शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Aurangabad Violence : परवानगी नसतानाही शिवसेनेच्या पोलीसविरोधी मोर्चास सुरुवात ; पोलीस आयुक्तांचा इशारा डावलला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 13:05 IST

११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास सुरुवात झाली.

औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजीच्या दंगलीनंतर पोलिसांनी सुरू केलेल्या धरपकडीच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चास पैठण गेट येथून  सुरुवात झाली. विशेष म्हणजे या निषेध मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली असून  विनापरवानगी मोर्चा काढाल, तर गुन्हे नोंदवू आणि अटकेची कायदेशीर कारवाईही केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल दिला होता. या इशाऱ्याला डावलून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर निघाला आहे.  

शहरातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. पोलिसांनी शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, शिवसेना कार्यकर्ता लच्छू पहिलवान यांना अटक केली. या अटकेनंतर शिवसेनेने पोलिसांची कारवाई पक्षपाती असल्याचा आरोप केला. पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ शिवसेनेने आजचा मोर्चा आयोजिल केला आहे. आज सकाळपासूनच क्रांती चौकात शिवसेनेचे कार्यकर्ते जमत होते. पोलिसांनी परवानगी नाकारली असताना मोर्चा निघत असल्याने मोर्चा सुरु होण्यापूर्वी सेना पदाधिकाऱ्यांचा पोलिसांना सोबत वाद झाला.  हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौक, चेलीपुरामार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा जाणार आहे. 

परवानगी नाकारल्याचे दिले पत्रमोर्चाला परवानगी मिळावी, यासाठी शिवसेनेकडून पोलीस आयुक्तांकडे अर्ज करण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. याबाबतचे पत्र पोलिसांनी शिवसेनेला कालच दिले आहे .

एसआरपीचा बंदोबस्तपोलिसांनी खबरदारी घेऊन विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले. राज्य राखीव दलाच्या सात कंपन्या, शहर पोलीस दलातील तीन उपायुक्त, सहा सहायक पोलीस आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिका-यांसह सुमारे अडीच हजार पोलीस तैनात आहेत. काही गडबड होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे.

कायदा व सुव्यवस्थेमुळे नकार ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीनंतर दोन समुदायांत तणाव आहे. पवित्र रमजान महिना सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप करून निषेध मोर्चाचे  आयोजन केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली आहे. यासोबतच त्यानंतरही शिवसेनेने मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले असून  मोर्चा काढणे लोकशाहीत अधिकार आहे. तो अधिकार वापरा, घोषणा द्या, परंतु तणाव निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नका, असे शिवसेनेच्या पदाधिका-यांना स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे त्यांनी पत्रकारांना शुक्रवारी सांगितले.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCommissioner Of Police Aurangabadपोलीस आयुक्त औरंगाबाद