शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Aurangabad Violence : जाळपोळीत दिव्यांगाचा होरपळून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 13:36 IST

औरंगाबादमध्ये शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे

औरंगाबाद - औरंगाबादमध्ये शुक्रवारी (11 मे) मध्यरात्री दोन गटात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळे तुफान हाणामारी झाली. या हिंसाचारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दोन गटातील वादामुळे परिसरात जाळपोळ, तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाने केलेल्या जाळपोळीत जगनलाल छगनलाल बन्सीले (वय 62 वर्ष, शहागंज) यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. शहागंज परिसरातील एका दुकानात जगनलाल शुक्रवारी (11 मे) झोपले होते. या हिंसाचारात शनिवारी (12 मे) पहाटे अज्ञातांनी त्या दुकानाला आग लावली.

दुकानाच्या चहुबाजूंनी आग पसरली, तेव्हा आगीच्या झळांमुळे जगनलाल यांना जाग आली. या आगीतून जीव वाचवण्यासाठी त्यांनी आटापिटा केला. मात्र ते दिव्यांग असल्याने त्यांना दुकानातून बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. 

(औरंगाबादमध्ये कशामुळे उडाला हिंसाचाराचा भडका?; 'हे' आहे खरं काळजीचं कारण)

एकाचा गोळीबारात मृत्यूदरम्यान, जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, जमावाकडून दगडफेक, जाळपोळ सुरूच होती. त्यामुळे अखेर पोलिसांनी हवेत गोळीबार करावा लागला. यामध्ये 17 वर्षीय एका मुलाचा मृत्यू झाला. 

अनेक दुकाने, बँक, वाहने जाळली जमावाने परिसरातील अनेक दुकाने, वाहनांना आग लावली. यात एका शहागंज येथील कॅनरा बँकेच्या इमारतीचासुद्धा समावेश आहे.

 

 

टॅग्स :Aurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचारSection 144जमावबंदी