शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : संघर्ष टाळा, आपुलकीनं राहुया...आवाहन आपल्या औरंगाबादला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:38 IST

किरकोळ भांडणातून पेटलेले औरंगाबाद शांत करण्यासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद - शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून पेटलेले औरंगाबाद शांत करण्यासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अफवांचा फैलाव रोखण्यासाठी औरंगाबादेतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. 

शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन हिंसक संघर्षात झाले. या संघर्षात दोघांना आपले जीव गमवावे लागले. अनेक दुकाने तसेच पोलिसांच्या आणि खाजगी मालकीच्या गाड्याही जाळण्यात आल्या. पोलिसांनी सुरुवातीची संयमाची भूमिका सोडून कडक कारवाई करण्यास सुरु केल्यानंतर सकाळपासून दंगलखोर गायब होण्यास सुरुवात झाली. दुपारी ही बातमी प्रकाशित होत असताना शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी एक प्रकारची तणवपूर्ण शांतता होती. 

औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा भागात महापालिकेचे पथक अनधिकृत नळ जोडणीविरोधात कारवाईसाठी गेले होते. तेथे त्यांनी कारवाईस सुरुवात करताच आमचेच का त्यांचे का नाही असा वाद सुरु झाला. त्यातूनच पुढे दोन गटांमध्ये संघर्ष सुरु झाला. आधी शाब्दिक वादावादी झाली जी नंतर हिंसक संघर्षात बदलली. राडा करण्यासाठी जमावाने चाकू, तलवार, लाठ्या-काठ्यांचा मुक्त वापर केला. दोन्ही बाजूंच्या जमावांनी केलेल्या गडफेकीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. आगी लावण्याच्या घटना घडल्याने अनेक जखमी झाले. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह सामान्य पोलीस शिपायांचा समावेश आहे. जमावाने पोलिसांच्या गाड्यांचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली तसेच गोळीबार केल्यानंतरच जमाव नियंत्रणात आला. 

राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही औरंगबादकरांना शांततेचे आवाहन केले आहे. स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर रात्री परिस्थिती चिघळली नसती, असा आरोप केला. कचरा आंदोलनाच्यावेळी मोठा फौजफाटा आणि काल रात्री मात्र तोकडी व्यवस्था, अशी टीका त्यांनी केली. मात्र त्यांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वत्र फिरुन प्रयत्न केल्याचा दावा महापौर घोडके यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदी