शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

औरंगाबादच्या ‘मिनी घाटी’चे पाणी संकट कायम; रुग्णालय सुरू होण्याची किती दिवस पाहावी लागणार वाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 16:07 IST

चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील पाण्याचे संकट अद्यापही कायम आहे. महापालिकेकडून रुग्णालयास पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार आ. अतुल सावे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी केली.

औरंगाबाद : चिकलठाणा येथील मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयावरील पाण्याचे संकट अद्यापही कायम आहे. महापालिकेकडून रुग्णालयास पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार आ. अतुल सावे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी केली.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. या रुग्णालयावर सोयी-सुविधा, यंत्रसामग्रीच्या प्रतीक्षेबरोबर पाण्याचे संकटही उभे आहे. दररोज दोन लाख लिटर पाण्याची मागणी राहणार्‍या या रुग्णालयाला पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. 

अपुर्‍या पाण्यामुळे रुग्णसेवा कोलमडण्याची भीती आहे. हे रुग्णालय लवकर कार्यान्वित करण्याची तयारी आरोग्य विभागाकडून सुरू आहे. त्यासाठी पुरेसे पाणी मिळणे आवश्यक आहे.आरोग्य विभागाने पाणीपुरवठ्यासाठी १६ लाख आणि भाड्यापट्टीपोटी १६ लाख रुपये महानगरपालिकेकडे भरले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाणी जोडणी मिळाली; परंतु अत्यंत कमी पाणीपुरवठा होत आहे. रुग्णालय सुरू झाल्यानंतर पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सामान्य रुग्णालयास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी रुग्णालयास अतिरिक्त पाणी हवे असल्याचे नमूद केले. यावर मनपा प्रशासनाने यासाठी हवा असलेला निधी येणे बाकी असल्याचे स्पष्ट केले. हा निधी आरोग्य विभागाकडून महापालिकेला दिला जाईल, असे चव्हाण यांनी म्हटले.

घाटीला हवे २० कोटीघाटी रुग्णालयात अनेक यंत्रसामग्री बंद आहे. ड्रेनेजलाईन जुनी झाली आहे. रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. सुरक्षा भिंत तुटलेली आहे. ६० वर्षे जुनी इमारत आहे. या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी घाटी रुग्णालयास २० कोटींचा निधी हवा असल्याची मागणी बैठकीत करण्यात आली. दंत रुग्णालयास फ र्निचरची गरज असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद