शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:52 IST

महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला.

ठळक मुद्दे१२ कोटींची थकबाकी : महानगरपालिकेने ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.यासंदर्भात महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, महापालिके ला दरमहा वीज बिल भरण्यासंबंधी नोटिसा दिल्या जातात. मागील तीन महिन्यांपासून महापालिकेकडे १२ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. यासंदर्भात आपण स्वत: मनपा अधिकाºयांना वीज बिल भरण्याबाबत बोललो. त्यानंतर पत्रव्यवहार केला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आज दुपारी जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी धावपळ करून ३ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपासून खंडित केलेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. उर्वरित थकबाकीची रक्कम तीन-चार दिवसांत देण्याचे मनपा अधिकाºयांनी आश्वासन दिले आहे. त्यानंतरही जर थकबाकीची रक्कम दिली नाही, तर पुन्हा वीजपुरठवठा खंडित करण्यात येईल, असेही मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले.अनेक भागांत पाण्यासाठी भटकंती; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईयंदा जायकवाडी जलाशयात मुबलक पाणी असतानादेखील शहरातील अनेक भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अपुºया पाणीपुरवठ्यामुळे छावणी परिसरालगत शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा या भागांसह शहरातील अनेक भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात ४५ मिनिटे पाणी सोडले जाते.त्यातही १५ ते २० मिनिटे अगोदर पाण्याऐवजी नळाला हवाच येते. त्यानंतर अवघे २० ते २५ मिनिटेच पाणी येते तेही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागांना पाण्याच्या टाकीतून पाणी सोडले जात नाही. रेल्वेस्टेशन येथून मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणी येते. त्यामध्ये आमचा दोष नाही, असे सांगून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वेळ मारून नेत आहेत.