शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या पाणीपुरवठ्याची वीज पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 23:52 IST

महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला.

ठळक मुद्दे१२ कोटींची थकबाकी : महानगरपालिकेने ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेकडे तीन महिन्यांचे तब्बल १२ कोटी रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे गुरुवारी दुपारी महावितरण कंपनीने जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केला. तथापि, पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महापालिकेच्या अधिका-यांनी धावपळ करून महावितरणला थकबाकीपोटी ३ कोटी २६ लाख रुपयांचा हप्ता भरला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता महावितरणने वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला.यासंदर्भात महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले की, महापालिके ला दरमहा वीज बिल भरण्यासंबंधी नोटिसा दिल्या जातात. मागील तीन महिन्यांपासून महापालिकेकडे १२ कोटी रुपयांची विजेची थकबाकी आहे. यासंदर्भात आपण स्वत: मनपा अधिकाºयांना वीज बिल भरण्याबाबत बोललो. त्यानंतर पत्रव्यवहार केला; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आज दुपारी जायकवाडी येथील पाणीपुरवठ्याची वीज खंडित करण्यात आली. त्यानंतर मनपा अधिकाºयांनी धावपळ करून ३ कोटी २६ लाख रुपयांचा भरणा केला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेपासून खंडित केलेला पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. उर्वरित थकबाकीची रक्कम तीन-चार दिवसांत देण्याचे मनपा अधिकाºयांनी आश्वासन दिले आहे. त्यानंतरही जर थकबाकीची रक्कम दिली नाही, तर पुन्हा वीजपुरठवठा खंडित करण्यात येईल, असेही मुख्य अभियंता गणेशकर म्हणाले.अनेक भागांत पाण्यासाठी भटकंती; उन्हाळ्यापूर्वीच पाणीटंचाईयंदा जायकवाडी जलाशयात मुबलक पाणी असतानादेखील शहरातील अनेक भागांतील नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत आहे. अगोदरच शहरात दोन दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अपुºया पाणीपुरवठ्यामुळे छावणी परिसरालगत शांतीपुरा, नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, भीमनगर, भावसिंगपुरा या भागांसह शहरातील अनेक भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात ४५ मिनिटे पाणी सोडले जाते.त्यातही १५ ते २० मिनिटे अगोदर पाण्याऐवजी नळाला हवाच येते. त्यानंतर अवघे २० ते २५ मिनिटेच पाणी येते तेही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागांना पाण्याच्या टाकीतून पाणी सोडले जात नाही. रेल्वेस्टेशन येथून मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे अत्यंत कमी दाबाने पाणी येते. त्यामध्ये आमचा दोष नाही, असे सांगून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वेळ मारून नेत आहेत.