शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

पैठणी, केसर आंबा, सीताफळाची भक्कम साथ; देशातील निर्यातक्षम ‘टॉप ३०’ जिल्ह्यांत औरंगाबाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 13:24 IST

वाणिज्य मंत्रालय या यादीतील प्रत्येक जिल्ह्याची निर्यात वाढविण्यासाठी, परदेशात खरेदीदार शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

औरंगाबाद : केंद्रीय वाणिज्य व ऊर्जा मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणानुसार निर्यातीच्या बाबतीत औरंगाबाद जिल्ह्याने देशात २७ वे स्थान पटकावले आहे. देशातील ज्या जिल्ह्यांमधून औद्योगिक निर्यात केली जाते, त्यांची ‘टॉप ३०’ यादी आकडेवारीसह या मंत्रालयाकडून जाहीर केली जाते. 

एप्रिल २०२१ पासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. एप्रिल ते सप्टेंबर या पहिल्याच सर्वेक्षणात महाराष्ट्राने बाजी मारली आहे. गुजरातमधील जामनगर आणि सुरत या दोन जिल्ह्यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला असून, मुंबई तिसऱ्या स्थानी आहे. पुणे पाचव्या, तर ठाणे १३ व्या क्रमांकावर आहे. रायगड (१५ व्या), पालघर (२८ व्या) या जिल्ह्यांनीही यादीत स्थान मिळविले आहे.

वाणिज्य मंत्रालय या यादीतील प्रत्येक जिल्ह्याची निर्यात वाढविण्यासाठी, परदेशात खरेदीदार शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी उत्पादने आणि सध्याच्या निर्यातीच्या आकड्यांचे संकलन करण्यात आले असून, त्या आधारे कृती आराखडा तयार केला जात असल्याचे या मंत्रालयाकडून कळविण्यात आले आहे.

औरंगाबादेत निर्यातीसाठी मोठा वावऔरंगाबादेतील उद्योगांना निर्यातीसाठी मोठा वाव आहे. येथील स्टील, ऑटोमोबाईल, फार्मसी उद्योगांकडून मोठी आयात-निर्यात केली जाते. सूक्ष्म, लघु, मध्यम (एमएसएमई) उद्योगांनाही निर्यातीसाठी चांगली संधी आहे. मात्र, हे उद्योजक आपल्या उद्योगातच गुरफटून जातात. विदेशातील प्रदर्शनात स्टॉल लावण्याची गरज आहे. ‘सीएमआयए’ने देखील येथील उद्योगांकून मोठ्या प्रमाणात निर्याती केली जावी, यासाठी पुढाकार घेतला आहे.- शिवप्रसाद जाजू, अध्यक्ष, सीएमआयए

औरंगाबाद जिल्ह्याने कशाची, किती निर्यात केलीअभियांत्रिकी उत्पादने -१०६२.०७ कोटी (पैठणी साडी व कापड, मराठवाडा केसर, बीड सीताफळ)औषधी उत्पादने - २१७.३९ कोटीप्लास्टिक व लिनोलिअम- १४९.९ कोटीमांस, दूध आणि कुक्कुट उत्पादने -४३.६० कोटीएकूण पाच उत्पादने -१,५१४.५८ कोटीजिल्ह्याची एकूण निर्यात -१७३४.२२ कोटी 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाMangoआंबा