शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

अर्बन मोबिलिटी गटात औरंगाबाद स्मार्ट सिटीची बससेवा देशात अव्वल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:25 IST

स्मार्ट सिटी मिशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, संचालक कुणालकुमार यांच्या उपस्थितीत पाच वेगवेगळ्या प्रवर्गात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

ठळक मुद्दे सर्वोत्कृष्ट बस सेवेबद्दल औरंगाबादला राष्ट्रीय पुरस्कारदेशात सुरत दुसऱ्या तर अहमदाबाद तिसऱ्या क्रमांकावर

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराने शुक्रवारी सर्वोत्कृष्ट शहर वाहतूक बस सेवेबद्दल राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. अर्बन मोबिलिटी या प्रकारात औरंगाबाद स्मार्ट सिटीने प्रथम क्रमांक मिळविला. सुरत दुसऱ्या तर अहमदाबादला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ( Aurangabad Smart City's bus service tops the country  ) 

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयातर्फे शुक्रवारी दुपारी ४.३० वाजता आभासी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्मार्ट सिटी मिशनच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा, संचालक कुणालकुमार यांच्या उपस्थितीत पाच वेगवेगळ्या प्रवर्गात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आभासी बैठकीत औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे सहभागी झाले होते. औरंगाबाद स्मार्ट सिटीला ‘माझी स्मार्ट बस’साठी प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आला. सुरत शहराला ‘डायनमिक शेड्यूलिंग ऑफ बस’साठी दुसरा तर अहमदाबाद शहराला 'ऑटोमेटेड पार्किंग सिस्टीम’साठी तृतीय पुरस्कार घोषित केला.

तीन वर्षांपासून सेवाकेंद्र शासनाने दिलेला निधी पडून असताना २०१८ मध्ये सार्वजनिक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जानेवारी २०१९ मध्ये सेनेचे तत्कालीन युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. १०० बसेस ३२ प्रमुख मार्गांवर नागरिकांना सेवा देत आहेत. आत्तापर्यंत ८७ लाख प्रवाशांनी बससेवेचा लाभ घेतला.

कोविडमध्ये बजावली महत्त्वाची भूमिकामार्च २०२० मध्ये शहरात कोरोनाची पहिली लाट आलेली असताना स्मार्ट सिटी बसने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. रुग्णांना ने-आण करणे. कोविड योद्ध्यांना ने-आण करण्याचे काम केले. मागील पंधरा महिन्यांत ४ लाख कि.मी. अंतर पूर्ण केले.

प्रवाशांसाठी नावीन्यपूर्ण योजनानोव्हेंबर २०२० मध्ये बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. ई-तिकिटिंग, स्मार्ट कार्ड, मोबाइल ॲपसह अनेक नवीन आणि आकर्षक योजनांचा समावेश करण्यात आला. भविष्यात आणखी काही नावीन्यपूर्ण योजना बस सेवेशी निगडित सुरू करण्यात येणार आहेत.

स्मार्ट सिटीचे सांघिक यशस्मार्ट सिटीच्या संपूर्ण टीमने मागील काही वर्षांमध्ये स्वत:ला झोकून देऊन काम केले. सांघिक प्रयत्नांमुळे हे यश संपादन करता आले. पुरस्काराचे श्रेय औरंगाबाद शहरातील नागरिकांनाही तेवढेच द्यायला हवे. माझी स्मार्ट बस म्हणून त्यांनी शहर बससेवेवर प्रेम केले. बससेवेचा लाभ घेतला. प्रवाशांनी स्मार्ट बसच्या डिजिटल सेवांचा लाभ घ्यावा.- आस्तिककुमार पाण्डेय, सीईओ, स्मार्ट सिटी.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका