शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:38 IST

शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले.

ठळक मुद्देकचऱ्याचा प्रश्न कायम : मनपाच्या कामांची निव्वळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले. त्यांनी जिल्हा कचेरीत कचरा प्रश्नाचा आढावा घेतला. कॅरिबॅग बंदीची अंमलबजावणी करावी, कच-याचे वर्गीकरण करा, कामाची क्षमता वाढवा एवढाच सल्ला देऊन ते भुर्रकन निघून गेले. कचरा प्रश्नात ठोस असा कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता तर पालकमंत्री कशासाठी आले होते, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.शहरातील कचºयाचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिटा येथे दंगलही उसळली होती. एवढे सर्व होत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औैरंगाबाद शहराकडे फिरकले नाहीत.नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी एकदा ते आले होते. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री आहेत किंवा नाही, अशी अवस्था निर्माण झालेली असताना शनिवारी शहरात त्यांनी एन्ट्री मारली. महापालिकेकडून जिथे कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे, त्या केंद्रांना त्यांनी भेट देऊन कामाची प्रशंसा केली.मध्यवर्ती जकात नाका, चिश्तिया चौैक, बळीराम पाटील चौक येथे पाहणी केली. सत्यविष्णू हॉस्पिटल येथे ओल्या कचºयापासून होणारी खतनिर्मिती, रमानगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही त्यांनी घेतली.यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, आ. संदीपान भुमरे, सीईओ मधुकर आर्दड, नगरसेवक राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर आदी उपस्थित होते.शहरात फक्त ५ टक्के कचराजिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या शहरात केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात १५ हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील १४ हजार ६४६ मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे, सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, ७०२ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी पूर्वी ३५ पीट (खड्डे) घेण्यात आले होते. आता ७७ पीट तयार करण्यात आले आहेत.पात्रकमंत्र्यांनी दिली सूचनांची पंचसूत्रीघनकचरा व्यवस्थापनाबाबत कामाची गती वाढविण्यात यावी. अधिकाºयांनी सतर्कता बाळगावी. समन्वय ठेवून काम करावे.सफाई कामगार आणि कचरा वेचकांना ग्लोज, मास्क, गम बूट इत्यादी साहित्य द्यावे.सफाई कर्मचारी आणि कचरा वेचकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.कचरा वेचकांना ओळखपत्र देण्यात यावे.कामाची गती अधिक तीव्र करण्यात यावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादdr. deepak sawantदीपक सावंतNavalkishor Ramनवलकिशोर राम