शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : औरंगाबादकरांना शांतता राखण्याचं पोलिसांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:33 IST

किरकोळ कारणावरुन औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.

औरंगाबाद -किरकोळ कारणावरुन औरंगाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी (11 मे) रात्री उशिरा दोन गटात तुफान हाणामारी झाली. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन गटात झालेल्या वादाचे रुपांतर जाळपोळ, दगडफेकीत झाले. 

सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शांतता ठेवा, तसेच सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे. शिवाय, परिसरात इंटरनेट सेवादेखील बंद करण्यात आली आहे. 

(जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू)

दरम्यान, जमावाने केलेल्या जाळपोळीत जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62 वर्ष, शहागंज) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात जगनलाल शुक्रवारी (11 मे) झोपले होते. या हिंसाचारात शनिवारी (12 मे) पहाटे अज्ञातांनी त्या दुकानाला आग लावली. दुकानाच्या चहुबाजूंनी आग पसरली, तेव्हा आगीच्या झळांमुळे जगनलाल यांना जाग आली. या आगीतून जीव वाचवण्यासाठी त्यांनी आटापिटा केला. मात्र ते दिव्यांग असल्याने त्यांना दुकानातून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. 

मोतीकारंजा परिसरातील अनधिकृत नळ कनेक्शन तोडण्यावरून झालेल्या वादातून दोन गट आपापसात भिडले. तलवारी, चाकू, लाठ्या-काठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. या घटनेत पोलीस, नागरिक मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. दोन्ही गटातील लोकांनी वाहनांची, दुकांनाची तोडफोड-जाळपोळ केली. दरम्यान, जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार करावा लागला. यामध्ये एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे, जमावानं केलेल्या दगडफेकीत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह 10 पोलीस जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. शिवाय, जालन्याहून अतिरिक्त कुमकदेखील मागवण्यात आली आहे.  दगडफेकीत 25 जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून नागरिकांना करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदी