शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:51 IST

यशकथा : दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत.

- जितेंद्र डेरे (जि. औरंगाबाद) 

लाडसावंगी, जिल्हा औरंगाबाद येथील रोहिदास रामदास कदम या शेतकऱ्याने पाण्याचे व्यवस्थापन, योग्य नियोजन व कठोर मेहनतीच्या बळावर डाळिंब उत्पादनात यशस्वी झेप घेतली आहे. दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत. युरोपवारीत पहिल्याच खेपेत त्यांना पाच लाख ऐंशी हजार रुपये मिळाल्याने त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा दुष्काळी परिस्थितीतही विश्वास दुणावला आहे. 

लाडसावंगी येथील शेतकरी रोहिदास कदम यांनी चार वर्षांपूर्वी एक हजार झाडांची डाळिंबाची बाग उभी केली. वास्तविक पाहता लाडसावंगी परिसर मोसंबीपाठोपाठ आता डाळिंब झोन म्हणून ओळखला जात आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्या तरी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर बागा जगविण्याची यशस्वी धडपड केली आहे. रोहिदास कदम यांना बाग जोपासताना, नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरेसा पाऊस नसल्याने डाळिंबाची बाग जगविणे हे या शेतकऱ्यासाठी मोठे दिव्य होते. या परिसरातील शेतकऱ्यांनी २०१२ साली पडलेल्या दुष्काळापासून चांगलाच धडा घेतला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी तयार केली. पावसाळ्यात पडेल त्या पावसाच्या मदतीने ही शेततळी भरून ठेवली जातात. हे पाणी केवळ संकटकाळी वापरले जाते.

रोहिदास कदम यांनी डाळिंब बाग जोपासताना, केवळ जैविक खतांचा वापर केला. रासायनिक खते व कीटकनाशके त्यांनी आवर्जून टाळले. अत्यंत काटेकोर नियोजनाने त्यांनी डाळिंब बाग फुलवली. युरोपमध्ये फळे जाण्याअगोदर या डाळिंबाच्या फळांची मुंबई व युरोप येथील तपासणी केंद्रात तपासणी करून घेतली. या तपासणीसाठी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला. तपासणीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील के.बी. एक्स्पोर्टच्या माध्यमातून जवळपास पाच टन डाळिंब फळे युरोपला पाठवले. या डाळिंबाला युरोपच्या बाजारात ११६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. पहिल्याच खेपेला त्यांना पाच लाख ऐंशी हजार रुपये मिळाले. अद्याप मोठ्या प्रमाणात माल झाडांवर बाकी आहे. युरोपच्या बाजारात जैविक पद्धतीने पिकविलेल्या मालाला मागणी आहे. रासायनिक वापराचा माल तिकडे स्वीकारला जात नाही.  

यात डाळिंब हे पीक अत्यंत नाजूक, किडके फळ म्हणून ओळखले जाते. वातावरणात थोडाफार जरी बदल झाल्यास तात्काळ रासायनिक कीटकनाशक फवारणी आपल्याकडील शेतकऱ्यांना करावी लागते. यात डाळिंब बाग धरल्यापासून ते माल विक्रीपर्यंत या बागांची चांगली निगा ठेवावी लागते. थोडी निष्काळजी झाल्यास संपूर्ण फळावर डाग, तसेच तेल्यारोग, करपा, मिलिबग, असे रोग या फळावर येतात. मात्र, या रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी केलेली फळे विदेशात चालत नाहीत. याचा अभ्यास करून कदम यांनी जैविक पद्धतीने या बागेचे संगोपन केले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी