शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

औरंगाबादच्या मॉडेल रेल्वेस्टेशनचा दुसरा टप्पा ३ वर्षांपासून कागदावरच...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 20:26 IST

भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा (डिझाईन) पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद : मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील काम गेल्या तीन वर्षांपासून कागदावरच आहे. भूमिपूजनाच्या तीन वर्षांनंतरही दुसऱ्या टप्प्यातील कामाचा आराखडा (डिझाईन) पूर्ण झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद रेल्वेस्टेशनचा मॉडेल रेल्वेस्टेशनमध्ये समावेश झाला आणि पहिल्या टप्प्यात भव्य इमारत उभी राहिली. मॉडेल रेल्वेस्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यात रेल्वेस्टेशनच्या जुन्या इमारतीच्या जागेत विकासकामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू होणे अपेक्षित होते; परंतु तसे झाले नाही. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते ३ जुलै २०१५ रोजी दुसऱ्या टप्प्यातील जुन्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही झाले; परंतु तीन वर्षे उलटल्यानंतरही हे काम सुरूच झालेले नाही. 

रेल्वेस्टेशनचे काम पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने करून देश-विदेशातील पर्यटकांना नजरेसमोर ठेवून सुविधा दिल्या जातील, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले; परंतु प्रवाशांना सुसज्ज सोयी-सुविधांची स्वप्ने दाखविली जात असून, रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे हे फक्त ‘बोलाचाच भात’ ठरते आहे. 

दुरवस्थेवर वरवर पांघरूनस्टेशनच्या जुन्या इमारतीची पडझड झालेली आहे. ‘दमरे’चे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांचा १२ डिसेंबर रोजी औरंगाबाद स्टेशनवर पाहणी दौरा आहे. त्यामुळे जुन्या स्टेशनच्या इमारतीची रंगरंगोटी आणि फरशा बदलून दुरवस्थेवर के वळ वरवर पांघरून घातले जात असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे.

चांगल्या कामास प्राधान्य रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची डिझाईन अंतिम केली जात आहे. अधिकाधिक चांगले काम करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabadऔरंगाबादGovernmentसरकारRailway Passengerरेल्वे प्रवासी