शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

औरंगाबादेत १६७ उद्योजक भूखंडांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:38 IST

एमआयडीसी क्षेत्रात भूखंड न मिळाल्याने अनेक उद्योजक भाड्याच्या जागेत उद्योग चालवीत आहेत.

ठळक मुद्देभाड्याच्या जागेत उद्योग : उद्योजकांनी मांडल्या जॉइंट सीईओंकडे अडचणी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एमआयडीसी क्षेत्रात भूखंड न मिळाल्याने अनेक उद्योजक भाड्याच्या जागेत उद्योग चालवीत आहेत. वाळूज येथील १०४ तर चिकलठाणा येथील ६३ भाडेकरू ७ ते ८ वर्षांपासून भूखंड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. भाडेकरू उद्योजकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बाब बुधवारी (दि.४) उद्योजकांनी ‘एमआयडीसी’च्या सहमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांच्यापुढे मांडली.‘एमआयडीसी’च्या प्रादेशिक कार्यालयात जाधव यांची भेट घेऊन उद्योजकांनी भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. यावेळी ‘मसिआ’चे अध्यक्ष किशोर राठी, सचिव मनीष गुप्ता, गजानन देशमुख, किरण दंडे आदी उपस्थित होते. २७ मार्च आणि १४ मे रोजी उद्योगमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकाºयांबरोबर झालेल्या बैठकीत भाडेकरू उद्योजकांना भूखंड देण्याचे मान्य करण्यात आले. पुढील कार्यवाही करण्यासाठी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील १०४ आणि चिकलठाणा येथील ६३ भाडेकरू उद्योजकांची यादी प्रादेशिक कार्यालयास सादर करण्यात आली. यासंदर्भातील प्रस्ताव मुख्य कार्यालयास पाठविण्यात आलेला आहे. स्वत:ची जागा नसल्याने विविध योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येत आहे. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार भाडेकरू उद्योजकांना भूखंड वाटप करण्यासाठी प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.पाणी बिलात जलनिस्सारण शुल्कवाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना पाण्याच्या बिलामध्ये जलनिस्सारण शुल्क आकारण्यात येत आहे. ग्रीन आणि आॅरेंज वर्गातील उद्योगांना आणि ज्या उद्योगांनी ‘सीईटीपी’च्या ड्रेनेज लाईनला जोडणी केलेली नाही, त्या उद्योगांना हे शुल्क आकारण्यात येऊ नये.उद्योगांना आकारण्यात येणारे ड्रेनेज चार्जेस हे उद्योगास पुरवठा केलेल्या पाण्याच्या बिलावर न आकारता सांडपाण्यावर आकारण्यात यावे.चिकलठाणा एमआयडीसीत रस्त्यांची कामे करण्याची मागणीही करण्यात आली. उद्योजकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे जाधव म्हणाले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीAurangabadऔरंगाबाद