शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

औरंगाबादमधील ‘बाटू’च्या उपकेंद्राचा प्रस्ताव लांबणीवर; वर्षभरापूर्वी झाली होती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:19 IST

मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देरायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे.उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.

औरंगाबाद : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे (बाटू) उपकेंद्र औरंगाबादेत स्थापन होणार असल्याची घोषणा एक वर्षापूर्वीच झालेली आहे. घोषणेनंतर मराठवाड्यातील बहुतांश महत्त्वाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’ची संलग्नता घेतली. मात्र, या महाविद्यालयांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारे उपकेंद्र वर्षभर लांबणीवर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलगुरू डॉ. विलास गायकर यांनीही ‘लोकमत’शी बोलताना यास दुजोरा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास गायकर हे छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘बाटू’चे उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. उपकेंद्र औरंगाबादला स्थापन करण्याचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे. आता सरकारच्या पातळीवर निर्णय होण्याची गरज आहे. 

सरकारकडून जेवढ्या लवकर उपकेंद्राला मान्यता मिळून निधीची तरतूद होईल, तेवढ्या लवकर विद्यापीठ हे उपकेंद्र कार्यान्वित करेल, असेही डॉ. गायकर यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या पातळीवर निधीची कमतरता असल्यामुळे प्रस्तावाला विलंब होण्याचीही शक्यता आहे. यामुळे औरंगाबादेतील विद्यापीठाचे उपकेंद्र आता पुढील वर्षीच सुरू होईल. या शैक्षणिक सत्रात सुरू होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आलेली असल्याचेही डॉ. गायकर यांनी सांगितले.विद्यापीठ प्रशासनाने अतिशय उत्कृष्ट प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव दोन दिवसांत विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही टाकण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पाहून विद्यापीठ कोणत्या दिशेने कार्य करीत आहे. हे सर्वांनाच समजेल, असेही ते म्हणाले.

मराठवाड्याबाबत दुजाभावकेंद्र सरकार, राज्य सरकारकडून औरंगाबादेत मंजूर झालेल्या विविध शैक्षणिक संस्थांसाठी निधी देताना राज्य सरकारकडून हात आखडता घेण्यात येत असल्याचे समोर आले आहे. मराठवाड्यासाठी मंजूर झालेल्या स्पा, आयसीटी, विधि विद्यापीठ, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण संशोधन संस्था अशा विविध संस्थांना पुरेसा निधी देण्यात आलेला नाही. यात आता आणखी ‘बाटू’च्या उपकेंद्राची नव्याने भर पडली आहे. हे केंद्र सुरू झालेले नसल्यामुळे महाविद्यालये, विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद