शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

औरंगाबादच्या विमानसेवा कनेक्टिव्हिटीवर आठवड्यात होणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:45 IST

केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री  हरदीपसिंग पुरी यांना भाजपच्या शिष्टमंडळाने दिल्लीमध्ये दिले निवेदन

औरंगाबाद : ऐतिहासिक, औद्योगिकदृष्ट्या औरंगाबाद शहराचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे तेथे विमानसेवा असणे गरजेचे आहे. त्यामुळे नवीन विमानसेवेच्या कनेक्टिव्हिटी औरंगाबादला देण्याबाबत आठवड्यात निर्णय होईल, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी भाजप शिष्टमंडळाला बुधवारी सांगितले. 

केंद्रीय राज्यमंत्री खा.रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी बुधवारी केंद्रीय मंत्री पुरी आणि सचिव प्रकाश करोला यांची भेट घेतली. या भेटीबाबत प्रवक्ते बोराळकर यांनी सांगितले, २५ विमानतळांच्या कनेक्टिव्हिटीची क्षमता औरंगाबाद विमानतळावर आहे. तरीही तेथे फक्त तीन विमान सध्या सेवा देत आहेत. उद्योग आणि पर्यटनाच्या दृृष्टीने शहराचे महत्त्व जागतिक पटलावर मोठे आहे. संध्याकाळच्या वेळेत विमानसेवा नाही. तातडीने विमानसेवा सुरू करण्याबाबत निर्णय व्हावा, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने मंत्र्यांशी बोलताना व्यक्त केली.

यावर केंद्रीय मंत्री पुरी यांनी सचिव करोला यांना फोन करून विमानसेवेबाबत आढावा घेतला. तसेच शिष्टमंडळाला सचिव करोला यांनाही निवेदन देऊन परिस्थिती अवगत करण्यास सांगितले. करोला हे पर्यटन विभागाचे सचिव असताना त्यांनी अजिंठा लेण्यासाठी एका प्रकल्पावर काम केलेले असल्यामुळे त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. खाजगी विमानसेवा कंपन्यांशी तातडीने चर्चा करून सायंकाळच्या वेळेत विमान सुरू करण्याचे आश्वासन दिले. तसेच एक थांबा देऊन इतर शहरांशी व राज्यांशी कनेक्टिव्हिटी देण्याबाबत विचार व्हावा. त्यामुळे जसे नागपूरहून जाताना विमाने एका ठिकाणी थांबतात. तसेच औरंगाबादहून एक थांबा देऊन विमाने सुरू केल्यास कंपन्यांना प्रवासी मिळतील, असेही मत शिष्टमंडळाने सचिवांकडे मांडले.  

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादCentral Governmentकेंद्र सरकार