शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

औरंगाबाद : वॉर्ड कार्यालयांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 11:30 IST

मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये रांगा लागत होत्या. यंदा मात्र ३१ मार्चला रात्री १० वाजेपर्यंत वॉर्ड कार्यालये सुरू ठेवूनही नागरिक कर भरण्यासाठी फिरकलेच नाहीत. उलट अभय योजना कधीपासून सुरू होणार, अशी विचारणा अनेक नागरिकांनी शनिवारी केली.

ठळक मुद्दे३१ मार्च : कर भरण्याकडे मालमत्ताधारकांनी फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी दरवर्षी महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये रांगा लागत होत्या. यंदा मात्र ३१ मार्चला रात्री १० वाजेपर्यंत वॉर्ड कार्यालये सुरू ठेवूनही नागरिक कर भरण्यासाठी फिरकलेच नाहीत. उलट अभय योजना कधीपासून सुरू होणार, अशी विचारणा अनेक नागरिकांनी शनिवारी केली. २ एप्रिलपासून महापालिका मालमत्ता करासाठी अभय योजना राबवीत आहे. या योजनेत दंडाची ७५ टक्केरक्कम माफ करण्यात येणार आहे.महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराचे उद्दिष्ट ३९० कोटी ठरविले. मार्च महिन्याच्या प्रारंभी वसुली फक्त १८ टक्के झाली होती. काही नागरिकांनी महिनाभरात स्वत:हून मालमत्ता कर, पाणीपट्टी भरली. त्यामुळे ३० मार्चपर्यंत मालमत्ता कराची वसुली ७७ कोटी ५० लाख रुपये झाली. मागील दोन-तीन दिवसांपासून बँका बंद असल्याने आॅनलाईन वसुली, वॉर्ड कार्यालयांमध्ये जमा झालेली रक्कम गृहीत धरली, तर ८० कोटींपेक्षा अधिक वसुली होणार नाही. मागील वर्षी मनपाने ८७ कोटी रुपये वसूल केले होते. कचरा प्रश्नामुळे वसुलीकडे लक्ष देता आले नाही, असे उत्तर वॉर्ड अधिकाऱ्यांकडून मिळत आहे. एकीकडे वसुली नसल्याने महापालिकेच्या तिजोरीने तळ गाठला आहे. मार्च महिन्याचा पगार करण्यासाठीही तिजोरीत पैसे नाहीत. राज्य शासनाकडून जीएसटीचा वाटा म्हणून १५ कोटी रुपये आल्यास कर्मचाºयांचा पगार होऊ शकतो.मागील वर्षी महापालिकेतील अधिकाºयांनी वसुलीसाठी कर्मचारीच नसल्याची मोठ्या प्रमाणात ओरड केली होती. युद्धपातळीवर आऊटसोर्सिंगमार्फत १३५ कर्मचारी घेण्यात आले. वसुलीसाठी प्रत्येक झोन कार्यालयाला किमान १५ ते १८ कर्मचारी देण्यात आले. या कर्मचाºयांच्या पगारावर महापालिकेने आतापर्यंत १ कोटीहून अधिक रक्कम खर्च केली. त्यानंतरही वसुलीत सुधारणा होण्याऐवजी उलट अधोगतीच झाली. आऊटसोर्सिंगचा प्रयोग पूर्णपणे फसल्याचे निदर्शनास येत आहे.अभय योजनेची प्रतीक्षामालमत्ता करापोटी ३०० ते ३५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. २ एप्रिलपासून मनपा अभय योजना राबविणार आहे. ज्या मालमत्ताधारकांना शास्ती आणि दंड लावण्यात आला आहे, त्यांना थेट ७५ टक्केमाफी मिळणार आहे. त्यामुळे अनेक मालमत्ताधारक या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतुर झाले आहेत. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल, ८० ते ९० कोटी रुपये या माध्यमातून येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादMONEYपैसा