शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

औरंगाबादचा जगात गाजावाजा, स्टार्टअपसाठी पोषक जगातील पहिल्या हजार शहरात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 13:49 IST

Aurangabad Is Heaven for Startups : स्टार्टअप ब्लिंक’ने नुकताच ‘स्टार्टअप इकोसिस्टीम वर्ल्ड रँकिंग २०२१’ हा अहवाल जाहीर केला असून जगातील पहिल्या एक हजार शहरांमध्ये औरंगाबादसह विषाखापट्टनम, विजयवाडा, रायपूर, पाटणा, वाराणसी, जमशेदपूर, उडपी या शहरांचा नव्यानेच समावेश झाला आहे.

ठळक मुद्देदहाव्या क्रमांकावर बंगळुरू, १४ व्या क्रमांकावर नवी दिल्ली, १६ व्या क्रमांकावर मुंंबईचा क्रमांकऔरंगाबाद शहर मागील काही वर्षांत शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून पुढे आले आहे.

औरंगाबाद : स्टार्टअपसाठी सर्वोत्तम वातावरण असलेल्या जगातील शहरांची क्रमवारी ‘स्टार्टअप ब्लिंक’ने जाहीर केली असून जगातील पहिल्या हजार शहरांमध्ये औरंगाबादचा समावेश असून हे शहर ८८५व्या क्रमांकावर आहे. या यादीत औरंगाबाद हे देशात ३६व्या, तर दक्षिण आशियामध्ये ४२व्या क्रमांकावर आहे. स्टार्टअप ब्लिंक ही संस्था जागतिक स्टार्टअप इकोसिस्टीमविषयी माहिती संकलित करून दरवर्षी त्याबाबतचा अहवाल सादर करते. ‘स्टार्टअप ब्लिंक’ने नुकताच ‘स्टार्टअप इकोसिस्टीम वर्ल्ड रँकिंग २०२१’ हा अहवाल जाहीर केला असून जगातील पहिल्या एक हजार शहरांमध्ये औरंगाबादसह विषाखापट्टनम, विजयवाडा, रायपूर, पाटणा, वाराणसी, जमशेदपूर, उडपी या शहरांचा नव्यानेच समावेश झाला आहे. या यादीत दहाव्या क्रमांकावर बंगळुरू, १४ व्या क्रमांकावर नवी दिल्ली, १६ व्या क्रमांकावर मुंंबईचा क्रमांक आहे. ( Aurangabad is one of the first thousand cities in the world to be a haven good environment for startups ) 

या अहवालात तीन पॅरॅमीटर्ससाठी गुणांकन देण्यात आले आहेत. यामध्ये मात्रा, गुणवत्ता आणि व्यवसाय वातावरण अशा तीन मापदंडांची बेरीज केली जाते. औरंगाबाद शहर मागील काही वर्षांत शैक्षणिक आणि औद्योगिक हब म्हणून पुढे आले आहे. स्थानिक औद्योगिक संस्थेच्या माध्यमातून ‘मॅजिक’सारखी संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या पुढाकाराने औरंगाबादेत इन्क्युबेशन सेंटर्सची उभारणी झाली आहे. यांच्या मदतीनेच औरंगाबादेत स्टार्टअप्स पुढे येण्यास सुरुवात झाली आहे.

जगात पहिल्या हजार शहरांच्या यादीत औरंगाबादचे नाव येण्यासाठी मागील दहा वर्षांपूर्वीचे परिश्रम आहेत. प्रसाद कोकीळ आणि प्रशांत देशपांडे यांनी ‘सीएमआयए’च्या माध्यमातून सन २०१० मध्ये पहिल्यांदा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात इंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट समिट आयोजित करण्यात आली होती. त्यात मुलांना उद्योजकतेला (इंटरप्रिनरशिप) घाबरून न जाता त्याचा आनंद घ्या, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सन २०१६ पासून ‘मॅजिक’ या इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ‘सीएमआयए’चे तत्कालीन अध्यक्ष आशिष गर्दे व कोकीळ यांनी परिश्रम घेतले. ते प्रत्येक नावीन्यपूर्ण प्रयोग, आयडिया जोडत गेले. त्यानंतर येथे अस्तित्वात आलेल्या इन्क्युबेशन सेंटरला ‘मॅजिकच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाले. हळूहळू कॉलेजमध्ये गुण मिळविण्यासाठी तयार होणारे विद्यार्थ्यांचे प्रोजेक्ट प्रश्न सोडविणारे होत गेले. प्रश्न सोडविणारे हे प्रोजेक्ट प्रॉडक्टमध्ये रूपांतरित होत गेले. प्रॉडक्टमध्ये रूपांतरित हे प्रोजेक्ट पुढे स्टार्टअप्‌मध्ये रजिस्टर होत गेले. त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मॅजिकसह दोन इन्क्युबेशन सेंटर्स सहकार्य करीत आहेत. त्यामुळे स्टार्टअप्‌ला औरंगाबादेत पोषक वातावरण व बळ मिळत गेले.

दहा वर्षांची तपश्चर्या फळालास्टार्टअप्‌च्या वाढीसाठी जगाच्या यादीत औरंगाबादचे नाव झळकले, यामागे मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ अँड इन्क्युबेशन कौन्सिलची (मॅजिक) मागील दहा वर्षांची तपश्चर्या असून ‘मॅजिक’च्या सामूहिक प्रयत्नाचे हे फळ आहे. ‘सीएमआयए’चे ‘मॅजिक’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अशी तीन इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. या माध्यमातून नावीन्यपूर्ण उद्योगाला चालना मिळाली. औरंगाबादेतील स्टार्टअप्‌च्या या लौकिकामुळे नकळत भारत सरकारच्या स्टार्टअप् इंडियाला देखील मोठा पाठिंबा मिळाला आहे.- प्रकाश कोकीळ, मराठवाडा उपाध्यक्ष, सीआयआय

शहराच्या भरभराटीसाठी चांगली बातमीस्टार्टअप्‌साठी ही आनंदाची बातमी आहे. येथील ऑटोमोबाईल, फार्मा आणि मॅन्युफॅक्चरिंग या उद्योगांमुळे औरंगाबादेत स्टार्टअप्‌ला पोषक वातावरण आहे. आपल्याकडे नवीन उद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन, आवश्यक जागा, पाठिंबा व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. येथे आयटी क्षेत्रातील स्टार्टअप्‌ मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे, ही या शहराच्या भरभराटीसाठी चांगली गोष्ट आहे. कोरोनानंतर विदेशात जाऊन नोकरी - धंदा करण्यापेक्षा औरंगाबादेत स्टार्टअप्‌ सुरू करण्याकडे तरुणांचा कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.- रोहित दाशरथी, तरुण उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSmart Cityस्मार्ट सिटीbusinessव्यवसाय