शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

औरंगाबाद तहसीलचे होणार विभाजन

By admin | Updated: June 13, 2014 01:11 IST

औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाच्या विषयावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मुंबईत विशेष बैठक बोलाविली आहे.

औरंगाबाद : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद तहसीलच्या विभाजनाच्या विषयावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी मुंबईत विशेष बैठक बोलाविली आहे. या बैठकीत सध्याच्या तहसीलचे विभाजन करून शहरासाठी एक आणि ग्रामीणसाठी एक अशी दोन स्वतंत्र कार्यालये स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी ९ तहसील कार्यालये आहेत. मात्र, यातील औरंगाबाद तहसीलवरील ताण हा इतर तहसीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. एकट्या औरंगाबाद तहसीलमध्ये जिल्ह्याची अर्धी लोकसंख्या एकवटलेली आहे. त्यामुळे या तहसीलचे विभाजन करून दोन किंवा तीन तहसील कार्यालये स्थापन करावीत, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. जिल्हा प्रशासनाने याआधी अनेक वेळा राज्य सरकारकडे तसा प्रस्तावही पाठविलेला आहे. मात्र, आतापर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. राज्य सरकारने वर्षभरापूर्वीच राज्यातील उपविभागीय कार्यालयांची पुनर्रचना करून दोन तालुक्यांमागे एक उपविभागीय कार्यालय स्थापन केले. त्यानुसार औरंगाबाद उपविभागीय कार्यालयाचे विभाजन होऊन एकट्या औरंगाबाद तालुक्यासाठी एक आणि पैठण व फुलंब्री या दोन तालुक्यांसाठी दुसरे उपविभागीय कार्यालय अस्तित्वात आले. मुंबईतील बैठकीला जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांच्यासह इतरही स्थानिक अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. सध्याच्या औरंगाबाद तहसीलमध्ये औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. याशिवाय फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे १४७ आणि पैठण विधानसभा मतदारसंघाचे ४७ मतदान केंद्रे येतात. विभाजनानंतर शहरासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी दुसरे तहसील कार्यालय अस्तित्वात येणार आहे. शहरी तहसीलचे कार्यक्षेत्र हे शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तीन मतदारसंघांचा भाग राहील, असे सूत्रांनी सांगितले. तहसील विभाजनाची गरज कशामुळे औरंगाबाद तहसीलच्या कार्यक्षेत्रात औरंगाबाद शहर आणि तालुक्यातील २२६ गावांचा समावेश आहे. एकट्या औरंगाबाद शहराची लोकसंख्या १४ लाख आहे, तर उर्वरित तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्या सुमारे ४ लाख इतकी आहे. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३७ लाख इतकी आहे. म्हणजेच जिल्ह्याची अर्धी लोकसंख्या ही एकट्या औरंगाबाद तालुक्यात पर्यायाने औरंगाबाद तहसीलच्या कार्यक्षेत्रात एकवटलेली आहे.