शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कठोर मेहनतीच्या बळावर औरंगाबादच्या शेतकऱ्याची डाळिंबे थेट युरोपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 12:51 IST

यशकथा : दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत.

- जितेंद्र डेरे (जि. औरंगाबाद) 

लाडसावंगी, जिल्हा औरंगाबाद येथील रोहिदास रामदास कदम या शेतकऱ्याने पाण्याचे व्यवस्थापन, योग्य नियोजन व कठोर मेहनतीच्या बळावर डाळिंब उत्पादनात यशस्वी झेप घेतली आहे. दर्जा तसेच इतर सर्व मानके पूर्ण केल्याने या शेतकऱ्याची डाळिंबे थेट सातासमुद्रापार युरोपात विक्रीला गेली आहेत. युरोपवारीत पहिल्याच खेपेत त्यांना पाच लाख ऐंशी हजार रुपये मिळाल्याने त्यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचा दुष्काळी परिस्थितीतही विश्वास दुणावला आहे. 

लाडसावंगी येथील शेतकरी रोहिदास कदम यांनी चार वर्षांपूर्वी एक हजार झाडांची डाळिंबाची बाग उभी केली. वास्तविक पाहता लाडसावंगी परिसर मोसंबीपाठोपाठ आता डाळिंब झोन म्हणून ओळखला जात आहे. दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्या तरी काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर बागा जगविण्याची यशस्वी धडपड केली आहे. रोहिदास कदम यांना बाग जोपासताना, नेहमी दुष्काळाचा सामना करावा लागला. पुरेसा पाऊस नसल्याने डाळिंबाची बाग जगविणे हे या शेतकऱ्यासाठी मोठे दिव्य होते. या परिसरातील शेतकऱ्यांनी २०१२ साली पडलेल्या दुष्काळापासून चांगलाच धडा घेतला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेततळी तयार केली. पावसाळ्यात पडेल त्या पावसाच्या मदतीने ही शेततळी भरून ठेवली जातात. हे पाणी केवळ संकटकाळी वापरले जाते.

रोहिदास कदम यांनी डाळिंब बाग जोपासताना, केवळ जैविक खतांचा वापर केला. रासायनिक खते व कीटकनाशके त्यांनी आवर्जून टाळले. अत्यंत काटेकोर नियोजनाने त्यांनी डाळिंब बाग फुलवली. युरोपमध्ये फळे जाण्याअगोदर या डाळिंबाच्या फळांची मुंबई व युरोप येथील तपासणी केंद्रात तपासणी करून घेतली. या तपासणीसाठी त्यांना दहा हजार रुपये खर्च आला. तपासणीनंतर अहमदनगर जिल्ह्यातील के.बी. एक्स्पोर्टच्या माध्यमातून जवळपास पाच टन डाळिंब फळे युरोपला पाठवले. या डाळिंबाला युरोपच्या बाजारात ११६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. पहिल्याच खेपेला त्यांना पाच लाख ऐंशी हजार रुपये मिळाले. अद्याप मोठ्या प्रमाणात माल झाडांवर बाकी आहे. युरोपच्या बाजारात जैविक पद्धतीने पिकविलेल्या मालाला मागणी आहे. रासायनिक वापराचा माल तिकडे स्वीकारला जात नाही.  

यात डाळिंब हे पीक अत्यंत नाजूक, किडके फळ म्हणून ओळखले जाते. वातावरणात थोडाफार जरी बदल झाल्यास तात्काळ रासायनिक कीटकनाशक फवारणी आपल्याकडील शेतकऱ्यांना करावी लागते. यात डाळिंब बाग धरल्यापासून ते माल विक्रीपर्यंत या बागांची चांगली निगा ठेवावी लागते. थोडी निष्काळजी झाल्यास संपूर्ण फळावर डाग, तसेच तेल्यारोग, करपा, मिलिबग, असे रोग या फळावर येतात. मात्र, या रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी केलेली फळे विदेशात चालत नाहीत. याचा अभ्यास करून कदम यांनी जैविक पद्धतीने या बागेचे संगोपन केले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी