शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
3
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
4
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
5
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
6
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
7
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
8
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
9
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
10
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
11
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
12
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
13
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
14
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
15
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
16
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
17
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
18
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
19
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
20
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!

औरंगाबादच्या विमानसेवा कनेक्टिव्हिटीवर आठवड्यात होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:45 IST

केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री  हरदीपसिंग पुरी यांना भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये दिले निवेदन

औरंगाबाद : ऐतिहासिक, औद्योगिकदृष्ट्या औरंगाबाद शहराचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे तेथे विमानसेवा असणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन विमानसेवेच्या कनेक्टिव्हिटी औरंगाबादला देण्याबाबत आठवड्यात निर्णय होईल, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भाजप शिष्टमंडळाला बुधवारी सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्री खा.रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री पुरी आणि सचिव प्रकाश करोला यांची भेट घेतली. या भेटीबाबत प्रवक्ते बोराळकर यांनी सांगितले, २५ विमानतळांच्या कनेक्टिव्हिटीची क्षमता औरंगाबाद विमानतळावर आहे. तरीही तेथे फक्त तीन विमान सध्या सेवा देत आहेत. उद्योग आणि पर्यटनाच्या दृृष्टीने शहराचे महत्त्व जागतिक पटलावर मोठे आहे. संध्याकाळच्या वेळेत विमानसेवा नाही. तातडीने विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने मंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली.

यावर केंद्रीय मंत्री पुरी यांनी सचिव करोला यांना फोन करून विमानसेवेबाबत आढावा घेतला. तसेच शिष्टमंडळाला सचिव करोला यांनाही निवेदन देऊन परिस्थिती अवगत करण्यास सांगितले. करोला हे पर्यटन विभागाचे सचिव असताना त्यांनी अजिंठा लेण्यासाठी एका प्रकल्पावर काम केलेले असल्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. खाजगी विमानसेवा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सायंकाळच्या वेळेत विमान सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच एक थांबा देऊन इतर शहरांशी व राज्यांशी कनेक्टिव्हिटी देण्याबाबत विचार व्हावा. त्यामुळे जसे नागपूरहून जाताना विमाने एका ठिकाणी थांबतात. तसेच औरंगाबादहून एक थांबा देऊन विमाने सुरू केल्यास कंपन्यांना प्रवासी मिळतील, असेही मत शिष्टमंडळाने सचिवांकडे मांडले.  

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार