शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Aurangabad Violence : संघर्ष टाळा, आपुलकीनं राहुया...आवाहन आपल्या औरंगाबादला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 16:38 IST

किरकोळ भांडणातून पेटलेले औरंगाबाद शांत करण्यासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे.

औरंगाबाद - शुक्रवारी रात्री किरकोळ भांडणातून पेटलेले औरंगाबाद शांत करण्यासाठी आता राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पोलिसांनीही पुढाकार घेतला आहे. सोशल मीडियातून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच अफवांचा फैलाव रोखण्यासाठी औरंगाबादेतील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. 

शुक्रवारी रात्री औरंगाबादमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन हिंसक संघर्षात झाले. या संघर्षात दोघांना आपले जीव गमवावे लागले. अनेक दुकाने तसेच पोलिसांच्या आणि खाजगी मालकीच्या गाड्याही जाळण्यात आल्या. पोलिसांनी सुरुवातीची संयमाची भूमिका सोडून कडक कारवाई करण्यास सुरु केल्यानंतर सकाळपासून दंगलखोर गायब होण्यास सुरुवात झाली. दुपारी ही बातमी प्रकाशित होत असताना शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी एक प्रकारची तणवपूर्ण शांतता होती. 

औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा भागात महापालिकेचे पथक अनधिकृत नळ जोडणीविरोधात कारवाईसाठी गेले होते. तेथे त्यांनी कारवाईस सुरुवात करताच आमचेच का त्यांचे का नाही असा वाद सुरु झाला. त्यातूनच पुढे दोन गटांमध्ये संघर्ष सुरु झाला. आधी शाब्दिक वादावादी झाली जी नंतर हिंसक संघर्षात बदलली. राडा करण्यासाठी जमावाने चाकू, तलवार, लाठ्या-काठ्यांचा मुक्त वापर केला. दोन्ही बाजूंच्या जमावांनी केलेल्या गडफेकीत मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. आगी लावण्याच्या घटना घडल्याने अनेक जखमी झाले. जखमींमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह सामान्य पोलीस शिपायांचा समावेश आहे. जमावाने पोलिसांच्या गाड्यांचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान केले. पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडली तसेच गोळीबार केल्यानंतरच जमाव नियंत्रणात आला. 

राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही औरंगबादकरांना शांततेचे आवाहन केले आहे. स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त असता तर रात्री परिस्थिती चिघळली नसती, असा आरोप केला. कचरा आंदोलनाच्यावेळी मोठा फौजफाटा आणि काल रात्री मात्र तोकडी व्यवस्था, अशी टीका त्यांनी केली. मात्र त्यांनीही शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वत्र फिरुन प्रयत्न केल्याचा दावा महापौर घोडके यांनी केला.

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदी