शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:52 IST

महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला.

ठळक मुद्दे१२ कोटींची थकबाकी : महानगरपालिकेने ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.यासंदर्भात महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, महापालिके ला दरमहा वीज बिल भरण्यासंबंधी नोटिसा दिल्या जातात. मागील तीन महिन्यांपासून महापालिकेकडे १२ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. यासंदर्भात आपण स्वत: मनपा अधिकाºयांना वीज बिल भरण्याबाबत बोललो. त्यानंतर पत्रव्यवहार केला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आज दुपारी जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी धावपळ करून ३ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपासून खंडित केलेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. उर्वरित थकबाकीची रक्कम तीन-चार दिवसांत देण्याचे मनपा अधिकाºयांनी आश्वासन दिले आहे. त्यानंतरही जर थकबाकीची रक्कम दिली नाही, तर पुन्हा वीजपुरठवठा खंडित करण्यात येईल, असेही मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले.अनेक भागांत पाण्यासाठी भटकंती; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईयंदा जायकवाडी जलाशयात मुबलक पाणी असतानादेखील शहरातील अनेक भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अपुºया पाणीपुरवठ्यामुळे छावणी परिसरालगत शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा या भागांसह शहरातील अनेक भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात ४५ मिनिटे पाणी सोडले जाते.त्यातही १५ ते २० मिनिटे अगोदर पाण्याऐवजी नळाला हवाच येते. त्यानंतर अवघे २० ते २५ मिनिटेच पाणी येते तेही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागांना पाण्याच्या टाकीतून पाणी सोडले जात नाही. रेल्वेस्टेशन येथून मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणी येते. त्यामध्ये आमचा दोष नाही, असे सांगून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वेळ मारून नेत आहेत.