शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील ‘बाटू’च्या उपकेंद्राचा प्रस्ताव लांबणीवर; वर्षभरापूर्वी झाली होती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:19 IST

मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देरायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे.उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.

औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे. घोषणेनंतर मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनीही ‘लोकमत’शी बोलताना यास दुजोरा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर हे छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’चे उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. आता सरकारच्या पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. 

सरकारकडून जेवढ्या लवकर उपकेंद्राला मान्यता मिळून निधीची तरतूद होईल, तेवढ्या लवकर विद्यापीठ हे उपकेंद्र कार्यान्वित करेल, असेही डॉ. गायकर यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या पातळीवर निधीची कमतरता असल्यामुळे प्रस्तावाला विलंब होण्याचीही शक्यता आहे. यामुळे औरंगाबादेतील विद्यापीठाचे उपकेंद्र आता पुढील वर्षीच सुरू होईल. या शैक्षणिक सत्रात सुरू होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली असल्याचेही डॉ. गायकर यांनी सांगितले.विद्यापीठ प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही टाकण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाहून विद्यापीठ कोणत्या दिशेने कार्य करीत आहे. हे सर्वांनाच समजेल, असेही ते म्हणाले.

मराठवाड्याबाबत दुजाभावकेंद्र सरकार, राज्य सरकारकडून औरंगाबादेत मंजूर झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांसाठी निधी देताना राज्य सरकारकडून हात आखडता घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यासाठी मंजूर झालेल्या स्पा, आयसीटी, विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्था अशा विविध संस्थांना पुरेसा निधी देण्यात आलेला नाही. यात आता आणखी ‘बाटू’च्या उपकेंद्राची नव्याने भर पडली आहे. हे केंद्र सुरू झालेले नसल्यामुळे महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद