस हजार लिटर जास्तीचे दूध मागवले गेले होते. यावर्षी चाळीस हजार लिटर अतिरिक्त दूध येणार आहे.

दर महिन्यात सुकामेव्याच्या होणाऱ्या विक्रीपेक्षा कोजागरीनिमित्त होणारी विक्री ५० टक्क्यांनी अधिक असते; परंतु यंदा त्यावर दुष्काळाची छाया आहे, असे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले. चारोळी, काजू, बदाम, के शर, पिस्ता या सुकामेव्याला यानिमित्त जास्त मागणी असते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ येथील चारोळी, गोवा आणि दक्षिण भारतातून आलेले काजू, अमेरिकेहून आलेले बदाम, क ाश्मीरहून आलेले के शर आणि इराण-अमेरिकेवरून आलेले पिस्ते औरंगाबादकरांचे दूध आणखी स्वादिष्ट करणार आहेत. 

दुष्काळाचा परिणामदरवर्षीपेक्षा यावर्षी १०-२० टक्क्यांनी सुकामेव्याची मागणी घटली. हा दुष्काळी परिस्थितीचा परिणाम असल्याचे व्यापारी शिवनारायण तोतला यांनी सांगितले.अश्विनी पौर्णिमेला लक्ष्मी देवी घराघरामध्ये फिरून ‘को-जागरी’ असे म्हणत कोण जागरण करीत आहे, हे पाहत असते. त्यामुळेच या पौर्णिमेला ‘कोजागरी’ म्हणून ओळखले जाते. ज्या व्यक्ती जागरण करतात, त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते, अशी दंतकथा याविषयी सांगितली जाते. 

खगोलीय दृष्टिकोनातून कोजागरीचे महत्त्व२७ नक्षत्रांपैकी सर्वात पहिले नक्षत्र म्हणजे अश्विनी. तसेच अश्विनी पौर्णिमेनंतर हिवाळा सुरू होतो. दिवसा तापमान कमी आणि रात्री जरासे उबदार वातावरण या दिवसांत जाणवते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येऊन मोठा दिसतो. त्यामुळे सर्वत्र टिपूर चांदणे आणि चंद्राचा दुधाळ प्रकाश पडलेला असतो. हा क्षण साजरा करण्यासाठी कोजागरीची सुरुवात झाली असावी, असे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादkojagariकोजागिरीmilkदूध