शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

औरंगाबाद-तिरुपती विशेष रेल्वे

By admin | Updated: May 22, 2014 00:33 IST

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़

पूर्णा : उन्हाळ्याच्या सुट्यात रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती ही विशेष रेल्वे सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सुत्रांनी दिली़ सिकंदराबाद-मनमाड या रेल्वे मार्गावर धावणार्‍या प्रवाशांची संख्या वाढली असून, विशेषत: मराठवाड्यातून तिरुपती देवस्थानाला जाणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे़ सद्यस्थितीतील रेल्वे गाड्या प्रवाशांच्या तुलनेमध्ये अपुर्‍या पडत असल्यामुळे तिरुपतीला जाणार्‍या भाविकांची गैरसोय होत आहे़ ही अडचण लक्षात घेता दक्षिण-मध्य रेल्वेने २३ मे रोजी औरंगाबाद- तिरुपती (गाडी क्रमांक ०७४०५) औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दुपारी ३ वाजता सोडण्यात येणार आहे़ सिकंदराबादमार्गे जाणार्‍या या रेल्वे गाडीच्या मार्गावरील सर्वच प्रमुख स्थानकावर थांबा देण्यात आला आहे़ ही रेल्वे गाडी नांदेड रेल्वेस्थानकावर सायंकाळी ७़३० वाजता पोहचणार आहे़ या विशेष रेल्वे गाडीला १५ डब्बे राहणार असून, वातानुकूलित डब्बा जोडण्यात आला आहे़ परतीचा मार्ग २४ मे रोजी तिरुपती- औरंगाबाद (गाडी क्रमांक ०७४०६) तिरुपती रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ५़१० वाजता सुटणार आहे़ ही गाडी औरंगाबाद रेल्वे स्थानकावर २५ मे रोजी सकाळी ९ वाजता पोहचणार आहे़ या दोन्ही गाड्यांमुळे तिरुपतीला जाणार्‍या- येणार्‍या भाविकांची सोय होणार आहे़ (प्रतिनिधी) भाविकांची गैरसोय झाली दूर सध्या मराठवाड्यातून तिरुपती बालाजीला भाविक मोठ्या संख्येने रेल्वेने जात आहेत़ अपुर्‍या रेल्वे संख्येमुळे भाविकांची गैरसोय होऊ लागली होती़ त्यामुळे रेल्वे विभागाने एक विशेष रेल्वे गाडी सोडल्याने भाविकांची गैरसोय दूर झाली आहे़ यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे़