शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन उजळणार 'एलईडी' लाईट्सच्या प्रकाशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:57 IST

दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळणार आहे.

औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने पाऊल पुढे टाकत रेल्वेस्टेशनवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत औरंगाबादचे मॉडेल रेल्वेस्टेशन एलईडी ट्यूबच्या प्रकाशाने उजळणार आहे.

पर्यावरणपुरक उपाय आणि वीजेची बचत करण्यासाठी मार्च २०१८ पर्यंत देशातील सगळ्याच रेल्वेस्टेशनवर एलईडी लाईट बसवण्यात येणार आहेत. ही घोषणा भारतीय रेल्वे मंत्रालयाने केली आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जाबचतीसाठी एलईडी लाईटच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरात परवडणाऱ्या दरात एलईडी दिव्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्यातून विजेची बचत करण्याचे लक्ष्य आहे. 

रेल्वेनेसुद्धा ऊर्जाबचतीसाठी एलईडी लाईट लावण्यावर भर दिला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद रेल्वेस्टेशनही एलईडी दिव्यांनी प्रकाशित करण्यात येणार आहे. पाच प्लॅटफाॅर्म असून, यातील तीन प्लॅटफॉर्मचा वापर प्रभावीपणे करण्यात येतो. चार,पाच क्रमांकाचे प्लॅटफॉर्म मालगाड्यांसाठी वापरात आहेत. गरजेनुसार सर्वच फलाटांवर एलईडीचे ट्यूब लावण्यात येत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावरील ऊर्जेची बचत होण्याची अपेक्षा आहे.

विजेची बचत करण्यावर रेल्वे प्रशासनाने भर दिला आहे. यापूर्वी रेल्वे येण्यापूर्वी पंधरा मिनिटे आधी गेल्यानंतर पंधरा मिनिटे असे केवळ अर्धा तास दिवे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता एलईडी ट्यूब बसविण्यात येत आहेत. या माध्यमातून वीज बचतीचे उद्दिष्ट साध्य करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद