शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Aurangabad Violence : उद्घाटनापूर्वीच स्वप्नांची राखरांगोळी; दुकानदार म्हणतात आत्महत्येशिवाय पर्याय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:06 IST

नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले.

औरंगाबाद : नवाबपुरा रोडवर शेख रऊफ यांनी ‘अपना’हे इलेक्ट्रिक दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांचा उधारीवर मालही आणला. त्यांचे दुकान आणि गोदाम शुक्रवारी मध्यरात्री जळून खाक झाले. विशेष बाब म्हणजे रऊफ यांनी दुकानाचे उद्घाटनही केले नव्हते. रमजान महिन्यात उद्घाटनाचा विचार त्यांनी केला होता. दुकान सुरू होण्यापूर्वीच त्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली. डोक्यावर लाखो रुपयांचे कर्ज असून, आपल्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.

कप्तान या पेन्ट दुकानाच्या बाजूलाच त्यांनी मोठ्या मुश्किलीने एक दुकान भाड्याने घेतले. दुकानाखालील एक गोडाऊनही घेतले. वेगवेगळ्या राज्यांतून इलेक्ट्रिकचे अत्यंत महागडे सामानही त्यांनी मागविले होते. व्यापाऱ्यांनी रऊफ यांच्यावर विश्वास टाकत लाखो रुपयांचा माल क्षणार्धात पाठवून दिला. मागील काही दिवसांपासून दुकानात सामान जमविण्याचे काम ते आपल्या नातेवाईकांसोबत करीत होते. शुक्रवारी मध्यरात्री समाजकंटकांनी त्यांच्याही दुकानाला लक्ष्य केले. लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास दुकानाला आग लागली. अग्निशमन दलाला वारंवार फोन करूनही पाण्याचा बंब आला नाही. सकाळी ६ वाजता अग्निशमन विभागाची गाडी आली. तोपर्यंत दुकानातील संपूर्ण सामान जळून खाक झाले होते. 

दुकानातील एकही वस्तू वापरण्यासारखी नाही. दुकानच सुरू केले नसल्याने विमा काढण्याचा प्रश्नच नसल्याचे रऊफ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना नमूद केले. डोक्यावर आता लाखो रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज कधी फेडणार या चिंतेने माझ्या मनात आत्महत्येचा विचार येत असल्याचे रऊफ यांनी सांगितले. आयुष्यात आपण कोणाचे वाईट केले नाही. आपल्यावरच ही वेळ का आली म्हणत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले...! 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसfireआग