शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्हा परिषदेत सदस्यांना विश्वासात घेऊनच होणार ५० कोटींचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 17:35 IST

आमदार- खासदार नव्हे, तर सर्व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊनच रस्ते मजबुतीकरणासाठी मिळालेल्या (३०५६ व ५०५४ लेखाशीर्ष) ५० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करणार

औरंगाबाद : आमदार- खासदार नव्हे, तर सर्व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊनच रस्ते मजबुतीकरणासाठी मिळालेल्या (३०५६ व ५०५४ लेखाशीर्ष) ५० कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन करणार असल्याची ग्वाही जि. प. बांधकाम सभापती विलास भुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते (३०५४ लेखाशीर्ष) व इतर जिल्हा मार्ग (५०५४ लेखाशीर्ष) मजबुतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला आहे. मार्चअखेर या दोन्ही लेखाशीर्षखाली सुमारे १४ कोटी रुपये व चालू आर्थिक वर्षात जवळपास ३५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. दरम्यान, या निधीतून जिल्ह्यातील काही आमदार- खासदारांनी रस्त्यांच्या कामांसाठी शिफारशी केल्या आहेत. त्यास जि. प. सदस्यांनी कडाडून विरोध केला आहे. 

या पार्श्वभूमीवर प्राप्त निधीतून घेण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन रखडले आहे. यासंदर्भात बांधकाम सभापती विलास भुमरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा ते म्हणाले, रस्ते मजबुतीकरणाच्या कामांचे नियोजन करण्याचा अधिकार हा जिल्हा परिषदेचा आहे. पालकमंत्र्यांनीही त्यानुसार जिल्हा परिषदेला निधी दिला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन येत्या २५ सप्टेंबरपर्यंत प्राप्त निधीतून कामांचे नियोजन केले जाईल. त्यानंतर महिनाभरात निविदा प्रक्रिया पार पाडली जाईल व साधारणपणे आॅक्टोबरअखेरपर्यंत कार्यारंभ आदेश निर्गमित केले जातील. 

आमदार- खासदारांनी केलेल्या शिफारशीबाबत ते म्हणाले, यापूर्वी आमदार- खासदारांनी केलेल्या शिफारशींची कामे जिल्हा परिषद सदस्यांनी केली होती. असे असले तरी त्या- त्या सर्कलमधील सदस्यांना विश्वासात घेऊन आमदार- खासदारांनी शिफारस केली व त्यास सदस्यांची संमती असेल, अशाच त्यांच्या कामांचे नियोजन केले जाईल. आचारसंहितेपूर्वी रस्त्यांची कामे मार्गी लागली पाहिजेत, या दृष्टिकोनातून नियोजन केले जाईल. यापूर्वी भाजपचे ६ सदस्य वंचित राहिले होते. त्यांना प्रत्येकी १५ लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्यांनाही यावेळी रस्त्यांच्या कामासाठी निधी दिला जाईल. जिल्हा नियोजन समितीकडून मोठा निधी मिळालेला असल्यामुळे केलेल्या कामांचे नियोजन करून पालकमंत्र्यांना सादर केले जाईल.

गटनेत्यांच्या पत्रावर घेणार शिफारसजिल्हा परिषदेतील काँग्रेस, भाजप, शिवसेन या तीनही गटनेत्यांच्या पत्रावर यावेळी शिफारस घेणार आहोत. अभियंत्यांकडून आलेल्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. मार्चमध्ये प्राप्त झालेला निधी कमी होता. त्या निधीत सर्व ६२ सदस्यांच्या सर्कलमध्ये कामे झाली नसती. त्यामुळे मार्चमध्ये व चालू आर्थिक वर्षात प्राप्त निधीतून एकत्रित नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व सदस्यांना न्याय मिळेल, असे नियोजन करून ते पालकमंत्र्यांना सादर केले जाईल. - विलास भुमरे, जि. प. बांधकाम सभापती

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfundsनिधी