शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादवर संकट नाही; परंतु हा काळ संक्रमणाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 18:07 IST

सकारात्मक दृष्टीने विचार करून पावले उचलली जावीत, असे मत मावळते जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देर्ट सिटी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरचा येणारा काळ औरंगाबादसाठी चांगला असेल

औरंगाबाद : सद्य:स्थितीत शहरावर संकट नाही; परंतु सध्या शहर संक्रमण काळातून जात आहे. स्मार्ट सिटी, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणीपुरवठा योजना झाल्यानंतरचा येणारा काळ औरंगाबादसाठी चांगला असेल. सकारात्मक दृष्टीने विचार करून पावले उचलली जावीत, असे मत मावळते जिल्हाधिकारी तथा प्रभारी मनपा आयुक्त एन. के. राम यांनी व्यक्त केले. 

सोमवारी त्यांच्या बदलीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येताच, त्यांना भेटण्यासाठी अनेक शिष्टमंडळांनी गर्दी केली. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. पत्रकारांशी त्यांनी तासभर गप्पा मारत वर्षभरात केलेल्या कामांबाबत तसेच पालिकेतील महिनाभराच्या अनुभवाचे कथन केले. 

सर्वसामान्यांना सर्वाधिक वेळ राम यांनी वर्षभराच्या कार्यकाळात दिला. १५० कोटी रोडसाठी, ३०० कोटी स्मार्टसिटी, ९० कोटी कचरा व्यवस्थापन, ८०० कोटी समांतर जलवाहिनीसाठी, अशी कामे शहरात झाल्यानंतर संक्रमणातून मुक्तता झालेली दिसेल, असे राम म्हणाले.

> प्रश्न : वर्षभरातच बदली कशी काय झाली.- एन. के. राम : माझे शासनामध्ये स्रोत नाहीत. परंतु बदली होणार अशी कुणकुण लागली होती. परंतु बदली वर्षभरात कशी काय झाली, याबाबत मला काही सांगता येणार नाही. पण पुण्यासारख्या जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळणे हे महत्त्वाचे आहे.

> प्रश्न : औरंगाबादेत कामाचा अनुभव क सा राहिला.- एन. के. राम : हे शहर व जिल्हा चांगला आहे. काम करण्याची संधी मिळाली. यवतमाळ-अमरावतीमधील कामाचा अनुभव बीडमध्ये कामी आला. औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी आणि पालिका या दोन्ही पदांवर काम करण्याचा अनुभव मिळाला. बीडमध्ये जलसंधारणाचे काम करण्याची संधी मिळाली. 

> प्रश्न : पालिकेत काम करताना महिना कसा गेला.- एन. के. राम : मनपा कार्यक्षेत्रासाठी मोठे अधिकारी आहेत. साडेसात कोटींची कामे मंजूर केली. ७ कोटी कम्पोस्टिंगसाठी देता आले. कचरा व्यवस्थापनात चांगले काम करता आले. पालिकेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा, यासाठी काम केले. पावसाळ्यापूर्वी कचऱ्याची समस्या पूर्णत: दूर होईल, असे वाटते आहे. तीन झोनमध्ये कचरा प्रक्रि येसाठी जागा नाही, त्या जागा लवकरच मिळतील. 

> प्रश्न : पाणीपुरवठ्यासाठी काम करता आले काय.- एन. के. राम : पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी वेळ मिळाला नाही. शहरातील पाणीपुरवठा असमान आहे. त्यासाठी नियोजन करणे महत्त्वाचे असून, त्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच बदलीचे आदेश आले. 

> प्रश्न : महसूल प्रशासनातील कामाचा अनुभव कसा राहिला.- एन. के. राम : महसूल प्रशासनात काम करताना ई-म्युटिशन ९० टक्के केले. आॅनलाईन सातबारा पूर्ण होत आले आहे. येणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर पाणीटंचाईचे आव्हान असणार आहे. समृद्धीसाठी ९०० हेक्टर जमीन दिली. सोलापूर- धुळे महामार्ग भूसंपादनाला गती दिली. 

> प्रश्न : विभागीय आयुक्तांशी काही वाद होते काय?- एन. के. राम : विभागीय आयुक्त व माझ्यात काहीही वाद नव्हते. उपजिल्हाधिकारी कटके, गावंडे यांच्या निलंबनावरून वाद झाले. परंतु आयुक्तांकडून प्रशासकीय अनुभवाची शिदोरी मिळाली. औरंगाबादेत खूप काम करायचे होते, पण वेळ नाही मिळाला.

टॅग्स :Navalkishor Ramनवलकिशोर रामAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTransferबदली