शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:38 IST

शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले.

ठळक मुद्देकचऱ्याचा प्रश्न कायम : मनपाच्या कामांची निव्वळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले. त्यांनी जिल्हा कचेरीत कचरा प्रश्नाचा आढावा घेतला. कॅरिबॅग बंदीची अंमलबजावणी करावी, कच-याचे वर्गीकरण करा, कामाची क्षमता वाढवा एवढाच सल्ला देऊन ते भुर्रकन निघून गेले. कचरा प्रश्नात ठोस असा कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता तर पालकमंत्री कशासाठी आले होते, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.शहरातील कचºयाचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिटा येथे दंगलही उसळली होती. एवढे सर्व होत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औैरंगाबाद शहराकडे फिरकले नाहीत.नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी एकदा ते आले होते. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री आहेत किंवा नाही, अशी अवस्था निर्माण झालेली असताना शनिवारी शहरात त्यांनी एन्ट्री मारली. महापालिकेकडून जिथे कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे, त्या केंद्रांना त्यांनी भेट देऊन कामाची प्रशंसा केली.मध्यवर्ती जकात नाका, चिश्तिया चौैक, बळीराम पाटील चौक येथे पाहणी केली. सत्यविष्णू हॉस्पिटल येथे ओल्या कचºयापासून होणारी खतनिर्मिती, रमानगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही त्यांनी घेतली.यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, आ. संदीपान भुमरे, सीईओ मधुकर आर्दड, नगरसेवक राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर आदी उपस्थित होते.शहरात फक्त ५ टक्के कचराजिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या शहरात केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात १५ हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील १४ हजार ६४६ मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे, सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, ७०२ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी पूर्वी ३५ पीट (खड्डे) घेण्यात आले होते. आता ७७ पीट तयार करण्यात आले आहेत.पात्रकमंत्र्यांनी दिली सूचनांची पंचसूत्रीघनकचरा व्यवस्थापनाबाबत कामाची गती वाढविण्यात यावी. अधिकाºयांनी सतर्कता बाळगावी. समन्वय ठेवून काम करावे.सफाई कामगार आणि कचरा वेचकांना ग्लोज, मास्क, गम बूट इत्यादी साहित्य द्यावे.सफाई कर्मचारी आणि कचरा वेचकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.कचरा वेचकांना ओळखपत्र देण्यात यावे.कामाची गती अधिक तीव्र करण्यात यावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादdr. deepak sawantदीपक सावंतNavalkishor Ramनवलकिशोर राम