शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत पालकमंत्री आले अन् गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:38 IST

शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले.

ठळक मुद्देकचऱ्याचा प्रश्न कायम : मनपाच्या कामांची निव्वळ पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील ३५ दिवसांपासून कचरा प्रश्नामुळे त्रस्त आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले डॉ. दीपक सावंत शनिवारी सुटीच्या दिवशीही शहरात दाखल झाले. त्यांनी जिल्हा कचेरीत कचरा प्रश्नाचा आढावा घेतला. कॅरिबॅग बंदीची अंमलबजावणी करावी, कच-याचे वर्गीकरण करा, कामाची क्षमता वाढवा एवढाच सल्ला देऊन ते भुर्रकन निघून गेले. कचरा प्रश्नात ठोस असा कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता तर पालकमंत्री कशासाठी आले होते, असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला आहे.शहरातील कचºयाचा प्रश्न सर्वत्र गाजत आहे. कचरा टाकण्याच्या कारणावरून मिटमिटा येथे दंगलही उसळली होती. एवढे सर्व होत असताना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औैरंगाबाद शहराकडे फिरकले नाहीत.नारेगाव येथील आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी एकदा ते आले होते. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री आहेत किंवा नाही, अशी अवस्था निर्माण झालेली असताना शनिवारी शहरात त्यांनी एन्ट्री मारली. महापालिकेकडून जिथे कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे, त्या केंद्रांना त्यांनी भेट देऊन कामाची प्रशंसा केली.मध्यवर्ती जकात नाका, चिश्तिया चौैक, बळीराम पाटील चौक येथे पाहणी केली. सत्यविष्णू हॉस्पिटल येथे ओल्या कचºयापासून होणारी खतनिर्मिती, रमानगर येथील प्रकल्पाची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकही त्यांनी घेतली.यावेळी प्रभारी आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके, आ. संदीपान भुमरे, सीईओ मधुकर आर्दड, नगरसेवक राजू वैद्य, शिल्पाराणी वाडकर आदी उपस्थित होते.शहरात फक्त ५ टक्के कचराजिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, सध्या शहरात केवळ सातशे टन (पाच टक्के) कचरा रस्त्यावर आहे. १६ फेब्रुवारीपासून शहरात १५ हजार मेट्रिक टन निर्माण झाला होता. त्यातील १४ हजार ६४६ मेट्रिक टन कचºयाची विल्हेवाट लावण्यात आली आहे, सध्या केवळ पाच टक्के म्हणजे, ७०२ मेट्रिक टन कचरा रस्त्यावर पडून असल्याचा दावा त्यांनी केला. कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी पूर्वी ३५ पीट (खड्डे) घेण्यात आले होते. आता ७७ पीट तयार करण्यात आले आहेत.पात्रकमंत्र्यांनी दिली सूचनांची पंचसूत्रीघनकचरा व्यवस्थापनाबाबत कामाची गती वाढविण्यात यावी. अधिकाºयांनी सतर्कता बाळगावी. समन्वय ठेवून काम करावे.सफाई कामगार आणि कचरा वेचकांना ग्लोज, मास्क, गम बूट इत्यादी साहित्य द्यावे.सफाई कर्मचारी आणि कचरा वेचकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी.कचरा वेचकांना ओळखपत्र देण्यात यावे.कामाची गती अधिक तीव्र करण्यात यावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादdr. deepak sawantदीपक सावंतNavalkishor Ramनवलकिशोर राम