शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
3
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
4
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
5
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
6
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
7
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
8
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
9
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
10
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती
11
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
12
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
13
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
14
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
15
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
16
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
17
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
18
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
19
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
20
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे

औरंगाबादेत प्लास्टिक विक्रेत्यांचा बेमुदत बंद सुरु 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 20:11 IST

राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे.  यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी आजपासूनच आपल्या दुकानी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

औरंगाबाद : राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे.  यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी आजपासूनच आपल्या दुकानी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर आद्योगिक वसाहतीत पॉलीमर उत्पादन करणार्‍या ३०० पेक्षा अधिक उद्योगही उत्पादन बंद ठेवण्याचा विचारात आहेत. 

राज्यात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून प्लास्टिक  तसेच थर्माकोलवर बंदी आणण्यात आली. आज सकाळी ही वार्ता सर्वत्र पसरली. शहरातील व्यापार्‍यांच्या व्हॉटस्अपवरही शासनाच्या अधिसूचनेची प्रत व्हायरल झाली होती. यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडलीच नाही. प्रत्येक दुकानावर बेमुदत बंदचे फलक लावण्यात आले होते. ‘डोकं फिरल या सरकारचे महाराष्ट्र शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा कठोर निर्णय घेतला त्याच्या निषेधार्थ बेमुदत बंद’ असे फलकावर लिहिण्यात आले होते. मोंढ्या येथील मोतीकारंज्या परिसरात सर्व प्लास्टिक विक्रेते एकवटले होते.

प्लास्टिक शॉप असोसिएशनचे सचिव शेख नाजीम यांनी सांगितले की, शहारात आजघडीला ५०  लहान-मोठे प्लास्टिकचे होलसेलर आहेत व सुमारे ३०० फेरीवाले प्लास्टिक विकतात. दररोज १५ लाखाची उलाढाल होते. यावर आधारीत १८०० परिवार बेरोजगार होणार आहे. तसेच मिठाई, बेकरी,गृहउद्योग,तेलउद्योग, कपडा, रेडिमेड,होजअरी, फुड पॅकिंग आदी व्यवसायावरही मोठा फरक पडणार आहे. २००६ च्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या करिबॅग विक्रीवर बंद आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत. मात्र, संपूर्ण प्लास्टिक बंदी हे योग्य  नाही.  महिनाभरात शिल्लक प्लास्टिक परराज्यात विक्रीचे आदेश देण्यात आले आहे. याविरोधात आम्ही बेमुदत बंद पुकारला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व प्लास्टिक होलसेलर हजर होते. 

कर्ज माफ करा नसता इच्छा मरण द्या कोणताही पर्याय न देता सरकारने प्लास्टिक बंदी आणली आहे. होलसेल विक्रेत्यांनी या व्यवसायासाठी बँकेचे कर्ज काढले आहे. अनेकांचे पाल्य आज इंजिनिअरींग, मेडिकल आदी उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांचे लग्न करायचे आहे. अशा परिस्थिती जर व्यवसाय बंद पडला तर बँकेचे कर्ज भरणार कुठून. सरकारने शेतकर्‍यांप्रमाणे आमचेही कर्ज माफ करावे नसता आमच्या संपूर्ण परिवारांना इच्छा मरणाची परवानगी द्यावी.- ओमप्रकाश भुतडा, अध्यक्ष, औरंगाबाद प्लास्टिक शॉप असोसिएशन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीAurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायmondha nakaमोंढा नाकाagitationआंदोलन