शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

औरंगाबाद जिल्हा परिषदेत मनमानी राज; वरिष्ठ अधिकार्‍यांचे आदेश झुगारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 18:51 IST

चालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले

औरंगाबाद : मार्च एण्ड अवघ्या ४५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना जिल्हा परिषदेला प्राप्त झालेला निधी खर्चाविना पडून आहे. दलित सुधार योजनेच्या ४२ प्रस्तावांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी महिनाभरापूर्वीच एकत्रित प्रशासकीय मान्यता दिली; पण प्रभारी समाजकल्याण अधिकारी आणि पदाधिकार्‍यांना एकत्रित प्रशासकीय मान्यता मान्य नाही. नवीन ५७२ प्रस्ताव छाननीमध्ये उतरले; पण त्यास अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही. जिल्हा परिषदेत सध्या सर्वच विभागांमध्ये मनमानी राज सुरू असल्यामुळे चालू आर्थिक वर्षात निधी खर्च होईलच, असे कोणीही ठामपणे सांगायला तयार नाही.

चालू आर्थिक वर्षामध्ये प्रामुख्याने समाजकल्याण विभागाला ग्रहण लागले आहे. या विभागाला पूर्णवेळ अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत तीन-चार अधिकारी आले आणि गेले. सध्या खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर मोकाटे यांच्याकडे समाजकल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. मात्र, ते या कार्यालयात कधी बसलेच नाहीत. यासंदर्भात आठ दिवसांपूर्वीच सभापती धनराज बेडवाल, अविनाश गलांडे, किशोर बलांडे, रमेश गायकवाड या सदस्यांनी मोकाटे यांच्याकडील समाजकल्याण अधिकार्‍यांचा कार्यभार काढून तो दुसर्‍या अधिकार्‍यांकडे सोपविण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांच्याकडे केली. अद्याप कोणाकडेही पदभार सोपविण्यात आलेला नाही. कार्यालयात प्रभारी अधिकारी बसायलाच तयार नसल्यामुळे या विभागाच्या अनेक योजना रखडल्या आहेत.

गेल्या वर्षात मंजूर झालेल्या २४१ प्रस्तावांपैकी ४२ प्रस्ताव असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता होती. त्यामुळे ते प्रस्ताव बाजूला ठेवून उर्वरित प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. दरम्यानच्या काळात मुख्य कार्यकारी अधिकारी आर्दड यांची मसुरीला प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. त्यामुळे ते महिनाभराच्या सुटीवर होते. त्या काळात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांनी या ४२ प्रस्तावांना एकत्रित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. असे असताना वैयक्तिक प्रशासकीय मान्यतेचा आग्रह समाजकल्याण अधिकार्‍यांबरोबर पदाधिकारी- सदस्यांनी धरला आहे.

तोंडी नको, लेखी आदेश द्यासमाजकल्याण विभागात सध्या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पदाधिकारी- सदस्य आणि अधिकार्‍यांनी प्रस्तावनिहाय वैयक्तिक मान्यतेबद्दल कर्मचार्‍यांना धारेवर धरले आहे. मात्र, कर्मचार्‍यांनी यासंदर्भात तोंडी नको, लेखी आदेश द्या, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे काही सदस्यांनी कर्मचार्‍यांवर आर्थिक व्यवहाराचे आरोप केल्यामुळे समाजकल्याण विभागात वातावरण तापले आहे. यासंदर्भात आता कर्मचारी स्वत:च ‘सीईओ’ व विभागीय आयुक्तांकडे तक्रारीच्या तथ्य शोधनासाठी चौकशीची मागणी करणार आहेत. हतबल कर्मचार्‍यांनी दीर्घ रजेवर जाण्याचाही निर्णय घेतला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदAurangabadऔरंगाबाद