शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

वर्षभरात होणार औरंगाबाद डिजिटली ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:13 IST

‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देजागतिक इंटरनेट दिन : १४० ठिकाणांवर उपलब्ध होणार ‘वाय- फाय’

औरंगाबाद : ‘इंटरनेटचा पॅक संपलाय, पटकन रिचार्ज मारावा लागेल’ अशी औरंगाबादकरांची ओरड आता लवकरच संपणार आहे. कारण महानगरपालिका प्रशासनाने मनावर घेतले, तर येत्या वर्षभरात आपले शहर ‘डिजिटली’ स्मार्ट होणार असून, शहरात एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध होणार आहे.२९ आॅक्टोबर हा दिवस सर्वत्र जागतिक इंटरनेट दिन म्हणून ओळखला जातो. स्वयंपाकघरातल्या मिठापासून ते अंतराळापर्यंत कशा संदर्भातही अडचण आलीच, तर तात्काळ मदतीला येते ते इंटरनेट. याच इंटरनेटमुळे अख्खे जग एका छोट्याशा चेंडूसमान वाटत असून, अवघ्या एका ‘क्लिक’ वर येऊन ठेपले आहेत. प्रत्येक तंत्रज्ञानाचे काही फायदे आणि तोटे असतात त्याप्रमाणे इंटरनेटच्या तोट्यांकडे जर दुर्लक्ष केले, तर इंटरनेटद्वारे उपलब्ध होणाऱ्या सुविधांमुळे तरुणाई ‘इंटरनेट भक्त’ झाली आहे.आता काळाच्या मागणीनुसार कोणतीही सिटी ‘डिजिटली स्मार्ट’ झाल्याशिवाय तिची गणना ‘स्मार्ट सिटी’मध्ये होऊ शकत नाही. त्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आराखड्यात ‘आयटी कनेक्टिव्हिटी आणि डिजिटलायझेशन’ अशी एक तरतूद आहे. या तरतुदीला अनुसरून औरंगाबाद शहर वर्षभरात डिजिटली स्मार्ट बनेल. या संदर्भातील टेंडर नुकतेच मान्य झाले असून कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचे समजते.चौकट :डिजिटली स्मार्ट औरंगाबाद -- या योजनेअंतर्गत महानगरपालिका, कॅनॉट गार्डन, निराला बाजार, औरंगपुरा, शहरातील विविध महाविद्यालये आणि आसपासचा परिसर, संपूर्ण जालना रोड, शहरातील प्रमुख चौक, मुख्य बाजारपेठा अशा एकूण १४० ठिकाणी वाय- फाय सुविधा उपलब्ध क रून दिली जाणार आहे.- शहरातील ५० बस थांब्यांवर देखील ही सुविधा उपलब्ध असेल.- शहर सुरक्षित करण्यासाठी एकूण ७०० कॅमेरे बसविण्यात येतील.- या योजनेसाठी १.२ कोटींचा खर्च लागणार असून, सुरळीतपणे काम सुरू राहिले तर नऊ महिने ते एक वर्ष या काळात अशा प्रकारच्या सुविधा प्रत्यक्षात येतील, अशी माहिती मिळाली.

टॅग्स :InternetइंटरनेटAurangabadऔरंगाबाद